शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात मनसेने केले ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 21:01 IST

आपल्या आप्तेष्टाचा जीव वाचवायचा असेल तर गंभीर अस्वस्थेतील रुग्णांना येथे आणू नये असे आवाहन करणारा फलक मनसेने लावला

मीरारोड - महापालिका व शासनाच्या कात्रीत अडकलेले भाईंदरचे पंडित भीमसेन जोशी रुग्णालय म्हणजे मृत्यूचा सापळाच बनला असून याला सत्ताधारी भाजपा जबाबदार असल्याचा आरोप करत मनसेने रुग्णालयाच्या आवारात आंदोलन केले. आपल्या आप्तेष्टाचा जीव वाचवायचा असेल तर गंभीर अस्वस्थेतील रुग्णांना येथे आणू नये असे आवाहन करणारा फलक मनसेने लावला. 

मीरा भाईंदर महापालिकेने सुरु केलेले जोशी रुग्णालय हे सुरुवातीपासून वादग्रस्त ठरले आहे. दिड महिन्यापूर्वी सदर रुग्णालय शासनाला कागदोपत्री हस्तांतरित झाले असले तरी वैद्यकीय सेवा उलट खालावत चालली आहे. २४ जुलैपासून रुग्णालयात ५ जणांचा मृत्यू झाला असून यात १६ ते २३ वयोवर्षांच्या मुलं, तरुणाचा समावेश आहे. आधीच विविध तक्रारी त्यात मुलांचे मृत्यू झाल्याने आज मनसेचे शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे, सुषमा बाठे, अनु पाटील, सोनिया फर्नांडिस, रेश्मा तपासे, शहनाझ, गौरवी जाधव , कविता वायंगणकर,  हेमंत सावंत, दिनेश कनावजे, शशी मेंडन, रफिक पठाण, विजय फर्नांडिस, रॉबर्ट डिसोझा, हरीश सुतार, सूर्या पवार, नितीन बोंबले, जितू शेणॉय आदी पदाधिकाऱ्यांसह मनसैनिकांनी रुग्णालयाच्या आवारात निदर्शने केली. पालिका उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे येऊन उत्तर देत नाहीत तोपर्यंत हलणार नाही असे सांगत मनसैनिकांनी रुग्णालयात धरणे धरले. मनसेने रुग्णालयाच्या आतील प्रवेशद्वारावर फलक लावून रुग्णालयात अत्यावश्यक सेवा - सुविधा नसल्याने नागरिकांनी आपल्या आप्तेष्टाना जोशी रुग्णालयात दाखल करू नये असे आवाहन केले. भाईंदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रेय बोराटे सह पोलीस पथक तसेच दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी धावून आले. डॉ. पानपट्टे रुग्णालयात आल्या नंतर शिष्टमंडळाशी त्यांनी चर्चा केली . 

रुग्णालय म्हणून अत्यावश्यक आयसीयू , एनआयसीयु , व्हेंटिलेटर , तज्ञ डॉक्टर आदी आवश्यक सुविधाच नसल्याने येथे रुग्णाचे मृत्यू होत असून याला पालिका व सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप सुर्वे यांनी केला . वेळीच न होणारे उपचार व तपासणी , डॉक्टर - परिचारिका , लॅब टेक्निशियन आदी जागेवर नसल्याच्या तक्रारी नित्याच्याच झाल्या आहेत . कामावर असताना कर्मचारी मोबाईलवर खेळत बसतात , रुग्ण वा नातलगांशी अरेरावी केली जाते असा पाढाच मनसे पदाधिकाऱ्यांनी वाचला. त्यावर रुग्णालय हे शासनास हस्तांतरित झाले असून पालिका केवळ सहकार्य करत आहे. येत्या काही महिन्यात आयसीयू आदी सर्व सुविधा सुरु होतील. तुमचे निवेदन शासनाला पाठवू तसेच रुग्णालयात सध्या देण्यात येणाऱ्या सुविधा व वैद्यकीय उपचार याचे माहितीचे फलक लावू असे आश्वासन डॉ . पानपट्टे यांनी दिले.  दरम्यान डॉ . पानपट्टे यांनी मनसेचे शिष्टमंडळ जाताच रुग्णालयातील डॉक्टर , परिचारिका , सुरक्षा रक्षक, कर्मचारी आदींची तातडीची बैठक घेतली. कामाच्या वेळात जागेवर हजर रहा, मोबाईल वर खेळू नका, रुग्ण - नातलगांशी चांगले वागा अश्या सूचना करतानाच तक्रार आल्यास निलंबनाची कारवाई करू असा इशारा दिला. येणाऱ्या रुग्णाची स्थिती समजून घ्या व आपल्या कडे उपचार होणार नसतील तर तसे त्यांना तातडीने मार्गदर्शन करा. रुग्ण - नातलग यांच्याशी गोडीने व समजूतदारपणे वागा. अरेरावी, उद्धट वागू नका अशी समज त्यांना दिली. 

टॅग्स :thaneठाणेMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकmira roadमीरा रोडhospitalहॉस्पिटलHealthआरोग्यMNSमनसे