शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

'नोटबंदी म्हणजे सामान्य जनतेचा खून तर अंबानी, अदानीचा फायदा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 15:32 IST

नोटबंदी देशाच्या ७० वर्षातले सर्वात मोठे चुकीचे धोरण होते. नोटबंदीमुळे सर्वसामान्यांचा फायदा झाला नाही तर अंबानी, अदानींचा फायदा झाला.

ठळक मुद्देनोटबंदी देशाच्या ७० वर्षातले सर्वात मोठे चुकीचे धोरण होते.नोटबंदीमुळे सर्वसामान्यांचा फायदा झाला नाही तर अंबानी, अदानींचा फायदा झाला. नोटबंदी म्हणजे सामान्य जनतेचा खून होता असा घणाघात काँग्रेसचे सरचिटणीस तथा माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी केला.

मीरारोड - नोटबंदी देशाच्या ७० वर्षातले सर्वात मोठे चुकीचे धोरण होते. नोटबंदीमुळे सर्वसामान्यांचा फायदा झाला नाही तर अंबानी, अदानींचा फायदा झाला. जिओचे फोन हे चीन मधून आले कसे ? नोटबंदी आधी त्यासाठी हवाल्याने पैसे पाठवले गेले. चौकीदारच चोर असून देशाचं वाटोळ करायला निघाले आहेत. नोटबंदी म्हणजे सामान्य जनतेचा खून होता असा घणाघात काँग्रेसचे सरचिटणीस तथा माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी भार्इंदर येथे नोटबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसने केलेल्या आंदोलनात भाजपा व मोदी सरकारवर केला आहे. 

नोटबंदीला दोन वर्ष पुर्ण झाल्याच्या निषेधार्थ हुसेन यांच्या नेतृत्त्वाखाली भार्इंदर पुर्वेच्या काँग्रेस कार्यालयापासुन गोडदेव नाक्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. भटजी आणून शास्त्रोक्त पध्दतीने मोदी सरकारचे श्राध्द घालण्यात आले. जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, गटनेने जुबेर इनामदार, महिला जिल्हाध्यक्षा लिलाताई पाटील, नगरसेवक राजीव मेहरा, नगरसेविका गीता परदेशी, सारा अक्रम सह अ‍ॅड. शफिक खान, विकास म्हात्रे, अंकुश मालुसरे, राजकुमार मिश्रा, संदिप चौहान, प्रकाश नागणे आदी अनेक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

नोटबंदीच्या दोन वर्षानंतर सुध्दा सामान्य जनता, लहान उद्योजक-व्यापारी सर्वच वाईट परिस्थितीमध्ये आहेत. रोजगार, नोकऱ्या, व्यवसाय बुडाले. लोकांचे बळी गेले. दिवाळी त्यांची काळी ठरली आहे. कर्जबाजारी अनिल अंबानीला कागदाचे विमान बनवण्याचा अनुभव नसताना मोदींनी देशाच्या संरक्षणासाठी राफेल विमान बनवण्याचे कंत्राट दिले. हजारो कोटींचा हा घोटाळा असताना केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाला सुध्दा विमानाची किंमत सांगायला तयार नाही. ४ वर्षात सत्ता असून राम मंदिर बांधले नाही आणि निवडणुक आल्यावर राम मंदिरचा मुद्दा उभा करुन तेढ वाढवतात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतत येतात. काँग्रेस शासनाने मंजुर केलेल्या मेट्रोचे नारळ फोडतात. मीरा भार्इंदरसाठी ७५ दशलक्ष पाणी काँग्रेसने मंजुर केले. त्याचे श्रेय घेता पण आजही त्यातले ३५ दशलक्ष लिटर पाणी सुध्दा आणता आले नाही. २४ तास पाणी देण्याचे फलक लावले आज लोकांना ४८ तासांवर पाणी मिळत आहे. आज पालिकेच्या कामांमध्ये २८ टक्के कमिशन खात आहेत. मोठा भ्रष्टाचार चालला आहे. शहरात फेरीवाले सुध्दा भाजपाने वाढवले. २०१२ मध्ये साडे तीन हजार फेरीवाले होते ते आज १८ हजार झाले आहेत. बाजार वसुली करणारे पण भाजपाचेच आहेत अशी टिकेची झोड उठवत खोटी आश्वासनं देणं, कमिशन खाणं हेच यांचे धंदे असल्याचा आरोप हुसेन यांनी केला.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाthaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदर