शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

भिवंडीत रुग्णसंख्या वाढत असतांनाही सुसज्ज आरोग्य यंत्रणा उभारण्यास मनपा अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 7:30 PM

मागील वर्षी कोविड सेंटरवर केलेला कोट्यावधींचा खर्च वाया 

नितिन पंडीत

भिवंडी ( दि. १५ ) भिवंडी शहरात दुसऱ्या करोना लाटेत रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना सुसज्य आरोग्य यंत्रणा उभी करण्यात भिवंडी मनपा प्रशासनास अपयश आल्याने शहरातील गरीब रुग्णांनाही खाजगी रुग्णालयात महागडे उपचार घेण्याची वेळ आली आहे . विशेष म्हणजे पालिकेने मागील वर्षी पहिल्या करोना लाटेत कोट्यावधींचा खर्च करून उभारलेली आरोग्य यंत्रणा कार्यान्वित न करता धूळ खात पडून असल्याने पालिका प्रशासना कडून स्वतःचे अपयश झाकून ठेवण्याचा प्रकार समोर आला आहे. मनपा प्रशासनाच्या या दुर्लक्षित कारभारावर नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत. 

                कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतांनाही मनपाकडे आज फक्त १३३ बेडचे एकच कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. लाखोंची लोकसंख्या असतांनाही मनपाने केवळ एकच कोविड सेंटर सुरु ठेवल्याने नागरिकांकडून मनपा प्रशासनाच्या हलगर्जी कारभारविरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. 

                भिवंडी शहरात मागच्या लाटेत सुरवातीला मृत्यूचे प्रमाण वाढले होते. मागील मे, जुन मध्ये मृत्यू दर देखील १२ % एवढा होता. रुग्णसंख्या व मृत्यूदरात वाढ झाल्याने मागील वर्षी शहरात स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात सर्व सोयी सुविधांसह कोविड रुग्णालय सुरु केले होते. त्याचबरोबर शहरात खुदाबक्ष हाॅल, टाटा आमंत्रण, रईस हायस्कूल व वऱ्हाळ देवी हाॅल येथे देखील सुसज्य कोविड सेंटर सुरू केले होते. या कोविड सेंटरच्या उभारणीसाठी त्यावेळी लाखो करोडोंचा खर्च मनपा प्रशासनाने केला होता. मात्र त्याचा फायदा झाल्याने शहरातील मृत्युदर अवघ्या ३ % पर्यंत खाली आला व रुग्ण बरे होण्याच्या अकड्यांमध्ये देखील रोज वाढ होत राहिली. विशेष म्हणजे गेल्या वर्षी सुरु केलेली ही सुसज्य यंत्रणा या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णासंख्या वाढत असतांना देखील धूळ खात पडली आहे. हे सर्व कोविड सेंटर आज बंद आहेत. त्यामुळे कोरोना वाढत असतांना देखील मनपा प्रशासन गाफील का आहे याचे नेमकी कारण स्पष्ट होत नाही. 

               एकीकडे ऑक्सीजन विना आज अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत असताना आयजीएम रुग्णालया बाहेर कोट्यवधी रुपयांचे ऑक्सीजन टॅंक फक्त काय शोभेसाठी लावले आहेत का असा सवाल देखील नागरिक उपस्थित करीत आहेत. आयजीएम रुग्णालयात ४५ व्हेंटिलेटर व टेली आयसीयू सारख्या अत्याधुनिक सुविधा असताना त्या यंत्रणा धूळखात ठेवून प्रशासन नक्की काय साध्य करत आहे असा सवाल देखील उपस्थित होत आहे. त्यातच मागील वर्षी करोना च्या पहिल्या लाटेत पालिकेने टाटा आमंत्रण येथील विलगिकरण सह भिवंडी शहरात खुदाबक्ष हॉल, रईस हायस्कुल ,वऱ्हाळ देवी हॉल असे मिळून तब्बल एक हजार बेड रुग्णांसाठी उपलब्ध ठेवले होते .परंतु नंतर ही सर्व यंत्रणा बंद केली व आता पुन्हा दुसऱ्या लाटेत फक्त खुदाबक्ष हॉल येथील केंद्र सुरू करून पालिका क्षेत्रा सह पालिका क्षेत्रा बाहेरील १८  खाजगी रुग्णालयात रुग्ण दाखल करण्याची सोय उपलब्ध केली आहे. मात्र या खासगी रुग्णालयांमध्ये सध्या बेड व ऑक्सीजन उपलब्ध नसल्याने रुग्णांची उपचारा विना तडफड सुरू झाली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने मागील वर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून सुरु केलेली यंत्रणा पुन्हा सुरु करावी अशी मागणी जोर धरत आहे. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस