शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

नालेसफाई ठरली फोल : पहिल्याच पावसात मीरा-भार्इंदर तुंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 01:04 IST

मीरा भार्इंदर महापालिकेने केलेल्या नालेसफाईचा पहिल्याच पावसाने बोजवारा उडवला आहे. शहरात जागोजागी पाणी साचले.

मीरा रोड : मीरा भार्इंदर महापालिकेने केलेल्या नालेसफाईचा पहिल्याच पावसाने बोजवारा उडवला आहे. शहरात जागोजागी पाणी साचले. त्यातही सांडपाणी वर आल्याने घाण पाण्यातून मार्ग काढावा लागला. नालेसफाईसह शहरात वारेमाप भराव आणि अतिक्रमणांना महापालिका व लोकप्रतिनिधींनी दिलेला आशीर्वादही पाणी तुंबण्यास पुन्हा कारण ठरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.रात्रीपासून पाऊस सातत्याने पडत नसला तरी पहिल्याच पावसाने पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल केली. शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. त्यातच अनेक भागात सांडपाणी तुंबल्याने सखल भागातील घरे व दुकानात शिरून आत दुर्गंधी पसरली. साचलेल्या सांडपाण्यातूनच चालत नागरिकांना वाट काढावी लागली. यामुळे आरोग्यचा प्रश्न निर्माण झाला आहे.पहिल्याच पावसात भाईंदर पश्चिमेला बेकरी गल्ली, सुदामानगर, राई, मुर्धा आदी भागात पाणी साचले होते. भार्इंदर पूर्व परिसर तर जलमय झाला होता. पूर्वेच्या जेसलपार्क, बाळाराम पाटील मार्ग, महात्मा फुले मार्ग (केबीन रोड), खारीगाव, तलाव रोड, गोडदेव आदी भागात मोठ्या प्रमाणात सांडपाणी आणि पावसाचे पाणी साचले होते. मीरा रोडच्या कनकिया, शांतीनगर, नयानगर, विजयपार्क, आरएनए ब्रॉडवे, संघवी टॉवर, सुंदर सरोवर, मुन्शी कंपाऊंड आदी अनेक परिसरात पाणी साचले. अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती. काही भागात पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावले होते. सबवेमध्ये पाणी भरले होते.पालिकेने नालेसफाईसाठी यंदा जवळपास अडीच ते पावणेतीन कोटी रुपयांचा खर्च केला होता. या शिवाय गेल्या काही वर्षांपासून शहरातील कांदळवन, सीआरझेड, नाविकास क्षेत्र, पाणथळ, मीठागर क्षेत्रात लोकप्रतिनिधी व पालिकेच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात भराव टाकून बेकायदा बांधकामे झाली आहेत. यामुळे पावसात वा भरतीच्या वेळी पाणी साचून ठेवण्याची क्षमता असणारी ही क्षेत्रे झपाट्याने नष्ट केली जात आहेत. शहरातील खाड्यांमध्येही अतिक्रमण व बांधकामे होऊन पात्र नामशेष होत चालली आहेत. यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.दुष्काळाचे सावट दूरमुरबाड : पावसाअभावी मुरबाड तालुक्यावर दुष्काळाचे सावट पसरले होते. अखेर दमदार पावसाने हजेरी लावली आणि मुरबाडकर सुखावून गेले. शेतात बियाणांची धूळपेर करून पाऊस पडत नसल्याने बोअरवेलचे पाणी शिंपडणाऱ्या शेतकऱ्यांनीही सुटकेचा निश्वास टाकला. या पावसाने पिकाला मोठा दिलासा मिळाला असून शेतातही पाणी साचले आहे. काही प्रमाणात झरेही वाहू लागले आहेत.अनेक रस्ते पाण्याखाली : किन्हवली : चेरपोली ग्रामपंचायत हद्दीतील राहुलनगर येथे पहिल्याच पावसात पूरसदृश्य परिस्थिती तयार झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत महिला व विद्यार्थी यांना चक्क रस्ता शोधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पहिल्याच पावसात चेरपोली ग्रामपंचायतीचा भोंगळ काभार चव्हाट्यावर आला आहे. ग्रामपंचायतीने केलेल्या अर्धवट कामामुळे रस्त्यावर पाणी साठून आजूबाजूच्या बिल्डिंगसमोर पाणी साठले असून अनेक तळमजल्यावर पाणी आले होते.घरामध्ये जाण्यासाठीही पाण्यातून जावे लागले. याचा त्रास सकाळी जाणाºया मुलांना व महिलांना सोसावा लागला. राहुलनगरमधील मुख्य रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून पावसाळ््यात तर नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.भिवंडीत जोरदार सुरूवातभिवंडी : गुरूवार रात्र आणि शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. आग्रा रोडवरील कमला कणेरी, कमला हॉटेल, नारपोली, पद्मानगर, तीनबत्ती, शिवाजीनगर भाजीमार्केट,नझराना कंम्पाऊंड अशा सखल भागात पाणी साचल्यामुळे व्यापारी व नागरिकांचे हाल झाले. देवजीनगर व टावरे कंम्पाऊंड येथे झाड पडल्याच्या घटना घडल्या तसेच शहरातील संगमपाडा येथील महापालिका कर्मचारी वसाहतीच्या कम्पाऊंडची भिंत कोसळली. तसेच रावजीनगर व शांतीनगर भागात घराच्या भिंती कोसळल्या. पावसाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कल्याणरोड, अंजूरफाटा, रांजनोली चौक,वंजारपाटीनाका, नारपोली व शेलार अशा विविध मार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. तर मुंबई-नाशिक महामार्गावर कोंडी झाली होती. पाणी साचल्यामुळे काही ठिकाणी वीजप्रवाह खंडित झाला होता. पावसाच्या आगमनाने शेतीच्या कामास सुरूवात झाली आहे.बळीराजा सुखावलाखर्डी : पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. जून महिना संपत आला तरी पावासाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत पडला होता. पेरण्या लांबल्या होत्या. दरम्यान काही दिवसापूर्वी तुरळक पडलेल्या पावसात शेतक-यांनी पेरलेला धान्याचा पेरा वाया जातो की काय अशी धास्ती शेतकºयांमध्ये पसरली होती. पाऊस चांगला झाल्यामुळे विभागातील विहिरी भरून गेल्याने येथील पाण्याची चिंता मिटली आहे.

टॅग्स :RainपाऊसMira Bhayanderमीरा-भाईंदर