शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
4
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
5
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
6
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
7
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
8
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
9
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
10
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
11
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
12
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
13
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
14
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
15
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
16
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
18
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
19
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
20
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभिकरणासाठी सरकारी जागेच्या ताब्यावरुन पालिका अधिकारी संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 19:08 IST

भार्इंदर - गेल्या अनेक वर्षांपासून घोडबंदर किल्ल्याचे रखडलेले सुशोभीकरण करण्यासाठी सुमारे ५ एकर सरकारी जागा पालिकेच्या ताब्यात आल्याचा दावा आ. प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी आयुक्त दालनात आयोजित बैठकीत केला.

राजू काळेभार्इंदर - गेल्या अनेक वर्षांपासून घोडबंदर किल्ल्याचे रखडलेले सुशोभीकरण करण्यासाठी सुमारे ५ एकर सरकारी जागा पालिकेच्या ताब्यात आल्याचा दावा आ. प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी आयुक्त दालनात आयोजित बैठकीत केला. मात्र ही जागा अद्याप ताब्यातच आली नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितल्याने ते अधिकारी सरनाईकांच्या दाव्यामुळे संभ्रमात पडले. त्यावर आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी, त्याची माहिती घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने तूर्तास अधिका-यांच्या संभ्रमावस्थेवर पडदा पडला.घोडबंदर किल्ल्याला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी)अनेकदा करण्यात आला. परंतु त्याचे काम तांत्रिक अडचणीत सापडल्याने कामे अर्धवटच राहिल्याने सध्या हा किल्ला डागडुजीच्या प्रतीक्षेत आहे. किल्ला परिसरात असलेली सुमारे ४ हजार चौरस मीटर जागा पालिकेने पर्यटन विकासासाठी आरक्षित केली असून त्या जागेवरील विकासासाठी एमटीडीसीची नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या जागेलगतच सुमारे ५ एकर सरकारी जागा पालिकेने विकास आराखड्यानुसार नागरी सुविधांसाठी आरक्षित केली आहे. महसूल विभागाची जागा पालिकेला पर्यटन विकासासाठी मिळावी, यासाठी आ. सरनाईक यांनी राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्याची दखल घेत जुलै २०१४ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी पी. वेलुरासु व तत्कालीन पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी किल्ला परिसराची पाहणी केली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी किल्ला सुशोभीकरणासाठी १ कोटींचा निधी देण्याचे मान्य केले.पालिकेकडुन सुद्धा विकासाच्या खर्चाला हातभार लावला जाईल, असे आश्वासन तत्कालीन आयुक्तांनी दिले. त्यावेळेपासुन पालिका अंदाजपत्रकात किल्ला परिसराच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधींची तरतूद करण्यात आली. दरम्यान ती सरकारी जागा पालिकेकडे हस्तांतरित न झाल्याने आ. सरनाईक यांनी राज्य सरकारकडे पुन्हा पाठपुरावा सुरू केला. त्यानुसार महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकूमार श्रीवास्तव यांच्याकडे २३ नोव्हेंबर २०१६ रोजी बैठक पार पडली. त्यात ४ हजार चौरस मीटर जागेचा विकास एमटीडीसीने करावा. तर ५ एकर सरकारी जागा नियमानुसार पालिकेला विकासासाठी हस्तांतरित करण्याचे निर्देश प्रधान सचिवांनी जिल्हा प्रशासनाला दिले.परंतु ही जागा पालिकेच्या ताब्यात अद्याप आली नसल्याचे पालिका अधिका-यांनी सांगितले. मात्र सरनाईक यांनी ती जागा पालिकेच्या ताब्यात देण्यात आल्याचा दावा करून अधिका-यांच्या वेळकाढूपणावर आसूड ओढले. तसेच संबंधित अधिका-यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. यावेळी नगरसेवक जयंतीलाल पाटील, धनेश पाटील, नगरसेविका संध्या पाटील, अर्चना कदम, शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता दीपक खांबित, सहाय्यक नगररचनाकार राजेंद्र पांगळ आदी उपस्थित होते.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर