शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

नाका कामगार हाताला काम मिळत नसल्याने झाले हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 01:40 IST

घराची दुरुस्ती, इमारतींचे बांधकाम यासारख्या कामांसाठी नाका कामगारांची आवश्यकता असते.

- सचिन सागरेकल्याण : जीएसटी तसेच अन्य काही कारणांमुळे आधीच उपासमारीची वेळ आली असताना आता ‘कोरोना’ नावाचे संकट आमच्या पुढ्यात येऊन उभे राहिल्याने दुष्काळात तेरावा ‘कोरोना’ म्हणण्याची वेळ नाका कामगारांवर आली आहे. कामेच मिळत नसल्याने त्यांच्यावर त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.घराची दुरुस्ती, इमारतींचे बांधकाम यासारख्या कामांसाठी नाका कामगारांची आवश्यकता असते. कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक, खडकपाडा, म्हसोबा चौक, नाना पावशे चौक, तिसगावनाका, शहाड तसेच डोंबिवली रेल्वेस्थानक, पाटकर रोड, टाटा पॉवर, कोळेगाव अशा नाक्यांवर सुमारे २५ ते ३० हजारांच्यावर नाका कामगार रोज सकाळी कामासाठी उभे असतात. आधीच जीएसटी तसेच ग्रामीण भागातील कामे बंद झाल्याने या कामगारांवर उपासमारीचे संकट आले असतानाच कोरोनामुळे तर त्यांना कामच मिळायचे बंद झाले आहे. इमारतींच्या कामांसह घरातील कामे ७० टक्के बंद झाली आहेत. तसेच, जी कामे सुरू होणार आहेत, ती कोरोनामुळे सुरूच झाली नाहीत. त्यामुळे, नाका कामगारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. महिन्यातून सुमारे १५ हजार रुपये मिळायचे; मात्र आता सात हजार रुपयांवरच त्यांना घरखर्च भागवावा लागत असल्याचे महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ यांनी सांगितले. नाका कामगारांवर उपासमार होत असून काही दिवसांपासून त्यांना काम मिळत नसल्याचे सत्यशोधक कामगार संघटनेचे सचिव संजय जाधव यांनी सांगितले.कोरोनामुळे कल्याणमधील नाका कामगारांची संख्या कमी झाली नाही. हातावर पोट असल्याने त्यांना काम सध्या मिळत नसल्याने उपासमारी होत आहे.- प्रशांत माळी, अध्यक्ष, असंघटित कामगार कल्याणकारी संस्था

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याण