शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच मुंब्रा उड्डाणपूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:43 IST

ठाणे/मुंब्रा : येथील मुंब्रा-शीळ-कल्याण आणि ऐरोलीला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम ५० टक्क्यांच्या आसपास पूर्ण झाले आहे. मात्र, हा पूल आताच ...

ठाणे/मुंब्रा : येथील मुंब्रा-शीळ-कल्याण आणि ऐरोलीला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम ५० टक्क्यांच्या आसपास पूर्ण झाले आहे. मात्र, हा पूल आताच धोकादायक झाला असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप शनिवारी सकाळी ठाणे महापालिका विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केला.

शनिवारी या पुलाची पाहणी करून त्यांनी ही बाब उघडकीस आणली. मुंब्रा-शीळ-कल्याण आणि ऐरोलीला परिसरातील वाहतूककोंडी दूर होण्याच्या उद्देशाने मुंब्रा वाय जंक्शन येथे एमएमआरडीए उड्डाणपूल बांधत आहे. त्याच्या बांधकामाची पठाण यांच्यासह विक्रम खामकर, साकिब दाते यांनी पाहणी केली. बांधकामात वापरण्यात येत असलेल्या सळई अत्यंत कमकुवत असून, त्यांना रसायनांचा लेप लावला जात नाही. त्यामुळे या सळईंना गंज लागून त्या आतच तुटण्याची शक्यता आहे. त्याशिवाय बांधकाम साहित्यही अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने हा पूल पूर्ण होण्याआधीच धोकादायक झाला असून, त्याला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे मुंबईत जशी पूल कोसळण्याची घटना घडली, तशी येथेही घडण्याची दाट शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. बांधकाम सुरू असतानाच अशी अवस्था असेल तर हा पूल दहा वर्षे तरी टिकेल का? या पुलावरून अवजड वाहतूक होणार आहे. मात्र, स्वत:च्या फायद्यासाठी ठेकेदाराने जाणीवपूर्वक निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून जनतेच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार केला आहे. या विरोधात आपण एमएमआयडीए, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे लेखी तक्रार करून एसएनसी या ठेकेदारावर कारवाईची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.