शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

सीगल्सच्या सुरक्षेसाठी आता पालिका करणार जगजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:37 IST

ठाणे : जनजागृती करूनही मासुंदा तलावात विहार करणाऱ्या कुरव (सीगल्स) पक्ष्यांना मानवी खाद्यपदार्थ टाकणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी ...

ठाणे : जनजागृती करूनही मासुंदा तलावात विहार करणाऱ्या कुरव (सीगल्स) पक्ष्यांना मानवी खाद्यपदार्थ टाकणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी संस्थांनी ठाणे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन केली. परंतु, या मागणीकडे पालिकेने आठवडाभर दुर्लक्ष केल्याचा आरोप पर्यावरण संस्थांनी केला. ही माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पोहोचल्यावर त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घटनास्थळी जाऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार, रविवारी सकाळी पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांत संपूर्ण तलावाभोवती जागृतीपर फलक लावण्याचे, तसेच नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

मासुंदा तलावामधील कुरव पक्ष्यांना काही बेजबाबदार नागरिक मानवी खाद्यपदार्थ टाकून त्यांच्या जीवाशी खेळतात. नागरिकांच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांप्रमाणेच तलावातील जीवसृष्टीवर व नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरित परिणाम होतो. याबाबत येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीच्या संलग्न संस्था तसेच मराठा जागृती मंच, वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशन, पर्यावरण दक्षता मंडळ या पर्यावरणवादी संस्थांतर्फे जनजागरण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. बहुसंख्य नागरिकांकडून या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत असला, तरी काही बेजबाबदार नागरिक उद्दामपणे वागतात. सूचनांचे पालन न करता पक्ष्यांना शेव, गाठी आदी खाद्यपदार्थ टाकून नियम मोडतात. महानगरपालिकेला याची माहिती देण्यात आली होती. सीगल पक्ष्यांना त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक खायला टाकणे बेकायदेशीर आहे. या आशयाचे या ठिकाणी माहितीपर फलक बसवावेत. सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा. स्वच्छता मार्शल्स नेमून दिवसभर कारवाई करावी, अशी मागणी येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार, रविवारी सकाळी ठामपा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्य अधिकारी मनीषा प्रधान यांनी कर्मचाऱ्यांसह वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी जनजागरण कार्यक्रमात हजेरी लावली, असे येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीचे समन्वयक रोहित जोशी यांनी सांगितले.

यावेळी प्रधान यांनी येथे उपस्थित नागरिकांना सरकारच्या माझी वसुंधरा कार्यक्रमांतर्गत मासुंदा तलावाचे संवर्धन करण्याची शपथ दिली. मासुंदा तलाव प्रदूषित करणार नाही व त्याचे संवर्धन करीन अशी शपथ उपस्थितांनी घेतली. यावेळी मराठा जागृती मंच पानिपत, ठाणे विभाग अध्यक्ष संजय जाधव, सुधाकर पतंगराव पर्यावरण दक्षता मंडळाचे हेमंत नाईक, डब्ल्यूडब्ल्यूएचे आशीष साळुंके, निखिल जाधव उपस्थित होते.

-------