शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 14:35 IST

Sharmila Thackeray Reaction Over Akshay Shinde Encounter Case: शर्मिला ठाकरे यांनी अक्षय शिंदे चकमक प्रकरणात जखमी पोलीस निलेश मोरे यांची भेट घेतली.

Sharmila Thackeray Reaction Over Akshay Shinde Encounter Case: राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूरमधील खासगी शाळेतील लहान मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा अचानक पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीका केली. यानंतर आता या प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, या सुनावणीत न्यायालाने पोलिसांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या एन्काउंटरचे समर्थन केले आहे. 

शर्मिला ठाकरे यांनी अक्षय शिंदे चकमक प्रकरणात जखमी पोलीस निलेश मोरे यांची भेट घेतली. यानंतर मीडियाशी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, मला एक मेसेज आला आहे. तो वाचून दाखवते. एन्काउंटर केल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन. जाणूनबुजून एन्काउंटर केले असेल, तर पोलिसांचे डबल अभिनंदन. ते एन्काउंटर कसेही असले, तरी महिलांवर अत्याचार एवढे वाढले आहेत की, जोपर्यंत कायद्याचा असा धाक निर्माण होत नाही, तोपर्यंत अशा गोष्टींवर वचक बसणार नाही. असे एन्काउंटर वरचेवर झाले पाहिजेत, असे माझे मत आहे, असे शर्मिला ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

पोलिसांचे खास अभिनंदन करण्यासाठी आले

पोलिसांचे खास अभिनंदन करण्यासाठी आले आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाची व्यक्ती किंवा राज ठाकरे यांची पत्नी म्हणून बोलत नाही. मी एक महिला म्हणून बोलत आहे. मी तमाम महिलांच्या बाजूने बोलते आहे. आमच्यात इतकी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. दररोज अशा प्रकारच्या हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. अत्याचार, खून वाढले आहेत. त्यामुळे महिलांची प्रतिनिधी म्हणून बोलते. राजकारणी काय बोलतात, विरोधक काय बोलतात, न्यायालय काय म्हणते, मला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. मला पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, पोलिसांनी एन्काऊंटर करून चांगलेच केले, असे स्पष्ट मत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केले.

महिलांवर होणारे अत्याचार लोकशाहीला मारक नाहीत का?

महिलांवर होणारे अत्याचार लोकशाहीला मारक नाहीत का? वेगाने महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. मी मागच्या महिन्यात तीन पीडित महिलांना भेटली आहे. हे लोकशाहीला पूरक आहे का? हैदराबादमध्ये बलात्कार करणाऱ्या आरोपीला चार पोलिसांनी चकमकीत ठार केले होते. आज जे रोज सकाळी बोंबलतात, त्याच पोलिसांनी आपल्या वर्तमानपत्रात पोलिसांचे कौतुक केले होते. मग हैदराबादच्या पोलिसांना एक न्याय आणि महाराष्ट्राच्या पोलिसांना वेगळा न्याय देऊन कसा चालेल, जर त्यांचे कौतुक होते, तर यांचेही कौतुकच झाले पाहिजे, असे शर्मिला ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, महिलांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हायची असेल, तर असे एन्काउंटर झाले पाहिजेत. पोलिसांकडे सर्व पुरावे आहेत. त्या लहान मुलींनी त्याला ओळखलेले आहे, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे. म्हणजेच या प्रकरणात अक्षय शिंदेविरोधात पोलिसांकडे पुरावे नाहीत, असे नाही. दिल्लीच्या क्राइममध्ये सहा वर्षांनी शिक्षा झाली. आपण शक्ती कायदा फक्त बोलतो, आम्हाला हा शक्ती कायदा हवा, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या. 

टॅग्स :badlapurबदलापूरsharmila thackerayशर्मिला ठाकरेMNSमनसेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना