शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

मोदी यांचा खरा चेहरा जनतेने ओळखला, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव संदीप यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 19:47 IST

मोदी व  भाजपाने देशातील जनतेला फसवून, दिशाभूल करून सत्ता मिळवली . पण आता जनतेने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खरा चेहरा ओळखला आहे .

मीरारोड - मोदी व  भाजपाने देशातील जनतेला फसवून, दिशाभूल करून सत्ता मिळवली . पण आता जनतेने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खरा चेहरा ओळखला आहे . देशातील जनता महागाई , भ्रष्टाचार ,  शेतकरी आत्महत्या, मुली - महिलांवरील अत्याचार, बेरोजगारी ने पिचली आहे . राफेल विमान घोटाळ्या प्रकरणी मोदी हे राहुल गांधी यांना घाबरून संसदेतून सुद्धा पळत आहेत . जनतेने मोदींना घरी बसवण्या चा निश्चय करून टाकला आहे अशी बोचरी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तथा कोकण विभाग निरीक्षक बी.एन. संदीप यांनी केली . 

मीरा रोड येथील अस्मिता कॉलेज मध्ये काँग्रेसचे एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते . यावेळी संदीप बोलत होते . आमदार रामहरी रुपनवार, माजी आमदार मुझफ्फर हुसेन, राजेश शर्मा,  मेहुल व्होरा, जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांच्यासह नगरसेवक , पदाधिकारी, कार्यकर्ते आदी शिबिरात सहभागी झाले होते . 

देश स्वतंत्र होण्यापूर्वी चा काळ, ब्रिटिश राजवटीत झालेली आंदोलने.  नेत्यांनी दिलेले बलिदान, देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस शासन काळात झालेली क्रांती, घेतलेले महत्वपुर्ण  निर्णय, झालेला विकास आदींची माहिती राजीव साहू,चैतन्य रेड्डी, विनोद नायर या वक्त्यांनी करून दिली. पक्षाचे नगरसेवक, सर्व सेल चे अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष यांच्या सह १२०० सक्रिय कार्यकर्त्यानी भाग घेतला.  

आलिशान लाखो रुपयांचे कोट घालणाऱ्या मोदींवर राहुल यांनी टीकेची झोड उठवताच मोदी कोट घालायला घाबरतात .  अंबानी व मोदीं बद्दल राहुल बोलतात म्हणून मोदी अंबानींच्या लग्नाला जायला घाबरले .  राफेल वर राहुल बोलतायत म्हणून उत्तर देण्या ऐवजी  मोदी संसदेतून सुद्धा पळ काढत आहेत . मोदी हे राहुल पासून घाबरून पळत असल्याने ते चोर आहेत हे स्पष्ट असल्याचा आरोप संदीप यांनी केला.    

मोदींनी लोकांना खोटी आश्वासने देत फसवणूक करून  सत्ता मिळवली . आणि आम्ही देखील काँग्रेस काळात केलेल्या जनहिताच्या कामांचा प्रचार व प्रसार करायला कमी  पडलो म्हणून हरलो .  आज मोदींच्या राज्यात  अराजकता माजली असून लहान व्यापाऱ्यांना देशोधडीला लावून अंबानी, अदानी सारख्या बड्या उद्योजकांना मोदी हजारो कोटींचा फायदा मोदी करून देत आहेत असे संदीप म्हणाले . 

टॅग्स :congressकाँग्रेसMira Bhayanderमीरा-भाईंदर