शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

मोदी यांचा खरा चेहरा जनतेने ओळखला, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव संदीप यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 19:47 IST

मोदी व  भाजपाने देशातील जनतेला फसवून, दिशाभूल करून सत्ता मिळवली . पण आता जनतेने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खरा चेहरा ओळखला आहे .

मीरारोड - मोदी व  भाजपाने देशातील जनतेला फसवून, दिशाभूल करून सत्ता मिळवली . पण आता जनतेने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खरा चेहरा ओळखला आहे . देशातील जनता महागाई , भ्रष्टाचार ,  शेतकरी आत्महत्या, मुली - महिलांवरील अत्याचार, बेरोजगारी ने पिचली आहे . राफेल विमान घोटाळ्या प्रकरणी मोदी हे राहुल गांधी यांना घाबरून संसदेतून सुद्धा पळत आहेत . जनतेने मोदींना घरी बसवण्या चा निश्चय करून टाकला आहे अशी बोचरी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तथा कोकण विभाग निरीक्षक बी.एन. संदीप यांनी केली . 

मीरा रोड येथील अस्मिता कॉलेज मध्ये काँग्रेसचे एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते . यावेळी संदीप बोलत होते . आमदार रामहरी रुपनवार, माजी आमदार मुझफ्फर हुसेन, राजेश शर्मा,  मेहुल व्होरा, जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांच्यासह नगरसेवक , पदाधिकारी, कार्यकर्ते आदी शिबिरात सहभागी झाले होते . 

देश स्वतंत्र होण्यापूर्वी चा काळ, ब्रिटिश राजवटीत झालेली आंदोलने.  नेत्यांनी दिलेले बलिदान, देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस शासन काळात झालेली क्रांती, घेतलेले महत्वपुर्ण  निर्णय, झालेला विकास आदींची माहिती राजीव साहू,चैतन्य रेड्डी, विनोद नायर या वक्त्यांनी करून दिली. पक्षाचे नगरसेवक, सर्व सेल चे अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष यांच्या सह १२०० सक्रिय कार्यकर्त्यानी भाग घेतला.  

आलिशान लाखो रुपयांचे कोट घालणाऱ्या मोदींवर राहुल यांनी टीकेची झोड उठवताच मोदी कोट घालायला घाबरतात .  अंबानी व मोदीं बद्दल राहुल बोलतात म्हणून मोदी अंबानींच्या लग्नाला जायला घाबरले .  राफेल वर राहुल बोलतायत म्हणून उत्तर देण्या ऐवजी  मोदी संसदेतून सुद्धा पळ काढत आहेत . मोदी हे राहुल पासून घाबरून पळत असल्याने ते चोर आहेत हे स्पष्ट असल्याचा आरोप संदीप यांनी केला.    

मोदींनी लोकांना खोटी आश्वासने देत फसवणूक करून  सत्ता मिळवली . आणि आम्ही देखील काँग्रेस काळात केलेल्या जनहिताच्या कामांचा प्रचार व प्रसार करायला कमी  पडलो म्हणून हरलो .  आज मोदींच्या राज्यात  अराजकता माजली असून लहान व्यापाऱ्यांना देशोधडीला लावून अंबानी, अदानी सारख्या बड्या उद्योजकांना मोदी हजारो कोटींचा फायदा मोदी करून देत आहेत असे संदीप म्हणाले . 

टॅग्स :congressकाँग्रेसMira Bhayanderमीरा-भाईंदर