शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

"सत्तेत घेण्यासाठी आदित्य, उद्धव ठाकरेंचे प्रयत्न, कबरीच्या विषयावर यांना का मिरच्या झोंबल्या?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 13:54 IST

Naresh Maske And Sanjay Raut : नरेश मस्के यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

नरेश मस्के यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच औरंगजेब कबरीवर देखील भाष्य केलं आहे. कबरीचा विषय काढला म्हणून यांना का मिरच्या झोंबल्या? असा सवालही विचारला आहे.  "संजय राऊत यांच्यावर मानसिक परिणाम झालेला आहे. युतीमध्ये समाविष्ट करावं आणि सत्तेत घ्यावं म्हणून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत... एकीकडे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका करत आहेत त्यामुळे ते इनबॅलेन्स झालेले आहेत.पण त्यांना आता कळालंय सत्तेत येणार नाहीत. आम्ही जर टीका करत बसलो तर हे लोक आम्हाला सत्तेत घेतील असं त्यांचं मतं आहे, त्यातून हे सर्व वक्तव्य ते करत आहेत."

"कबरीचा विषय काढला म्हणून यांना का मिरच्या झोंबल्या? यांनी जाहीर करावं की, औरंगजेब दैवत होतं... आमच्या दैवताचं तुम्ही अपमान करत आहे हे त्यांनी जाहीर करावं. आम्ही जाहीरपणे सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे आमचे दैवत आहे आणि आमच्या दैवताला ज्यांनी त्रास दिला त्याची निशाणी आम्हाला महाराष्ट्रात नको... महाराष्ट्रामध्ये ज्या इंग्रजांनी मोगलांनी देश गुलामगिरीकडे नेण्याचा प्रयत्न केला. देशावर आक्रमण केलं त्यांच्या स्मृती या देशातून नको हे आम्ही जाहीरपणे सांगतो. यांना मिरच्या का झोंबल्या?"

"एकही मुस्लिम या विरुद्ध बोलत नाही मग यांना मिरच्या का झोंबल्या... बाळासाहेब ठाकरेंची भूमिका हे विसरले.. अयोध्येमध्ये राम मंदिर होतं त्या ठिकाणी कबर होती. जेव्हा कार सेवकांनी तो ढाचा तोडला  तेव्हा बाळासाहेबांनी त्यांचा गौरव केला होता. त्यावेळी बाबराचा ढाचा जो तोडला त्याला सुद्धा यांचा विरोध होता का? यांनी जाहीर करावं दुटप्पी भूमिका कशाकरिता?" असा सवाल मस्के यांनी विचारला आहे. 

"केवळ मायनॉरिटीजची व्होट बँक आपल्याकडे यावी कारण बाकीची व्होट बँक त्यांच्याकडून गेलेली आहे. त्यांची भूमिका लोकांना लक्षात आली आहे. त्यामुळे लोक यांना मतदान करत नाहीत. एका विशिष्ट समाजाचा मतदान व्हावं याकरिता हे सर्व प्रयत्न आहेत. एकही मुस्लिम म्हणत नाही, औरंगजेब आमचं दैवत आहे मग यांना का मिरच्या झोंबल्या?"

"यावरून स्पष्ट होतंय औरंगजेबाची कबर ही ४०० वर्षांपूर्वीची आहे, ती नष्ट करण्याकरिता संजय राऊतांचा विरोध आहे. याचाच अर्थ बाबरची कबर तोडली, त्या ठिकाणी राम मंदिर उभारलं त्याला देखील संजय राऊत यांचा विरोध होता हे स्पष्ट होतंय... म्हणून त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गेले नाहीत तर विरोध असल्यामुळे गेले नाहीत हे संजय राऊत यांच्या विधानामुळे स्पष्ट झाले. सरकार जे काही काम करत असेल कायदा आणि  सुव्यवस्था त्या दृष्टीने ते त्यांचं काम करत आहे" असं नरेश मस्के यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :naresh mhaskeनरेश म्हस्केSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेPoliticsराजकारण