शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

पालिका आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 04:50 IST

भार्इंदरमध्ये कंत्राटदारांची बिले रखडली : अनुदानात ३४ कोटींची घट

राजू काळेभार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेला राज्य सरकारकडून जीएसटीपोटी देण्यात येणाऱ्या अनुदानात वार्षिक ३४ कोटींची घट झाली असल्याने पालिकेचा आर्थिक डोलारा कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे जीएसटीच्या उत्पन्नातील घट झाल्याने पालिकेची आर्थिक परिस्थिती ढासळत असतानाही प्रशासन सत्ताधाºयांच्या दबावाखाली विकासकामांच्या निविदा काढत असल्याने त्याला लागणारा निधी कसा काय उभा करायचा, असा प्रश्न अधिकाºयांसमोर उभा ठाकला असल्याची चर्चा सध्या पालिकेत सुरू झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कंत्राटदारांची बिले रखडली असताना नवीन निविदा काढल्या जात आहेत. पालिकेची आर्थिक बाजू सक्षम नसल्याने राखीव निधीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. अग्निशमन दलासाठी राखीव ठेवलेला निधी प्रशासकीय खर्चासाठी वापरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याला काही अधिकाºयांनी ठामपणे नकार दिल्याने तूर्तास राखीव निधी शाबूत राहिला आहे. अगोदरच पालिकेच्या माथी एमएमआरडीएचे सुमारे ३०० कोटींचे कर्ज आहे. त्यापोटी पालिकेला वार्षिक ४० कोटींचा हप्ता भरावा लागत आहे. आणखी नव्या कर्जाचे प्रस्ताव प्रशासनाकडून तयार केले जात आहेत. नवीन काँक्रिटच्या रस्त्यांसाठी १०० कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव एमएमआरडीएकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.

यापूर्वी एमएमआरडीएने नियोजित तीन उड्डाणपुलांच्या बांधकामासाठी पालिकेने पाठवलेला कर्जाचा प्रस्ताव नाकारला होता. पालिकेची आर्थिक बाजू सक्षम नसल्याचे कारण एमएमआरडीएने दिले होते. कर्जफेडीसाठी उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण केल्यास कर्ज देण्याचा विचार करू, असे स्पष्ट केले होते. अखेर, आ. नरेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत कर्जास मंजुरी मिळवली होती.अलीकडेच पार पडलेल्या विशेष महासभेत नवीन पंतप्रधान आवास योजनेंतर्गत रेंगाळलेली तत्कालीन बीएसयूपी योजना पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएकडे सुमारे १५० कोटी कर्जाचा प्रस्ताव येत्या डिसेंबर महिन्यात पाठवण्यात येणार असल्याचे आयुक्त बालाजी खतगावकर यांनी स्पष्ट केले.पालिकेला सध्या मिळणारे अनुदान पूर्वीप्रमाणेच मिळावे, यासाठी पालिकेने राज्य सरकारकडे पत्रव्यवहार सुरू केला आहे. ते मिळाल्यास त्यातून आर्थिक ताळमेळ साधता येऊ शकेल.- शरद बेलवटे, मुख्य लेखाधिकारी, मीरा-भार्इंदर महापालिकादरवर्षी २०० कोटींहून अधिक उत्पन्नपालिकेला मुद्रांक शुल्कावरील एक टकका अधिभारातून दरवर्षी सुमारे ३५ कोटींचे अनुदान मिळते. तसेच पालिकेने आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सुरुवातीला जकात, त्यानंतर उपकर व शेवटी स्थानिक संस्थाकर लागू केला. यातून दरवर्षाच्या वाढीतून सुमारे २०० कोटींहून अधिक उत्पन्न पालिकेला मिळत होते. यानंतर, लागू झालेल्या जीएसटीद्वारे पालिकेला अनुदान देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले.सुरुवातीला पालिकेला सुमारे २३४ कोटींसह मुद्रांक शुल्कावरील अधिभारापोटी सुमारे ३५ कोटी असे सुमारे २६९ कोटींचे अनुदान मिळत होते. परंतु, राज्य सरकारने जीएसटीच्या अनुदानात कपात केल्याने पालिकेला ६९ कोटींचे अनुदान कमी मिळू लागले आहे. त्यातच मुद्रांक शुल्कापोटी मिळणारे अनुदान जीएसटीच्या अनुदानातच वळते करण्यात आल्याने पालिकेचे वर्षाकाठी तब्बल ३४ कोटींचे आर्थिक नुकसान होत आहे.

टॅग्स :thaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदरTaxकर