शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

प्रशासनाच्या मनमानीविरोधात महावितरण कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 13:54 IST

या कर्मचाऱ्यांचे हाल झाले, त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केले असल्याचे यावेळी फेडरेशनच्या वतीने सांगण्यात आले.

ठाणे  : संपूर्ण राज्यात नुकत्याच झालेल्या निर्सग चक्रीवादामुळे खुप मोठे नुकसान झाले. त्यामुळे वीज पुरवठा देखील अनेक ठिकाणी खंडीत झाला होता. परंतु तो सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी युध्द पातळीवर काम करण्यास तयार झाले. त्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करण्याची विनंती महावितरण प्रशासनाला करण्यात आली होती. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष करुन आपला मनमानी कारभार केल्याचा आरोप महावितरणच्या एमएसईबी वकर्स फेडरेशनच्या वतीने करण्यात आला आहे. या कामात सर्वानाच सरसकट कामाला लावले गेले, ज्यांचे वय 50 वर्षापेक्षा अधिक आहे, अशांना देखील कामाला लावले, परंतु त्या कर्मचाऱ्यांना ज्या ज्या ठिकाणी पाठविले. परंतु या कर्मचाऱ्यांचे हाल झाले, त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केले असल्याचे यावेळी फेडरेशनच्या वतीने सांगण्यात आले.बुधवारी वागळे इस्टेट भागातील महावितरण कार्यालयाच्या आवारात या कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरु केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात निसर्ग चक्री वादामुळे नुकसान झाले, अनेक ठिकाणी विजेची हानी झाली. त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रशासनाबरोबर तयार होतो. त्यानुसार या कामाचा अॅक्शन प्लॅन तयार करण्याची विनंती त्यांना करण्यात आली होती, आराखडा तयार करण्याचे सांगण्यात आले होते, तसेच 50 वर्षे वयोगटातील कर्मचा:यांना या कामी पाठविले जाऊ नये असेही सांगण्यात आले होते. परंतु प्रशासनाने मनमानी कारभार करीत सरसकट सर्वानाच कामाला लावल्याचा आरोप यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष बनसोड यांनी केला आहे.किमान गरजा भागविल्या जाव्यात ही हिच्छा होती, त्याला राहण्याची सोय होणो अपेक्षित होते, त्याला अंगोळीचे पाणी मिळणो अपेक्षित होते, जेवणाची सोय, पाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे होते. 10 दिवसासाठी नेले होते, परंतु 30 दिवस उलटूनही त्यांच्याकडून काम करुन घेतले जात असून त्यांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत, त्यातूनच एकाला अंघोळीचे पाणी मिळाले नाही, तो तलावात गेला आणि त्याचा मृत्यु झाल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्वाना मुख्यअभिंयता जबाबदार असल्याचा आरोपही बनसोडे यांनी केला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी फेडरेशनची असल्याचेही त्यांनी सांगितले. जोपर्यंत कारवाई होणार नाही, तो र्पयत आंदोलन सुरुच राहिल असा इशाराही त्यांनी दिला.