शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

नाका कामगार हाताला काम मिळत नसल्याने झाले हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 01:40 IST

घराची दुरुस्ती, इमारतींचे बांधकाम यासारख्या कामांसाठी नाका कामगारांची आवश्यकता असते.

- सचिन सागरेकल्याण : जीएसटी तसेच अन्य काही कारणांमुळे आधीच उपासमारीची वेळ आली असताना आता ‘कोरोना’ नावाचे संकट आमच्या पुढ्यात येऊन उभे राहिल्याने दुष्काळात तेरावा ‘कोरोना’ म्हणण्याची वेळ नाका कामगारांवर आली आहे. कामेच मिळत नसल्याने त्यांच्यावर त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.घराची दुरुस्ती, इमारतींचे बांधकाम यासारख्या कामांसाठी नाका कामगारांची आवश्यकता असते. कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक, खडकपाडा, म्हसोबा चौक, नाना पावशे चौक, तिसगावनाका, शहाड तसेच डोंबिवली रेल्वेस्थानक, पाटकर रोड, टाटा पॉवर, कोळेगाव अशा नाक्यांवर सुमारे २५ ते ३० हजारांच्यावर नाका कामगार रोज सकाळी कामासाठी उभे असतात. आधीच जीएसटी तसेच ग्रामीण भागातील कामे बंद झाल्याने या कामगारांवर उपासमारीचे संकट आले असतानाच कोरोनामुळे तर त्यांना कामच मिळायचे बंद झाले आहे. इमारतींच्या कामांसह घरातील कामे ७० टक्के बंद झाली आहेत. तसेच, जी कामे सुरू होणार आहेत, ती कोरोनामुळे सुरूच झाली नाहीत. त्यामुळे, नाका कामगारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. महिन्यातून सुमारे १५ हजार रुपये मिळायचे; मात्र आता सात हजार रुपयांवरच त्यांना घरखर्च भागवावा लागत असल्याचे महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ यांनी सांगितले. नाका कामगारांवर उपासमार होत असून काही दिवसांपासून त्यांना काम मिळत नसल्याचे सत्यशोधक कामगार संघटनेचे सचिव संजय जाधव यांनी सांगितले.कोरोनामुळे कल्याणमधील नाका कामगारांची संख्या कमी झाली नाही. हातावर पोट असल्याने त्यांना काम सध्या मिळत नसल्याने उपासमारी होत आहे.- प्रशांत माळी, अध्यक्ष, असंघटित कामगार कल्याणकारी संस्था

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याण