शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
3
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
4
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
5
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
6
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
7
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
8
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
9
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
10
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
11
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
12
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
13
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
14
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
15
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
16
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
17
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
18
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
19
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
20
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!

नवनिर्माण आता मराठी माणसाच्या हाती; कोरोनामुळे संधी आली चालून- राजू पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 06:33 IST

कोरोनामुळे संधी आली चालून, बदल होण्यास लागेल थोडासा वेळ

- मुरलीधर भवारकल्याण : परप्रांतीयांचे लोंढे थांबवा, ही भूमिका मनसेने सुरुवातीपासून घेतली आहे. आता कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय स्वत:हून गावी निघून गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. मराठी माणूस या रिक्त झालेल्या जागा नक्कीच भरून काढणार, यात काही दुमत नाही. त्यासाठी मनसे प्रयत्न करणार आहे. लॉकडाउननंतर महाराष्ट्राचे नवनिर्माण आता मराठी माणसाच्या हाती असेल, असा ठाम विश्वास कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार व नेते राजू पाटील यांनी यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला आहे.

लॉकडाउनच्या काळात लाखोंच्या संख्येने मूळ गावी गेलेल्या परप्रांतीयांची मराठी माणूस जागा घेईल का, या प्रश्नावर आमदार पाटील म्हणाले की, नक्कीच घेईल. हा जो बदल झाला आहे. तो बदल लगेच दिसून येणार नसला, तरी मराठी माणूस कोणत्याही कामात कमी नाही की, कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. त्याला आता संधी चालून आली आहे. बदल होण्यास थोडा वेळ लागेल; मात्र मराठी माणूस काम करणारच नाही, असा खोडसाळ दावा केला जात आहे, तो मला योग्य वाटत नाही.

पाणीपुरीच्या व्यवसायात मराठी माणूस नव्हताच, असे नाही. काही मराठी माणसेही पाणीपुरी विकत होते. त्यांची संख्या कमी होती, इतकेच. आता ही संख्या नक्कीच वाढेल. पाणी, लॉण्ड्री आदी व्यवसायांत मराठी माणसाचा शिरकाव होईल, याची मला खात्री आहे. अशा प्रकारची हिंमत करणाऱ्या मराठी माणसाच्या पाठीशी आमचा पक्ष नेहमी असेल. त्यासाठी त्यांना काही मदत व प्रशिक्षण द्यावे लागले, तरी मनसे त्यासाठी पुढाकार घेणार आहे, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

नाशिक येथील एक उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, नाशिकच्या एका खाजगी सुरक्षा एजन्सीमध्ये परप्रांतीयांचा भरणा होता. आता त्याच कंपनीत चार हजार सुरक्षारक्षक आहे. त्यापैकी ९० टक्के मराठी सुरक्षारक्षक आहेत. परप्रांतीयांविरोधात शिवाजी पार्क, दादर येथे आंदोलन करण्यात आले, तेव्हा शिवाजी पार्क परिसरात मराठी माणसे भेळ विकत होती. नगर, नाशिक, कोल्हापूर येथील भेळ भडंग प्रसिद्ध आहे. त्यामुळे भेळचा व्यवसाय मराठी माणूस करत होता.

१९९५ पूर्वी नाक्यावर गेल्यावर परभणी, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, नांदेड येथील मराठी माणूस नाका कामगार होता. त्यानंतर, परिस्थिती बदलली. मराठी माणूस नाक्यावरून परप्रांतीयांमुळे हद्दपार झाला.आजही परप्रांतीय गावी गेल्याने आयटी क्षेत्रात गॅप पडलेला नाही. केवळ कंपन्या आणि बांधकाम क्षेत्रात मजूर लागत होते. त्याठिकाणी कामगार कमी पडतील.

मराठी माणूस मेहनती

परप्रांतीय कामगार हा अकुशल कामगार होता. महाराष्ट्रात असंघटित स्वरूपात अकुशल कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. मराठी माणूस हा दगडातून पैसा काढणारा आहे. याचा अर्थ असा की, तो प्रचंड कष्ट करतो. त्यामुळे ही कष्टाची कामे तो नक्कीच करेल. लॉकडाउननंतर मराठी माणूस महाराष्ट्राचे नवनिर्माण करेल, असा मला ठाम विश्वास आहे.

नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्या - डॉ. किणीकर

अंबरनाथ : लॉकडाउनमुळे अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील अनेक उद्योग बंद असल्याने कारखानदार व कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासंदर्भात आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी ‘आमा’ संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांच्यासह कारखानदारांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंंगद्वारे बैठक घेतली. लॉकडाउनमुळे परराज्यांतील कामगार हे त्यांच्या गावी परतत आहेत. त्यामुळे स्थानिक तरुणांना नोकरीत प्राधान्य द्या, असे आवाहन किणीकर यांनी कारखानदारांना केले. बैठकीदरम्यान कारखानदारांच्या समस्याही जाणून घेतल्या. मकरंद पवार, परेश शहा, विजयन नायर, राज पांडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMNSमनसेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका