शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभिकरणासाठी सरकारी जागेच्या ताब्यावरुन पालिका अधिकारी संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 19:08 IST

भार्इंदर - गेल्या अनेक वर्षांपासून घोडबंदर किल्ल्याचे रखडलेले सुशोभीकरण करण्यासाठी सुमारे ५ एकर सरकारी जागा पालिकेच्या ताब्यात आल्याचा दावा आ. प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी आयुक्त दालनात आयोजित बैठकीत केला.

राजू काळेभार्इंदर - गेल्या अनेक वर्षांपासून घोडबंदर किल्ल्याचे रखडलेले सुशोभीकरण करण्यासाठी सुमारे ५ एकर सरकारी जागा पालिकेच्या ताब्यात आल्याचा दावा आ. प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी आयुक्त दालनात आयोजित बैठकीत केला. मात्र ही जागा अद्याप ताब्यातच आली नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितल्याने ते अधिकारी सरनाईकांच्या दाव्यामुळे संभ्रमात पडले. त्यावर आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी, त्याची माहिती घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने तूर्तास अधिका-यांच्या संभ्रमावस्थेवर पडदा पडला.घोडबंदर किल्ल्याला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी)अनेकदा करण्यात आला. परंतु त्याचे काम तांत्रिक अडचणीत सापडल्याने कामे अर्धवटच राहिल्याने सध्या हा किल्ला डागडुजीच्या प्रतीक्षेत आहे. किल्ला परिसरात असलेली सुमारे ४ हजार चौरस मीटर जागा पालिकेने पर्यटन विकासासाठी आरक्षित केली असून त्या जागेवरील विकासासाठी एमटीडीसीची नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या जागेलगतच सुमारे ५ एकर सरकारी जागा पालिकेने विकास आराखड्यानुसार नागरी सुविधांसाठी आरक्षित केली आहे. महसूल विभागाची जागा पालिकेला पर्यटन विकासासाठी मिळावी, यासाठी आ. सरनाईक यांनी राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्याची दखल घेत जुलै २०१४ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी पी. वेलुरासु व तत्कालीन पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी किल्ला परिसराची पाहणी केली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी किल्ला सुशोभीकरणासाठी १ कोटींचा निधी देण्याचे मान्य केले.पालिकेकडुन सुद्धा विकासाच्या खर्चाला हातभार लावला जाईल, असे आश्वासन तत्कालीन आयुक्तांनी दिले. त्यावेळेपासुन पालिका अंदाजपत्रकात किल्ला परिसराच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधींची तरतूद करण्यात आली. दरम्यान ती सरकारी जागा पालिकेकडे हस्तांतरित न झाल्याने आ. सरनाईक यांनी राज्य सरकारकडे पुन्हा पाठपुरावा सुरू केला. त्यानुसार महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकूमार श्रीवास्तव यांच्याकडे २३ नोव्हेंबर २०१६ रोजी बैठक पार पडली. त्यात ४ हजार चौरस मीटर जागेचा विकास एमटीडीसीने करावा. तर ५ एकर सरकारी जागा नियमानुसार पालिकेला विकासासाठी हस्तांतरित करण्याचे निर्देश प्रधान सचिवांनी जिल्हा प्रशासनाला दिले.परंतु ही जागा पालिकेच्या ताब्यात अद्याप आली नसल्याचे पालिका अधिका-यांनी सांगितले. मात्र सरनाईक यांनी ती जागा पालिकेच्या ताब्यात देण्यात आल्याचा दावा करून अधिका-यांच्या वेळकाढूपणावर आसूड ओढले. तसेच संबंधित अधिका-यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. यावेळी नगरसेवक जयंतीलाल पाटील, धनेश पाटील, नगरसेविका संध्या पाटील, अर्चना कदम, शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता दीपक खांबित, सहाय्यक नगररचनाकार राजेंद्र पांगळ आदी उपस्थित होते.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर