शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 14:35 IST

Sharmila Thackeray Reaction Over Akshay Shinde Encounter Case: शर्मिला ठाकरे यांनी अक्षय शिंदे चकमक प्रकरणात जखमी पोलीस निलेश मोरे यांची भेट घेतली.

Sharmila Thackeray Reaction Over Akshay Shinde Encounter Case: राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूरमधील खासगी शाळेतील लहान मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा अचानक पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीका केली. यानंतर आता या प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, या सुनावणीत न्यायालाने पोलिसांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या एन्काउंटरचे समर्थन केले आहे. 

शर्मिला ठाकरे यांनी अक्षय शिंदे चकमक प्रकरणात जखमी पोलीस निलेश मोरे यांची भेट घेतली. यानंतर मीडियाशी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, मला एक मेसेज आला आहे. तो वाचून दाखवते. एन्काउंटर केल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन. जाणूनबुजून एन्काउंटर केले असेल, तर पोलिसांचे डबल अभिनंदन. ते एन्काउंटर कसेही असले, तरी महिलांवर अत्याचार एवढे वाढले आहेत की, जोपर्यंत कायद्याचा असा धाक निर्माण होत नाही, तोपर्यंत अशा गोष्टींवर वचक बसणार नाही. असे एन्काउंटर वरचेवर झाले पाहिजेत, असे माझे मत आहे, असे शर्मिला ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

पोलिसांचे खास अभिनंदन करण्यासाठी आले

पोलिसांचे खास अभिनंदन करण्यासाठी आले आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाची व्यक्ती किंवा राज ठाकरे यांची पत्नी म्हणून बोलत नाही. मी एक महिला म्हणून बोलत आहे. मी तमाम महिलांच्या बाजूने बोलते आहे. आमच्यात इतकी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. दररोज अशा प्रकारच्या हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. अत्याचार, खून वाढले आहेत. त्यामुळे महिलांची प्रतिनिधी म्हणून बोलते. राजकारणी काय बोलतात, विरोधक काय बोलतात, न्यायालय काय म्हणते, मला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. मला पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, पोलिसांनी एन्काऊंटर करून चांगलेच केले, असे स्पष्ट मत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केले.

महिलांवर होणारे अत्याचार लोकशाहीला मारक नाहीत का?

महिलांवर होणारे अत्याचार लोकशाहीला मारक नाहीत का? वेगाने महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. मी मागच्या महिन्यात तीन पीडित महिलांना भेटली आहे. हे लोकशाहीला पूरक आहे का? हैदराबादमध्ये बलात्कार करणाऱ्या आरोपीला चार पोलिसांनी चकमकीत ठार केले होते. आज जे रोज सकाळी बोंबलतात, त्याच पोलिसांनी आपल्या वर्तमानपत्रात पोलिसांचे कौतुक केले होते. मग हैदराबादच्या पोलिसांना एक न्याय आणि महाराष्ट्राच्या पोलिसांना वेगळा न्याय देऊन कसा चालेल, जर त्यांचे कौतुक होते, तर यांचेही कौतुकच झाले पाहिजे, असे शर्मिला ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, महिलांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हायची असेल, तर असे एन्काउंटर झाले पाहिजेत. पोलिसांकडे सर्व पुरावे आहेत. त्या लहान मुलींनी त्याला ओळखलेले आहे, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे. म्हणजेच या प्रकरणात अक्षय शिंदेविरोधात पोलिसांकडे पुरावे नाहीत, असे नाही. दिल्लीच्या क्राइममध्ये सहा वर्षांनी शिक्षा झाली. आपण शक्ती कायदा फक्त बोलतो, आम्हाला हा शक्ती कायदा हवा, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या. 

टॅग्स :badlapurबदलापूरsharmila thackerayशर्मिला ठाकरेMNSमनसेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना