शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

सीगल्सच्या सुरक्षेसाठी आता पालिका करणार जगजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:37 IST

ठाणे : जनजागृती करूनही मासुंदा तलावात विहार करणाऱ्या कुरव (सीगल्स) पक्ष्यांना मानवी खाद्यपदार्थ टाकणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी ...

ठाणे : जनजागृती करूनही मासुंदा तलावात विहार करणाऱ्या कुरव (सीगल्स) पक्ष्यांना मानवी खाद्यपदार्थ टाकणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी संस्थांनी ठाणे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन केली. परंतु, या मागणीकडे पालिकेने आठवडाभर दुर्लक्ष केल्याचा आरोप पर्यावरण संस्थांनी केला. ही माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पोहोचल्यावर त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घटनास्थळी जाऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार, रविवारी सकाळी पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांत संपूर्ण तलावाभोवती जागृतीपर फलक लावण्याचे, तसेच नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

मासुंदा तलावामधील कुरव पक्ष्यांना काही बेजबाबदार नागरिक मानवी खाद्यपदार्थ टाकून त्यांच्या जीवाशी खेळतात. नागरिकांच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांप्रमाणेच तलावातील जीवसृष्टीवर व नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरित परिणाम होतो. याबाबत येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीच्या संलग्न संस्था तसेच मराठा जागृती मंच, वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशन, पर्यावरण दक्षता मंडळ या पर्यावरणवादी संस्थांतर्फे जनजागरण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. बहुसंख्य नागरिकांकडून या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत असला, तरी काही बेजबाबदार नागरिक उद्दामपणे वागतात. सूचनांचे पालन न करता पक्ष्यांना शेव, गाठी आदी खाद्यपदार्थ टाकून नियम मोडतात. महानगरपालिकेला याची माहिती देण्यात आली होती. सीगल पक्ष्यांना त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक खायला टाकणे बेकायदेशीर आहे. या आशयाचे या ठिकाणी माहितीपर फलक बसवावेत. सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा. स्वच्छता मार्शल्स नेमून दिवसभर कारवाई करावी, अशी मागणी येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार, रविवारी सकाळी ठामपा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्य अधिकारी मनीषा प्रधान यांनी कर्मचाऱ्यांसह वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी जनजागरण कार्यक्रमात हजेरी लावली, असे येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीचे समन्वयक रोहित जोशी यांनी सांगितले.

यावेळी प्रधान यांनी येथे उपस्थित नागरिकांना सरकारच्या माझी वसुंधरा कार्यक्रमांतर्गत मासुंदा तलावाचे संवर्धन करण्याची शपथ दिली. मासुंदा तलाव प्रदूषित करणार नाही व त्याचे संवर्धन करीन अशी शपथ उपस्थितांनी घेतली. यावेळी मराठा जागृती मंच पानिपत, ठाणे विभाग अध्यक्ष संजय जाधव, सुधाकर पतंगराव पर्यावरण दक्षता मंडळाचे हेमंत नाईक, डब्ल्यूडब्ल्यूएचे आशीष साळुंके, निखिल जाधव उपस्थित होते.

-------