शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

"सत्तेत घेण्यासाठी आदित्य, उद्धव ठाकरेंचे प्रयत्न, कबरीच्या विषयावर यांना का मिरच्या झोंबल्या?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 13:54 IST

Naresh Maske And Sanjay Raut : नरेश मस्के यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

नरेश मस्के यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच औरंगजेब कबरीवर देखील भाष्य केलं आहे. कबरीचा विषय काढला म्हणून यांना का मिरच्या झोंबल्या? असा सवालही विचारला आहे.  "संजय राऊत यांच्यावर मानसिक परिणाम झालेला आहे. युतीमध्ये समाविष्ट करावं आणि सत्तेत घ्यावं म्हणून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत... एकीकडे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका करत आहेत त्यामुळे ते इनबॅलेन्स झालेले आहेत.पण त्यांना आता कळालंय सत्तेत येणार नाहीत. आम्ही जर टीका करत बसलो तर हे लोक आम्हाला सत्तेत घेतील असं त्यांचं मतं आहे, त्यातून हे सर्व वक्तव्य ते करत आहेत."

"कबरीचा विषय काढला म्हणून यांना का मिरच्या झोंबल्या? यांनी जाहीर करावं की, औरंगजेब दैवत होतं... आमच्या दैवताचं तुम्ही अपमान करत आहे हे त्यांनी जाहीर करावं. आम्ही जाहीरपणे सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे आमचे दैवत आहे आणि आमच्या दैवताला ज्यांनी त्रास दिला त्याची निशाणी आम्हाला महाराष्ट्रात नको... महाराष्ट्रामध्ये ज्या इंग्रजांनी मोगलांनी देश गुलामगिरीकडे नेण्याचा प्रयत्न केला. देशावर आक्रमण केलं त्यांच्या स्मृती या देशातून नको हे आम्ही जाहीरपणे सांगतो. यांना मिरच्या का झोंबल्या?"

"एकही मुस्लिम या विरुद्ध बोलत नाही मग यांना मिरच्या का झोंबल्या... बाळासाहेब ठाकरेंची भूमिका हे विसरले.. अयोध्येमध्ये राम मंदिर होतं त्या ठिकाणी कबर होती. जेव्हा कार सेवकांनी तो ढाचा तोडला  तेव्हा बाळासाहेबांनी त्यांचा गौरव केला होता. त्यावेळी बाबराचा ढाचा जो तोडला त्याला सुद्धा यांचा विरोध होता का? यांनी जाहीर करावं दुटप्पी भूमिका कशाकरिता?" असा सवाल मस्के यांनी विचारला आहे. 

"केवळ मायनॉरिटीजची व्होट बँक आपल्याकडे यावी कारण बाकीची व्होट बँक त्यांच्याकडून गेलेली आहे. त्यांची भूमिका लोकांना लक्षात आली आहे. त्यामुळे लोक यांना मतदान करत नाहीत. एका विशिष्ट समाजाचा मतदान व्हावं याकरिता हे सर्व प्रयत्न आहेत. एकही मुस्लिम म्हणत नाही, औरंगजेब आमचं दैवत आहे मग यांना का मिरच्या झोंबल्या?"

"यावरून स्पष्ट होतंय औरंगजेबाची कबर ही ४०० वर्षांपूर्वीची आहे, ती नष्ट करण्याकरिता संजय राऊतांचा विरोध आहे. याचाच अर्थ बाबरची कबर तोडली, त्या ठिकाणी राम मंदिर उभारलं त्याला देखील संजय राऊत यांचा विरोध होता हे स्पष्ट होतंय... म्हणून त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गेले नाहीत तर विरोध असल्यामुळे गेले नाहीत हे संजय राऊत यांच्या विधानामुळे स्पष्ट झाले. सरकार जे काही काम करत असेल कायदा आणि  सुव्यवस्था त्या दृष्टीने ते त्यांचं काम करत आहे" असं नरेश मस्के यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :naresh mhaskeनरेश म्हस्केSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेPoliticsराजकारण