शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

17 मे रोजी मनसेचा ठाण्यात शेतकरी मोर्चा; सरकारविरुद्ध पुकारणार एल्गार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 17:09 IST

ठाण्यातील आंबा स्टॉल लावण्यावरुन झालेल्या वादानंतर मनसेकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाण्यात येत्या 17 मे रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.

ठाणे - ठाण्यातील आंबा स्टॉल लावण्यावरुन झालेल्या वादानंतर मनसेकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाण्यात येत्या 17 मे रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला मनसेचे नेते तसेच राज्यभरातून किमान 5 हजार शेतकरीला उपस्थित राहतील असा विश्वास मनसेचे पालघर आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे. अविनाश जाधव यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बोलत होते. 

यावेळी बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, आंबा स्टॉल लावल्याने भाजपा नगरसेवकाकडून सचिन मोरे या शेतकऱ्याला 20 हजार रुपयांची मागणी केली. हे पैसे शेतकऱ्याने देण्यास नकार दिल्याने पालिकेकडून या शेतकऱ्याच्या स्टॉलवर कारवाई करण्यात आली. आंबा स्टॉलसाठी परवानगी मागितली असताना ती नाकारण्याचं कोणतंही ठोस कारण महापालिकेकडे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी येत्या 17 मे रोजी ठाण्यात शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार असल्याचं त्यांनी सांगितले. 

या शेतकरी मोर्चासाठी नाशिकहून राहुल ढिकले, पुण्याहून बाबाराजे जाधवराव, मराठवाड्यातून जावेद शेख, कोकणातून वैभव खेडेकर या मनसे नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी ठाण्यात दाखल होतील. तसेच ठाणे जिल्ह्यातील शेतकरी, आदिवासी,  ग्रामपंचायत सदस्य मोर्चात सहभागी होतील. या मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही या मोर्चाला पाठिंबा दिल्याचं अविनाश जाधव यांनी सांगितले. 

या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून ठाण्यातील विविध मैदानात शेतकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात 18 मे पासून टँकर बंद करण्याचा इशारा देत टँकर माफियाना अभय देण्यासाठी पाणी टंचाई, ठामपाचे पैसे घालवता कुठे? असा सवाल मनसेचे अविनाश जाधव यांनी विचारला आहे. 

मनसेच्या शेतकरी मोर्चातील प्रमुख मागण्या

  • सुमारे आठ ते दहा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी 100  स्टॉल उपलब्ध करावेत. 
  • सचिन मोरे या शेतकऱ्याकडून पैसे मागणाऱ्या भाजपा नगरसेवकावर खंडणीचा गुन्हा दाखल करावा. 
टॅग्स :MNSमनसेFarmerशेतकरीthaneठाणेwater scarcityपाणी टंचाईFarmer strikeशेतकरी संप