शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
4
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
5
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
6
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
7
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
8
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
9
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
10
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
11
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
12
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
13
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
14
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
15
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
16
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
17
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
18
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
20
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?

निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं काय?, न्यायालयाचा निर्णय संभ्रमात टाकणारा; राज ठाकरेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 12:35 IST

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील सत्तासंर्घषाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ठोस माहितीचा आधार न घेता राजकीय आखाड्यात उतरले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या प्रतोदपदी भरत गोगोवले यांची बेकायदेशीर नियुक्ती केली, असे कठोर ताशेरे सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने गुरुवारी नोंदविले. या संघर्षात बहुमत चाचणीला सामोरे न गेल्याबाबत उद्धव ठाकरे  यांनी मोठी चूक केल्याची अधोरेखित करत या कृतीमुळे त्यांनी मुख्यमंत्रिपदावर पुन्हा स्थापित होण्याची संधी गमावल्याचेही घटनापीठाने नमूद करताना घटनापीठाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना सरकारला जीवदान दिले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरुन सत्ताधारी आणि विरोधक वेगवेगळे दावे करत आहे. निर्णय आमच्याच बाजूने लागलाय, असा दावा दोन्ही बाजूने करण्यात येत आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात अनेक कायदे, अटी, मुद्दे असल्याचे थोडं निकाल समजण्यात संभ्रम निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. याचदरम्यान मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी राज्यातील सत्तासंर्घषाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

न्यायालयाचा निकाल संभ्रमात टाकणारा आहे. जेव्हा मला न्यायालयाकडून किंवा पोलिसांकडून नोटीस येते. तेव्हा ती भाषा वाचताना समजत नाही, नक्की अटक केलीय की सोडलंय. आणि कालचा सर्वोच्च न्यायालयाचा निकालात सांगितले की, सर्व प्रकिया चुकली. मात्र माजी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता. तसेच निवडणूक आयोगाने चिन्ह आणि नाव त्या गटाकडे दिलंय, मग त्याचं काय होणार?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. 

या गोष्टी खूप संभ्रमात टाकणाऱ्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं, सर्व धुळ एकदा खाली बसली की त्यावेळी आपल्याला समजेल नक्की काय झालंय, असं राज ठाकरेंनी सांगितले. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांनी विचारताच, मला त्यांच्याबाबत काहीही विचारू नका. त्यांचे प्रश्न त्यांना विचारा. त्यांचा वेगळा पक्ष आहे, माझा वेगळा पक्ष आहे, असं राज ठाकरेंनी सांगितले. राज ठाकरे सध्या मिरा-भाईंदरच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

संपूर्ण जगात महाराष्ट्राची बदनामी- उद्धव ठाकरे

देशाच्या आणि, महाराष्ट्राच्या प्रतिमेचा प्रश्न आहे. संपूर्ण जगात महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वगुरु आहेत. त्यांच्या नेतृत्वात देशात चुकीचा कारभार होत आहे. हे देशाला शोभत नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. बदनामी करणाऱ्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर घालावा अशी विनंती त्यांनी पंतप्रधान मोदींना केली. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस