शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

वाहनचालकांनो सावधान... कसारा घाटा तील रस्ता खचतोय, महामार्गाला गेला तडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 19:18 IST

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग असलेल्या महामार्गांवरील मुबई नाशिक दरम्यान च्या जुन्या कसारा घाटाची निकृष्ठ दर्जाची काम व पडणाऱ्या पावसामुळे कसारा घाटाची वाट पुरता बिकट वाट बनत चालली आहे.

शाम धुमाळ

कसारा - मुबई नाशिकमहामार्गांवरील कसारा घाटासह पडघा ते गोंदे दरम्यान महामार्गावर मोठ मोठ्या खड्ड्यांना चुकवत प्रवाशांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. त्यातच आता कसारा घाटातील रस्ताच खचत चालला असून महामार्गांवर काही अंतरावरील रस्त्याला पूर्णत: तडे गेल्याने रस्ता दबला गेला आहे. रस्त्याच्या कडेला असलेले संरक्षक कठडेदेखील रस्ता सोडून बाजूला सरकल गेले आहेत. 

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग असलेल्या महामार्गांवरील मुबई नाशिक दरम्यान च्या जुन्या कसारा घाटाची निकृष्ठ दर्जाची काम व पडणाऱ्या पावसामुळे कसारा घाटाची वाट पुरता बिकट वाट बनत चालली आहे. महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कसारा घाटात  2020 च्या पावसाळ्यात कसारा जुना घाट व नवीन घाटातील दोन्ही मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात रस्ता खचला होता परिणामी काही दिवस महामार्गावरिल् वाहतूक एकेरी सुरु ठेवण्यात आली होती.

पावसाळा झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल कंपनी व एका ठेकेदाराकरवी करोड रुपये खर्च करुन दोन्ही रस्त्याचे भरावं करुन तडा गेलेला रस्ता व खचलेल्या भागाची दुरुस्ती करून घेतली. परंतु, याही वर्षी करणार जुन्या कसारा घाटात रस्त्याला तडे गेले आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षी ज्या ठिकाणी रस्त्याला तडे गेले होते व खचले होते त्याच ठिकाणी रास्त्याला मोठे तडे गेले असून 500 मिटर च्या अंतरावर अनेक ठिकाणी रस्त्याला तडा गेला आहे .शिवाय रस्त्याच्या कडेला रस्त्याच्या सुरक्षितते साठी जाळी बांध पद्धतीचे व सिमेंट आर.सी.सी.चे वरच्यावर संरक्षण कथडे संबंधित ठेकेदार कंपनी ने बांधले होते ते सुद्धा 1 ते दीड फुट खाली दबले गेले आहेत तर काही कथडे रस्त्याचा एकसंध पणा सोडून बाजूला पडले आहेत. दरम्यान, जुन्या कसारा घाटातील रस्यावरील तडे मोठ्या प्रमाणात वाढत असून घाटातून जाणाऱ्या अवजड वाहणांमुळे रस्त्याला मोठी हानी पोहचून्यची शक्यता नाकारता येत नाही. कोसळणारा पाऊस व वाहनांच्या कम्पिंगमुळे महामार्गांवरील रस्ता जास्त प्रमाणात खचण्याची शक्यता असून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तडा गेलेल्या व खचलेल्या रस्त्यावर  उपाययोजना करुन 1 किमी रस्त्यावर एकेरीच वाहतूक सुरु ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा, दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तडा गेलेल्या रस्त्यात पाणी जाऊन भरावं खाचण्याची शक्यता

दरम्यान जुन्या कसारा घाटात रहदारी मोठ्या प्रमाणात असते त्यातच 500 मिटर चा रस्ता खचला आहे अनेक मोठ्या भेगा या रस्त्यावर पडल्यात दरम्यान रस्त्यावर पडलेल्या भेगा,तडे यात पाणी जाऊन भरावं खाचण्याची शक्यता मोठ्याप्रमाणात आहे. तुटलेले संरक्षक कथडे.,रस्त्यावरील खड्डे प्रवाशाच्या जीवावर. दरम्यान मुबई नाशिक महामार्गावरील वडपे ते गोंदे रस्त्याची चाळन झाली आहे खड्ड्यामुळे अनेक आपघात  झालेत तर कसारा घाटात खड्ड्या ची रांगोळी आहेच पण कसारा घाटाच्या नागमोडी वळणावर व खोल दरीत जाण्या पासून संरक्षण व्हावे यासाठी असलेले संरक्षण कथडे पूर्णतः तुटून गेलेले आहेत त्यामुळे मुबई नाशिक हा  टोल रस्ता प्रवशांच्या जीवावरच उठल्याचे बोलले जात आहे.

ठेकेदाराला राजकीय अभय

दरम्यान मुबई नाशिक महामार्गांवरील दुरुस्ती असो वा अन्य कुठलेही काम असो एका राजकीय पक्षाच्या पुढऱ्याच्या आशीर्वादाने 10 वर्षा पासून एकाच ठेकेदाराला दिले जाते ह्या ठेकेदारा करवी आज पर्यंत अनेक बोगस कामे करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून टोल नाक्याच्या मार्फेत बिल काढली जात आहेत.दरवर्षी दुरुस्ती च्या नावा खाली करोडो रुपये ठेकेदाराला आंदन दिले जात आहेत या प्रकरणी अनेक वाहंचालकांनी नितीन गडकरी यांच्या कडेही थेट तक्रारी केल्या परंतु स्थानिक राजकीय वरद हस्त असल्याने ठेकेदारा वर कारवाईच होत नाही. 

टॅग्स :thaneठाणेNashikनाशिकMumbaiमुंबईhighwayमहामार्गRainपाऊस