शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जेवणात एक रोटी कमी पडल्याने मुंब्रा येथील तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 01:11 IST

मुंब्रा येथे जेवताना एक तंदूर रोटी कमी पडली म्हणून शमुल हुसेन या तरु णाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

मुंब्रा : देशात लोकशाहीचा उरूस सुरू असून कोट्यवधी रुपये पाण्यासारखे खर्च केले जात असताना मुंब्रा येथे जेवताना एक तंदूर रोटी कमी पडली म्हणून शमुल हुसेन या तरु णाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हुसेन याच्या कुटुंबाकडे आणखी एक रोटी आणायला पैसा नव्हता, त्यामुळे त्याने गळफास लावून घेतला की, रोटी आणण्याकरिता पुन्हा कुणी घराबाहेर पडायचे, यावरून वाद होऊन त्याने हे पाऊल उचलले किंवा वरकरणी रोटी हे कारण सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात काही वेगळेच कारण आहे, अशा सर्व शक्यतांचा शोध पोलीस घेत आहेत.येथील कौसा भागातील श्रीलंका परिसरातील चाळीमध्ये शमुल हुसेन हा पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता. घरात चार माणसे असतानाही रात्री जेवणासाठी त्याने तीन रोट्या आणल्या होत्या. त्याच्या लहान मुलीने भूक लागल्याने रोटी मागितल्याने उभयतांमध्ये वाद झाला. हुसेन याची परिस्थिती बेताची असल्याने आणखी एक रोटी आणणे अशक्य असल्याने वाद सुरू झाला की, रोटी आणण्याकरिता पुन्हा कुणी खाली उतरायचे, यावरून वाद झाला, ते स्पष्ट नाही. त्याच्या पत्नीने पुन्हा रोटी कुणी आणायची, यावरून वाद झाल्याचे कारण पोलिसांना सांगितले आहे. गुरुवारी पहाटे ३ वाजता त्याने त्याची पत्नी आणि मुलांना घराबाहेर काढून घरात फाशी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या पत्नीने दिली. आपण आपल्या पत्नी व मुलांचे धड पोट भरू शकत नाही, या अपराधी भावनेतून हुसेन याने हे कृत्य केले किंवा कसे, ते अद्याप स्पष्ट नाही.मात्र, खिशात पैसे असताना केवळ रोटी आणण्याकरिता खाली उतरण्यावरून वाद होऊन हुसेन याने आत्महत्या केली, या त्याच्या पत्नीने केलेल्या दाव्यावर विश्वास ठेवायला पोलीस तयार नाहीत. मुळात हा दावा कुणाला पटणारा नाही. त्यामुळे गरिबी, बेरोजगारी व वाढत्या महागाईतील कुतरओढ व त्यातून येणारे नैराश्य, हेच हुसेन याच्या तडकाफडकी मृत्यूला कवटाळण्यामागील कारण असू शकते, असे पोलिसांचेही मत आहे. हुसेनचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टमकरिता पाठवला आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर हुसेन याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली की, अन्य कारणास्तव त्याची हत्या केल्यानंतर ही आत्महत्या असल्याचे भासवले गेले, याचा उलगडा होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा सर्व अंगांनी तपास सुरू असल्याचे मुंब्रा पोलिसांनी स्पष्ट केले आहे.>मनोविकाराची शक्यता?काही ह्युमन सायकॉलॉजीस्टचे म्हणणे आहे की, बेरोजगारी व गरिबीमुळे छोट्या कारणास्तवही माणूस मृत्यूला कवटाळू शकतो. हुसेन हा अगोदरच मानसिक आजाराने ग्रस्त होता का? त्याच्या कुटुंबीयांना ही गोष्ट लक्षात आली होती किंवा कसे, असेही प्रश्न त्यांनी केलेत.