शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
2
आता सभा घेऊन कोणाचे पोर कडेवर खेळवणार? अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण
3
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
4
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
5
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
6
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
7
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
8
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
9
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
10
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
11
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
12
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
13
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
14
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
15
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
16
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
17
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
18
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
19
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
20
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'

अटलजींनी दाखविलेल्या मार्गावरूनच मोदींची वाटचाल : फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 10:40 PM

अटल महाकुंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

ठाणे :अटलजींनी दाखविलेल्या मार्गावरूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या देशाला घेऊन जात असून भारताला विश्वगुरु करण्याचा निर्धार आपण करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 मुंबईच्या दीप कमल फाउंडेशनतर्फे मीरा रोड येथील सेव्हन स्क्वेअर अकादमीच्या मैदानावर आयोजित अटल महाकुंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. भारताचे माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांची २५ डिसेंबर रोजी जयंती असून यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बिहारचे राज्यपाल लालजी टंडन यावेळी उपस्थित होते.

 मुख्यमंत्री फडणवीस यांनी अटलजींच्या कवितांच्या ओळीचा संदर्भ देऊन सांगितले की, अटलजी हे या देशातील असे राजनेता होते ज्यांना जनतेचे अपार प्रेम मिळाले. त्यांच्या कार्यसंस्कृतीची प्रेरणा घेऊनच मोदीजी कारभार करीत आहेत. या कार्यसंस्कृतीचा पायाच अटलजींनी रचला. जिथे जिथे अटलजींच्या अमृत विचारांचे थेंब पडले तिथे तिथे आपोआपच कुंभ निर्माण झाले, असेही मुख्यमंत्र्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात सांगितले.

राजस्थानचे माजी गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांना यावेळी  "अटल सम्मान" देऊन  सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे स्व. अटलजी यांची दीर्घकाळ सेवा करणारे शिवकुमार यांना देखील गौरविण्यात आले. प्रारंभी दीप कमल फाऊंडेशनचे अध्यक्ष अमरजीत मिश्र यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले.

अटल गीत गंगा या कार्यक्रमात अभिनेता शेखर सुमन, रवि किशन, पूनम ढिल्लों , हिमानी शिवपुरी, कवि महेश दुबे, गायक विनोद दुबे व सुरेश शुक्ला यांनी अटलजी यांच्यावरील कवितांचे वाचन केले. यावेळी स्वागताध्यक्ष आमदार नरेंद्र मेहता, बिहारचे  मंत्री नंदकिशोर यादव यांची उपस्थिती होती. यावेळी अटलजींच्या भाषण आणि कवितांवर आधारित डॉक्युमेंट्री "शब्दों के शिल्पी अटल" दाखविण्यात आली.         

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदी