शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'नोटबंदी म्हणजे सामान्य जनतेचा खून तर अंबानी, अदानीचा फायदा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 15:32 IST

नोटबंदी देशाच्या ७० वर्षातले सर्वात मोठे चुकीचे धोरण होते. नोटबंदीमुळे सर्वसामान्यांचा फायदा झाला नाही तर अंबानी, अदानींचा फायदा झाला.

ठळक मुद्देनोटबंदी देशाच्या ७० वर्षातले सर्वात मोठे चुकीचे धोरण होते.नोटबंदीमुळे सर्वसामान्यांचा फायदा झाला नाही तर अंबानी, अदानींचा फायदा झाला. नोटबंदी म्हणजे सामान्य जनतेचा खून होता असा घणाघात काँग्रेसचे सरचिटणीस तथा माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी केला.

मीरारोड - नोटबंदी देशाच्या ७० वर्षातले सर्वात मोठे चुकीचे धोरण होते. नोटबंदीमुळे सर्वसामान्यांचा फायदा झाला नाही तर अंबानी, अदानींचा फायदा झाला. जिओचे फोन हे चीन मधून आले कसे ? नोटबंदी आधी त्यासाठी हवाल्याने पैसे पाठवले गेले. चौकीदारच चोर असून देशाचं वाटोळ करायला निघाले आहेत. नोटबंदी म्हणजे सामान्य जनतेचा खून होता असा घणाघात काँग्रेसचे सरचिटणीस तथा माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी भार्इंदर येथे नोटबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसने केलेल्या आंदोलनात भाजपा व मोदी सरकारवर केला आहे. 

नोटबंदीला दोन वर्ष पुर्ण झाल्याच्या निषेधार्थ हुसेन यांच्या नेतृत्त्वाखाली भार्इंदर पुर्वेच्या काँग्रेस कार्यालयापासुन गोडदेव नाक्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. भटजी आणून शास्त्रोक्त पध्दतीने मोदी सरकारचे श्राध्द घालण्यात आले. जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, गटनेने जुबेर इनामदार, महिला जिल्हाध्यक्षा लिलाताई पाटील, नगरसेवक राजीव मेहरा, नगरसेविका गीता परदेशी, सारा अक्रम सह अ‍ॅड. शफिक खान, विकास म्हात्रे, अंकुश मालुसरे, राजकुमार मिश्रा, संदिप चौहान, प्रकाश नागणे आदी अनेक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

नोटबंदीच्या दोन वर्षानंतर सुध्दा सामान्य जनता, लहान उद्योजक-व्यापारी सर्वच वाईट परिस्थितीमध्ये आहेत. रोजगार, नोकऱ्या, व्यवसाय बुडाले. लोकांचे बळी गेले. दिवाळी त्यांची काळी ठरली आहे. कर्जबाजारी अनिल अंबानीला कागदाचे विमान बनवण्याचा अनुभव नसताना मोदींनी देशाच्या संरक्षणासाठी राफेल विमान बनवण्याचे कंत्राट दिले. हजारो कोटींचा हा घोटाळा असताना केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाला सुध्दा विमानाची किंमत सांगायला तयार नाही. ४ वर्षात सत्ता असून राम मंदिर बांधले नाही आणि निवडणुक आल्यावर राम मंदिरचा मुद्दा उभा करुन तेढ वाढवतात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतत येतात. काँग्रेस शासनाने मंजुर केलेल्या मेट्रोचे नारळ फोडतात. मीरा भार्इंदरसाठी ७५ दशलक्ष पाणी काँग्रेसने मंजुर केले. त्याचे श्रेय घेता पण आजही त्यातले ३५ दशलक्ष लिटर पाणी सुध्दा आणता आले नाही. २४ तास पाणी देण्याचे फलक लावले आज लोकांना ४८ तासांवर पाणी मिळत आहे. आज पालिकेच्या कामांमध्ये २८ टक्के कमिशन खात आहेत. मोठा भ्रष्टाचार चालला आहे. शहरात फेरीवाले सुध्दा भाजपाने वाढवले. २०१२ मध्ये साडे तीन हजार फेरीवाले होते ते आज १८ हजार झाले आहेत. बाजार वसुली करणारे पण भाजपाचेच आहेत अशी टिकेची झोड उठवत खोटी आश्वासनं देणं, कमिशन खाणं हेच यांचे धंदे असल्याचा आरोप हुसेन यांनी केला.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाthaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदर