शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नरेंद्र मोदी सरकारमुळे देशाची झाली अधोगती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 05:31 IST

जयंत पाटील यांची टीका : मीरा रोडमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा, पक्ष सोडून गेलेल्यांना स्वगृही घेताना निष्ठावंतांना विचारणार

मीरा रोड : खोटी आश्वासने देऊन मोदी सरकार सत्तेत आले. चार वर्षांत शेतकरी, तरुण, कामगार, लहान व्यापारी देशोधडीला लागले. देश अधोगतीला नेण्याचे काम केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने केले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. जे पक्ष सोडून गेले, त्यांना पुन्हा पक्षात घेताना निष्ठावंतांचे मत विचारात घेतले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मीरा-भार्इंदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांचा मेळावा बुधवारी रात्री मीरा रोड येथे झाला. यावेळी अनेकांनी आपले अनुभव मांडतानाच कार्यकर्त्यांना डावलले गेल्याची भावना व्यक्त केली. माजी मंत्री गणेश नाईक, जिल्हाध्यक्ष प्रकाश दुबोले, कार्याध्यक्ष संतोष पेंडुरकर आदी उपस्थित होते. ज्यांच्या हातात पक्ष दिला, ज्यांनी पदे उपभोगली, ते पक्ष सोडून गेले. पक्ष हा नागरिकांचा विकास व त्यांचे महत्त्वाचे प्रश्न मांडण्यासाठी पुढे जात असतो. कार्यकर्त्यांच्या कामांचे मूल्यमापन करण्यासाठी बुथ कमिट्या स्थापन केल्या जात असून आतापर्यंत ५० हजार कार्यकर्त्यांनी नोंद केली आहे.भाजपा आता काँग्रेस-राष्ट्रवादीतून गेलेल्यांना महामंडळे देत आहे. जे आमचे राहिले नाहीत, ते तुमचे कसे राहणार.काहींना शून्यातून उभे केले, ते पण राहिले नाहीत. तालुका, जिल्हा कमिटी शिफारस करेल, त्यांना पदे देऊ, असे ते म्हणाले.चौकीदार प्रामाणिक नाही म्हणून ‘ते’ पळालेच्नागरिक १५ लाख कधी मिळतील, याची वाट पाहत आहेत. चौकीदार प्रामाणिक असता तर मल्ल्या, मोदी, चोक्सी यासारखे पैसे घेऊन पळाले कसे? नोटाबंदीमुळे मजूर, कामगार देशोधडीला लागले.च्एफडीएमध्ये १०० टक्के परदेशी गुंतवणुकीला मोकळीक दिल्याने छोटी दुकाने बंद होण्याची सुरुवात हैदराबादमधून झाली आहे. दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. नोटाबंदीनंतर होता तोही रोजगार गेला, अशा शब्दांत पाटील यांनी टीका केली.अंबरनाथमध्ये घेतली पदाधिकाऱ्यांची शाळाअंबरनाथ : तू विद्यार्थी संघटनेचा प्रमुख आहेस, मग कोणत्या तरी महाविद्यालयात प्रवेश घे. जा आता लाग कामाला. तुम्ही अध्यक्ष असूनही काम का करत नाही... साहेब, मला डायबिटीज आहे... डायबिटीज आहे, मग उपाध्यक्ष होऊन दुसºयाला संधी द्या... हा कोणत्याही स्थानिक पक्षाच्या बैठकीतला संवाद नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा मेळाव्यातील आहे. अंबरनाथच्या रोटरी सभागृहात झालेल्या राष्ट्रवादी काँंग्रेस मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्येक विभागाच्या अध्यक्षांची शाळा घेतली. अगदी खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या जिल्हा मेळाव्यात पक्षातील फूट प्रदेशाध्यक्षांसमोरच उघड झाली. मात्र, जे गेले त्यांना श्रद्धांजली वाहून पक्षबांधणीच्या कामाला लागा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.प्रत्येक सदस्याला मंचावर बोलावून कामाचा आढावा देण्याचे पाटील यांनी सुचवले. त्यावेळी त्यांना काही प्रश्नही विचारले. काहींची अध्यक्षांनी खरडपट्टीही काढली. विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाला तू कोणत्या महाविद्यालयात शिकतो, हे विचारताच त्याची बोबडीच वळली. महाविद्यालयात जात नसशील, तर मग कोणत्या तरी कॉलेजात किंवा बाह्यविद्यार्थी म्हणून प्रवेश घेऊन टाक, असा खोचक सल्लाही त्याला पाटील यांनी दिला.ओबीसी विभागाच्या अध्यक्षाला तुम्ही वर्षभरापासून काम का करत नाही, असा सवाल विचारल्यानंतर... साहेब, मला डायबिटीज आहे, असे उत्तर त्या अध्यक्षाने देताच सभागृहात हशा पिकला. तुम्हाला डायबिटीज असेल, तर दुसºयांना संधी द्या, तुम्ही उपाध्यक्ष व्हा, असा सल्ला त्यांनी दिला. आपल्या भाषणात बोलतानाही त्यांनी दिवसातून दोनवेळा जेवा, इतर वेळी फक्त पक्षाचे काम करा. डायबिटीज कमी होईल, वाढला तर मला फोन करा, असेही पाटील म्हणाले.एका तालुकाध्यक्षाने थेट आमदार किसन कथोरे यांच्या धाकाने अनेक जण पद घेत नसल्याचे सांगत एकच खळबळ उडवून दिली. त्यावर बोलताना आता कथोरे पॅटर्न नको, नवे नेतृत्व तयार करा आणि पक्ष वाढवा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.यावेळी अनेक पदाधिकाºयांनी पक्षातील उणीदुणी काढली. पाटील यांचे भाषणही कार्यकर्त्यांमधील उणिवा दूर करण्याच्या अनुषंगानेच झाले. मेळाव्याला आमदार पांडुरंग बरोरा, गणेश नाईक, प्रमोद हिंदुराव, दशरथ तिवरे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले, सुभाष पाटील, शहराध्यक्ष सदाशिव पाटील उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेJayant Patilजयंत पाटील