शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

खड्ड्यांपासून जिवाला धोका; त्याला हवंय पोलीस संरक्षण ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 12:17 IST

तरुणानं चक्क खड्ड्यांपासून आपल्या जिवाला धोका असल्याचं सांगत पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी केली आहे.

कल्याण - एखाद्या व्यक्तीपासून जिवाला धोका निर्माण झाल्यास पोलीस संरक्षण पुरवण्याची  मागणी केल्याचे आपण ऐकलं असेलच. मात्र कल्याणमधील एका तरुणानं वेगळ्याच कारणासाठी पोलीस संरक्षण मागितल्यानं पोलीसदेखील हैराण झाले आहेत. या तरुणानं चक्क खड्ड्यांपासून आपल्या जिवाला धोका असल्याचं सांगत पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी केली आहे. रस्त्यांची दुरवस्था, निकृष्ट दर्जाचे रस्ते आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या रस्त्यांच्या समस्यांमुळे त्रस्त झालेल्या 34 वर्षीय स्टॉक ब्रोकर चिराग हरिया यांनी अनोखे पाऊल उचललं आहे. चिराग हरिया यांनी डोंबिवलीहून कल्याणमध्ये कामासाठी प्रवास करताना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. एवढंच नाही तर संरक्षण पुरवल्यास त्यासाठी पैसे मोजण्याचीही तयारीही हरिया यांनी दर्शवली आहे. 

हरिया ज्या मार्गावरुन म्हणजेच कल्याणमधील शिवाजी चौकातून कार्यालय गाठतात त्याच मार्गावर काही दिवसांपूर्वी खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात दोन निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये एका 5 वर्षांच्या मुलाचा आणि महिलेचा समावेश आहे. वारंवार होणाऱ्या या अपघात व रस्त्यांवरच्या खड्ड्यांना वैतागून अखेर हरिया यांनी पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी केली.  रविवारी (8 जुलै) त्यांनी महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये याबाबत लेखी अर्ज दिला. या अर्जामध्ये त्यांनी धोकादायक रस्ता पार करण्यासाठी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. 

चिराग यांच्या मागणीमुळे पोलीस हैराणचिराग हरिया यांनी अशा पद्धतीनं मागणी केल्यानं पोलीस अचंबित झाले.  पोलिसांनी त्यांचा अर्ज पोलीस उपायुक्तांकडे दिला. मात्र त्यांच्याकडून कोणतेही उत्तर न मिळाल्यानं हरिया यांनी आपलं म्हणणं मांडण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. त्यांनी आपली मागणी ट्विटरवर पोस्ट केली.  हरिया यांनी असे ट्विट केले की, प्रवासासाठी हा रस्ता अतिशय धोकादायक आहे. यासाठी मी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली होती. संरक्षण पुरवल्यास मी पैसे देण्यासही तयार आहे. पावसाचं पाणी रस्त्यांवर साचतं तेव्हा कोठे खड्डा आहे? हा खड्डा किती मोठा? याचा अंदाज लावणं अशक्य असते. यामुळे मोठे अपघात होऊन निष्पापांना आपला जीव गमवावा लागतो. 

दरम्यान, पोलीस निरीक्षक प्रदीप यांनी हरिया यांच्या पोलीस संरक्षण पुरवण्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. मात्र खड्डेयुक्त रस्त्यांवरुन प्रवास  करण्यास भीती वाटते म्हणून एखाद्या व्यक्तीला कसे संरक्षण पुरवणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

टॅग्स :Mumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेटDeathमृत्यूkalyanकल्याण