शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

खड्ड्यांपासून जिवाला धोका; त्याला हवंय पोलीस संरक्षण ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 12:17 IST

तरुणानं चक्क खड्ड्यांपासून आपल्या जिवाला धोका असल्याचं सांगत पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी केली आहे.

कल्याण - एखाद्या व्यक्तीपासून जिवाला धोका निर्माण झाल्यास पोलीस संरक्षण पुरवण्याची  मागणी केल्याचे आपण ऐकलं असेलच. मात्र कल्याणमधील एका तरुणानं वेगळ्याच कारणासाठी पोलीस संरक्षण मागितल्यानं पोलीसदेखील हैराण झाले आहेत. या तरुणानं चक्क खड्ड्यांपासून आपल्या जिवाला धोका असल्याचं सांगत पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी केली आहे. रस्त्यांची दुरवस्था, निकृष्ट दर्जाचे रस्ते आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या रस्त्यांच्या समस्यांमुळे त्रस्त झालेल्या 34 वर्षीय स्टॉक ब्रोकर चिराग हरिया यांनी अनोखे पाऊल उचललं आहे. चिराग हरिया यांनी डोंबिवलीहून कल्याणमध्ये कामासाठी प्रवास करताना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. एवढंच नाही तर संरक्षण पुरवल्यास त्यासाठी पैसे मोजण्याचीही तयारीही हरिया यांनी दर्शवली आहे. 

हरिया ज्या मार्गावरुन म्हणजेच कल्याणमधील शिवाजी चौकातून कार्यालय गाठतात त्याच मार्गावर काही दिवसांपूर्वी खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात दोन निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये एका 5 वर्षांच्या मुलाचा आणि महिलेचा समावेश आहे. वारंवार होणाऱ्या या अपघात व रस्त्यांवरच्या खड्ड्यांना वैतागून अखेर हरिया यांनी पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी केली.  रविवारी (8 जुलै) त्यांनी महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये याबाबत लेखी अर्ज दिला. या अर्जामध्ये त्यांनी धोकादायक रस्ता पार करण्यासाठी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. 

चिराग यांच्या मागणीमुळे पोलीस हैराणचिराग हरिया यांनी अशा पद्धतीनं मागणी केल्यानं पोलीस अचंबित झाले.  पोलिसांनी त्यांचा अर्ज पोलीस उपायुक्तांकडे दिला. मात्र त्यांच्याकडून कोणतेही उत्तर न मिळाल्यानं हरिया यांनी आपलं म्हणणं मांडण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. त्यांनी आपली मागणी ट्विटरवर पोस्ट केली.  हरिया यांनी असे ट्विट केले की, प्रवासासाठी हा रस्ता अतिशय धोकादायक आहे. यासाठी मी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली होती. संरक्षण पुरवल्यास मी पैसे देण्यासही तयार आहे. पावसाचं पाणी रस्त्यांवर साचतं तेव्हा कोठे खड्डा आहे? हा खड्डा किती मोठा? याचा अंदाज लावणं अशक्य असते. यामुळे मोठे अपघात होऊन निष्पापांना आपला जीव गमवावा लागतो. 

दरम्यान, पोलीस निरीक्षक प्रदीप यांनी हरिया यांच्या पोलीस संरक्षण पुरवण्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. मात्र खड्डेयुक्त रस्त्यांवरुन प्रवास  करण्यास भीती वाटते म्हणून एखाद्या व्यक्तीला कसे संरक्षण पुरवणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

टॅग्स :Mumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेटDeathमृत्यूkalyanकल्याण