शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : ‘ठामपा’साठी मनसे, राकाँ, काँग्रेस आघाडी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 06:06 IST

नवे समीकरण; युतीविरोधात फॉर्म्युला

- अजित मांडके ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात मनसेच्या अविनाश जाधव यांना मिळालेली ७२ हजार मते ही येत्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत युतीकरिता धोक्याची घंटा आहे. ठाणे मतदारसंघ शिवसेनेला स्वत:कडे खेचून घ्यायचा होता. मात्र, भाजपने तो सोडला नाही व भाजपच्या संजय केळकर यांनी राखला. मात्र, मनसेने घेतलेली मते लक्षात घेता महापालिकेत युतीत बेबनाव निर्माण झाल्यास तो मनसेच्या पथ्यावर पडायला वेळ लागणार नाही.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या गडावर कमळ फुलवले. त्यानंतर, आता झालेल्या निवडणुकीत संजय केळकर यांनी हा गड राखला असला, तरी मताधिक्यात घसरण झाली आहे. मतदारसंघावर शिवसेना, भाजपचे वर्चस्व असतानाही घटलेल्या मताधिक्यासाठी जबाबदार कोण, असा प्रश्न आहे. मागील निवडणुकीत मनसेला केवळ आठ हजार मते मिळाली होती. या निवडणुकीत त्यात तब्बल ६४ हजार ८७४ मतांची वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत ठाणे विधानसभेत युतीच्या बालेकिल्ल्याला शह देण्यासाठी मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी अशीच हातमिळवणी केली, तर ते समीकरण युतीला घातक ठरणार आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे राजन विचारे यांना ८३ हजारांची निर्णायक आघाडी मिळाली होती. त्यामुळे विधानसभेला येथील गणित सोपे असेल, असे बोलले जात होते. परंतु, ते तितके सोपे नसल्याचे दिसून आले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सुमारे ३५ ते ४० हजार मते मनसेला मिळाल्याचे बोलले जाते. जाधव यांना राबोडी, महागिरी यासारख्या भागांतून चांगली मते मिळाल्याचे दिसून आले.शिवसेना आणि भाजपतील सुप्त संघर्षाचा फटका केळकर यांना बसल्याची चर्चा आहे.

घोडबंदरचा काही भाग, कोलशेत, बाळकुम, ढोकाळी, राबोडी, टेकडी बंगला, वृंदावन, श्रीरंग, महागिरी, हिरानंदानी मेडोज या शहरातील काही महत्त्वाच्या भागातूनही मनसेला आघाडी मिळाल्याचे दिसून आले. वास्तविक पाहता, या सर्व भागांमध्ये शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांचे वर्चस्व आहे. असे असतानाही त्या भागातील मतदारांनी विरोधात मतदान केल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे १२ नगरसेवक असून भाजपचे १९ नगरसेवक आहेत. असे असतानाही मताधिक्य घटले, हा चर्चेचा विषय ठरला आहे. शिवसेनेच्या ज्या मंडळींचा केळकर यांना विरोध होता, त्यांच्याच क्षेत्रामधील मतांमध्ये दिसून येणारी घट बोलकी आहे.

आघाडीचा मनसेला लाभ

विधानसभेत भाजपला पराभूत करण्याकरिता मनसे, राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी दिसली. त्याचा फायदा मनसेला झाला. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा हीच आघाडी दिसणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. अर्थात, महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांत इच्छुक जास्त असल्याने अशी तीन पक्षांची आघाडी करण्यात मर्यादा असल्या, तरी युतीवर मात करण्याचा हा मार्ग विरोधकांना दिसला आहे.

टॅग्स :MNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस