शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
3
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
5
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
6
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
7
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
8
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
9
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
10
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
11
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
12
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
13
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
14
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
15
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
16
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
17
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
18
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
19
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
20
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!

खून प्रकरणात १६ आरोपींना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 05:22 IST

जागेच्या वादातून सहा वर्षांपूर्वी झालेल्या निर्घृण खून प्रकरणामध्ये कल्याण सत्र न्यायालयाने बुधवारी १६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींमध्ये तीन पितापुत्रांचाही समावेश आहे.

ठाणे - जागेच्या वादातून सहा वर्षांपूर्वी झालेल्या निर्घृण खून प्रकरणामध्ये कल्याण सत्र न्यायालयाने बुधवारी १६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींमध्ये तीन पितापुत्रांचाही समावेश आहे.कल्याणमधील उंबर्डे येथील विकास पाटील (३२) यांचा ३ आॅक्टोबर २०१२ रोजी खून झाला होता. विकासचे काका रघुनाथ पाटील आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी काका शंकर पाटील यांच्यात घटनेच्या सात वर्षे आधीपासून जागेचा वाद होता. कल्याणच्या खाडीकिनारी रघुनाथ पाटील यांनी जमीन विकत घेतली होती. ती आपली असल्याचा आरोपीचा दावा होता. यावरून काका पाटील आणि रघुनाथ पाटील यांच्यात वेळोवेळी भांडणे व्हायची. विकासचा भाऊ विलास मध्यस्थी करून भांडणे सोडवायचा. २०१० पासून हा वाद वाढला. या वादातून आरोपींनी विकास पाटीलवर तीनचार वेळा हल्ला केला. आरोपी त्याच्या पत्नीलाही त्रास द्यायचे. याप्रकरणी विकास पाटील यांनी वेळोवेळी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या.विकास पाटील एका दारूच्या दुकानावर व्यवस्थापक म्हणून नोकरीला होता. ३ आॅक्टोबर २०१२ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ते दुकानाचे शटर उघडत असताना आरोपी दोन वाहनांमध्ये आले. त्यांनी तलवारी, गुप्ती आणि चॉपरने त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर, आरोपींनी लगेच एका फार्महाउसकडे पळ काढला. वाटेत भातसा नदीमध्ये त्यांनी मोबाइल फोन आणि शस्त्रे फेकून दिली. त्यानंतर, एका फार्महाउसमध्ये गाड्या आणि कपडे लपवले. बाजारपेठ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींनी वापरलेल्या दोन्ही गाड्या हस्तगत केल्या. खुनाच्यावेळी आरोपींनी घातलेले कपडेही पोलिसांनी तपासादरम्यान हस्तगत केले. मृतक विकासचे रक्त आणि आरोपींच्या कपड्यांवरील रक्ताचे डाग एकच असल्याचे तपासणीतून निष्पन्न झाले.कल्याण सत्र न्यायालयात न्या. एन.एम. वाघमारे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. जिल्हा सरकारी वकील संगीता फड यांनी एकूण २१ साक्षीदार तपासले. खुनाच्या वेळी एक आइस्क्रीम विक्रेता आणि एक रिक्षाचालक घटनास्थळी होता. दोघेही घटनेचे प्रत्यक्षदर्शी होते. याशिवाय, विकास यांची पत्नी किशोरी यांनी न्यायालयासमोर संपूर्ण घटनाक्रम विशद केला. साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी काम पाहिले.सर्व आरोपी उंबर्डे येथीलया प्रकरणातील सर्व आरोपी कल्याणजवळच्या उंबर्डे येथील रहिवासी आहेत. आरोपींना घटनेनंतर लगेच पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगातच होते. उच्च न्यायालयापर्यंत प्रयत्न करूनही त्यांना जामीन मिळाला नव्हता.आरोपींमध्ये काका शंकर पाटील, त्यांची मुले संदीप आणि अनिल, बळीराम गजानन पाटील, त्यांची मुले प्रदीप, भरत आणि शरद, यशवंत बळीराम पाटील, त्यांचा मुलगा भगवान आणि उमेश यांच्यासह संजय लहू कारभारी आणि कबीर लहू कारभारी या दोन भावांचाही समावेश आहे. याशिवाय, रणशुल ऊर्फ रणशहा चंद्रकांत पाटील, किसन काळू पाटील, मधुकर रामचंद्र पाटील आणि मिनेश नानू पाटील यांनाही न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.१६ आरोपींच्या जन्मठेपेचे दुसरे प्रकरणडायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २००८ साली क्रिकेटच्या वादातून एका युवकाचा खून झाला होता. या प्रकरणाचा निकाल २०१२ साली लागला. त्यावेळी कल्याण न्यायालयाने या प्रकरणातील १६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणाची सरकार पक्षाची बाजू जिल्हा सरकारी वकील संगीता फड यांनी मांडली होती. त्यानंतर, एकाच वेळी १६ आरोपींना जन्मठेप होण्याचे हे दुसरे प्रकरण आहे.छातीत चॉपरचा तुकडा : घटनेच्या दिवशी आरोपींनी विकास पाटील याच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. एकाच वेळी सर्व आरोपींनी तलवारी, गुप्त्या आणि चॉपरने विकासवर वार केले. हा खून एवढा भीषण होता की, विकासची मान जवळपास धडावेगळी झाली होती. विकासच्या छातीमध्ये चॉपरचा एक तुकडाही राहिला होता. शवचिकित्सेनंतर डॉक्टरांनी तो बाहेर काढला होता.

टॅग्स :Crimeगुन्हाjailतुरुंगCourtन्यायालय