शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

भाजपा सरकार विरोधात राष्ट्रवादीचा हल्लाबोल मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 17:06 IST

फसव्या व अपयशस्वी भाजपा सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कल्याण तहसील कार्यालयावर शनिवारी (20 ऑक्टोबर) हल्लाबोल मोर्चा काढला.

कल्याण - फसव्या व अपयशस्वी भाजपा सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कल्याण तहसील कार्यालयावर शनिवारी (20 ऑक्टोबर) हल्लाबोल मोर्चा काढला. यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. 

शिवाजी चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन हल्लाबोल मोर्चाला सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, सरचिटणीस सुभाष पिसाळ, जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांच्यासह युवा नेते महेश तपासे, राजेश शिंदे, दत्ता वङो, गुलाब वङो, जानू वाघमारे, प्रल्हाद भिल्लारे, सारीका जाधव सहभागी झाले होते. महंमद अली चौकात मोर्चेकऱ्यांनी ठिय्या दिला. सरकारने जनहिताच्या विरोधात निर्णय घेऊन सगळा गोंधळ घालून ठेवला असल्याने सबळ वाद्य वाजविणारे गोंधळी मोर्चात आणले होते. या सबळ वाद्यावर सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेधार्थ गोंधळ घालण्यात आला. त्यामुळे हा एक प्रकारे गोंधळी मोर्चा सगळ्य़ांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. 

भाजपा सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. यूपीए सरकारच्या काळात स्वस्त असलेला जीवनावश्यक गॅस सिलिंडर हा महागला. त्यामुळे येत्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत भाजपाचे सरकार उलथवून लावा असे आवाहन पिसाळ यांनी केले. तर उपाध्यक्ष हिंदूराव यांनी सांगितले की, भाजपा सरकार जातीयवादी आहे. त्याच जातीयवादी सरकारच्या मांडीला मांडी लावून रामदास आठवले बसले आहेत. सत्तेत सहभागी होऊन मंत्रीपद भोगत आहेत. समाजापेक्षा त्याना मंत्री पदाची जास्त काळजी आहे. त्यामुळे येत्या निवडणूकीत दलित समाजाने भाजपाला चांगला धडा शिकविला पाहिजे असे आवाहन केले. मोर्चातील शिष्टमंडळाने कल्याण तहसीलदार अमित सानप यांना सरकारच्या निषेधार्थ निवेदन दिले. राष्ट्रवादीचा भावना सरकार दरबारी पोहचविल्या जातील असे आश्वासन सानप यांनी शिष्टमंडळास दिले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाkalyanकल्याण