शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

भाजपा सरकार विरोधात राष्ट्रवादीचा हल्लाबोल मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 17:06 IST

फसव्या व अपयशस्वी भाजपा सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कल्याण तहसील कार्यालयावर शनिवारी (20 ऑक्टोबर) हल्लाबोल मोर्चा काढला.

कल्याण - फसव्या व अपयशस्वी भाजपा सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कल्याण तहसील कार्यालयावर शनिवारी (20 ऑक्टोबर) हल्लाबोल मोर्चा काढला. यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. 

शिवाजी चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन हल्लाबोल मोर्चाला सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, सरचिटणीस सुभाष पिसाळ, जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांच्यासह युवा नेते महेश तपासे, राजेश शिंदे, दत्ता वङो, गुलाब वङो, जानू वाघमारे, प्रल्हाद भिल्लारे, सारीका जाधव सहभागी झाले होते. महंमद अली चौकात मोर्चेकऱ्यांनी ठिय्या दिला. सरकारने जनहिताच्या विरोधात निर्णय घेऊन सगळा गोंधळ घालून ठेवला असल्याने सबळ वाद्य वाजविणारे गोंधळी मोर्चात आणले होते. या सबळ वाद्यावर सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेधार्थ गोंधळ घालण्यात आला. त्यामुळे हा एक प्रकारे गोंधळी मोर्चा सगळ्य़ांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. 

भाजपा सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. यूपीए सरकारच्या काळात स्वस्त असलेला जीवनावश्यक गॅस सिलिंडर हा महागला. त्यामुळे येत्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत भाजपाचे सरकार उलथवून लावा असे आवाहन पिसाळ यांनी केले. तर उपाध्यक्ष हिंदूराव यांनी सांगितले की, भाजपा सरकार जातीयवादी आहे. त्याच जातीयवादी सरकारच्या मांडीला मांडी लावून रामदास आठवले बसले आहेत. सत्तेत सहभागी होऊन मंत्रीपद भोगत आहेत. समाजापेक्षा त्याना मंत्री पदाची जास्त काळजी आहे. त्यामुळे येत्या निवडणूकीत दलित समाजाने भाजपाला चांगला धडा शिकविला पाहिजे असे आवाहन केले. मोर्चातील शिष्टमंडळाने कल्याण तहसीलदार अमित सानप यांना सरकारच्या निषेधार्थ निवेदन दिले. राष्ट्रवादीचा भावना सरकार दरबारी पोहचविल्या जातील असे आश्वासन सानप यांनी शिष्टमंडळास दिले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाkalyanकल्याण