शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणात १६ आरोपींना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 05:22 IST

जागेच्या वादातून सहा वर्षांपूर्वी झालेल्या निर्घृण खून प्रकरणामध्ये कल्याण सत्र न्यायालयाने बुधवारी १६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींमध्ये तीन पितापुत्रांचाही समावेश आहे.

ठाणे - जागेच्या वादातून सहा वर्षांपूर्वी झालेल्या निर्घृण खून प्रकरणामध्ये कल्याण सत्र न्यायालयाने बुधवारी १६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींमध्ये तीन पितापुत्रांचाही समावेश आहे.कल्याणमधील उंबर्डे येथील विकास पाटील (३२) यांचा ३ आॅक्टोबर २०१२ रोजी खून झाला होता. विकासचे काका रघुनाथ पाटील आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी काका शंकर पाटील यांच्यात घटनेच्या सात वर्षे आधीपासून जागेचा वाद होता. कल्याणच्या खाडीकिनारी रघुनाथ पाटील यांनी जमीन विकत घेतली होती. ती आपली असल्याचा आरोपीचा दावा होता. यावरून काका पाटील आणि रघुनाथ पाटील यांच्यात वेळोवेळी भांडणे व्हायची. विकासचा भाऊ विलास मध्यस्थी करून भांडणे सोडवायचा. २०१० पासून हा वाद वाढला. या वादातून आरोपींनी विकास पाटीलवर तीनचार वेळा हल्ला केला. आरोपी त्याच्या पत्नीलाही त्रास द्यायचे. याप्रकरणी विकास पाटील यांनी वेळोवेळी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या.विकास पाटील एका दारूच्या दुकानावर व्यवस्थापक म्हणून नोकरीला होता. ३ आॅक्टोबर २०१२ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ते दुकानाचे शटर उघडत असताना आरोपी दोन वाहनांमध्ये आले. त्यांनी तलवारी, गुप्ती आणि चॉपरने त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर, आरोपींनी लगेच एका फार्महाउसकडे पळ काढला. वाटेत भातसा नदीमध्ये त्यांनी मोबाइल फोन आणि शस्त्रे फेकून दिली. त्यानंतर, एका फार्महाउसमध्ये गाड्या आणि कपडे लपवले. बाजारपेठ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींनी वापरलेल्या दोन्ही गाड्या हस्तगत केल्या. खुनाच्यावेळी आरोपींनी घातलेले कपडेही पोलिसांनी तपासादरम्यान हस्तगत केले. मृतक विकासचे रक्त आणि आरोपींच्या कपड्यांवरील रक्ताचे डाग एकच असल्याचे तपासणीतून निष्पन्न झाले.कल्याण सत्र न्यायालयात न्या. एन.एम. वाघमारे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. जिल्हा सरकारी वकील संगीता फड यांनी एकूण २१ साक्षीदार तपासले. खुनाच्या वेळी एक आइस्क्रीम विक्रेता आणि एक रिक्षाचालक घटनास्थळी होता. दोघेही घटनेचे प्रत्यक्षदर्शी होते. याशिवाय, विकास यांची पत्नी किशोरी यांनी न्यायालयासमोर संपूर्ण घटनाक्रम विशद केला. साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी काम पाहिले.सर्व आरोपी उंबर्डे येथीलया प्रकरणातील सर्व आरोपी कल्याणजवळच्या उंबर्डे येथील रहिवासी आहेत. आरोपींना घटनेनंतर लगेच पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगातच होते. उच्च न्यायालयापर्यंत प्रयत्न करूनही त्यांना जामीन मिळाला नव्हता.आरोपींमध्ये काका शंकर पाटील, त्यांची मुले संदीप आणि अनिल, बळीराम गजानन पाटील, त्यांची मुले प्रदीप, भरत आणि शरद, यशवंत बळीराम पाटील, त्यांचा मुलगा भगवान आणि उमेश यांच्यासह संजय लहू कारभारी आणि कबीर लहू कारभारी या दोन भावांचाही समावेश आहे. याशिवाय, रणशुल ऊर्फ रणशहा चंद्रकांत पाटील, किसन काळू पाटील, मधुकर रामचंद्र पाटील आणि मिनेश नानू पाटील यांनाही न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.१६ आरोपींच्या जन्मठेपेचे दुसरे प्रकरणडायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २००८ साली क्रिकेटच्या वादातून एका युवकाचा खून झाला होता. या प्रकरणाचा निकाल २०१२ साली लागला. त्यावेळी कल्याण न्यायालयाने या प्रकरणातील १६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणाची सरकार पक्षाची बाजू जिल्हा सरकारी वकील संगीता फड यांनी मांडली होती. त्यानंतर, एकाच वेळी १६ आरोपींना जन्मठेप होण्याचे हे दुसरे प्रकरण आहे.छातीत चॉपरचा तुकडा : घटनेच्या दिवशी आरोपींनी विकास पाटील याच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. एकाच वेळी सर्व आरोपींनी तलवारी, गुप्त्या आणि चॉपरने विकासवर वार केले. हा खून एवढा भीषण होता की, विकासची मान जवळपास धडावेगळी झाली होती. विकासच्या छातीमध्ये चॉपरचा एक तुकडाही राहिला होता. शवचिकित्सेनंतर डॉक्टरांनी तो बाहेर काढला होता.

टॅग्स :Crimeगुन्हाjailतुरुंगCourtन्यायालय