शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

स्मशानभुमीच्या विरोधात आता मनसे आणि राष्ट्रवादीही उतरली मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 15:41 IST

एकीकडे स्मशानभुमीच्या मुद्यावरुन सध्या ठाण्यात शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये चढाओढ सुरु असतांनाच आता या स्मशानभुमीच्या विरोधात मनसे आणि राष्ट्रवादी देखील उतरली आहे. त्यामुळे स्मशानभुमीच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

ठळक मुद्देमोर्चात स्थानिकांचा समावेश नव्हताच, मनसेचा आरोपवेळ आल्यावर आम्ही आमची भुमिका स्पष्ट करु - राष्ट्रवादी 

ठाणे - मागाली काही दिवसापासून स्मशानभुमीच्या मुद्यावरुन शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. स्मशानभुमीच्या मागणीसाठी आमदार सरनाईक यांनी मोर्चा काढून अप्रत्यक्षपणे शक्तीप्रदर्शन केले असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. परंतु आपल्याच पक्षातील नेत्याचा विरोध सुरु असतांना आता मनसे आणि राष्ट्रवादीने देखील या स्मशानभुमीला आपला जाहीर विरोध दर्शविला आहे. रेप्टॉकॉसच्या स्मशानभुमीमुळे वर्तक, शास्त्रीनगरच्या रहिवाशांना त्रासच होणार असल्याची भुमिका मनसेने घेतली असून या स्थानिकांचा आमदारांनी विचार घ्यावा अशी मागणी देखील केली आहे.              मागील काही महिन्यांपासून ठाण्यात स्मशानभुमीच्या मुद्यावर चांगलेच वादळ उठले आहे. परंतु आता हे वादळ एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये रंगत असल्याचे दिसून येत होते. त्यानुसार आपल्या पक्षातील एका नेत्याला शह देण्यासाठी आमदार सरनाईक यांनी स्मशानभुमी व्हावी या मागणीसाठी मोर्चा काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. परंतु आता त्यांच्या या भुमिकेच्या विरोधात त्यांच्या पक्षातील नेत्यासह विरोधकांनी देखील यात आता उडी घेतली आहे. पोखरण रोड नं.१ येथील रेप्टाकॉस कंपनीच्या सुविधा भूखंडावर व टिकुजीनी वाडी येथील मुल्लाबाग येथील सुविधा भूखंडावर प्रदूषणविरहित पर्यावरणपूरक स्मशानभूमीची निर्मिती करण्यास मान्यता मिळाली असली तरी रेप्टाकॉस कंपनीचा भुखंड हा अ‍ॅमीनीटी प्लॉट असल्याने त्याठिकाणी स्मशानभुमी उभारताच येऊ शकत नसल्याचे मत आता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या स्मशानभुमीच्या विरोधात यापूर्वी देखील शिवसेनेच्या काही मंडळींनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले होते. या स्मशानभूमीच्या आसपास बांधकाम चालु असलेल्या काही बिल्डरांचे लागेबांधे महापालिकेतील काही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांबरोबर असल्याने या परिसरातील काही मुठभर रहिवांशाना हाताशी धरून काही नगरसेवक या स्मशानभूमीला विरोध करू लागले असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे.                  दरम्यान आता स्मशानभुमीच्या वादाला आणखी ठिणगी पडली आहे. स्मशानभुमीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात वर्तक नगर, शास्त्री नगर या भागातील रहिवासी नव्हते. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी देखील नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. तसेच स्थानिकांचा या स्मशानभुमीला विरोध असतांना त्यांचे मत लक्षातच घेतले जात नसल्याचेही मनसे सांगितले आहे. त्यामुळे आता वेळ पडल्यास स्थानिक रहिवाशासह रस्त्यावर उतरण्याचा इशाराही मनसेने दिला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने देखील मुल्लाबाग येथील संभावीत स्मशानभुमीला विरोध दर्शविला आहे. वस्तीत ही स्मशानभुमी होणे शक्यच नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच रेप्टाकॉस येथे स्मशानभुमीची गरज नसल्याचे मतही व्यक्त केले आहे.स्थानिकांना मुळात विश्वासात घेण्यात आले नसून ज्या ठिकाणी स्मशानभुमी होणे शक्य नाही, त्याठिकाणी हट्ट करायचा कशाला. त्यामुळे वेळ पडल्यास स्मशानभुमीच्या विरोधात रस्त्यावर उतरु(संदीप पाचंगे - मनविसेनेचे ठाणे शहर अध्यक्ष)

भर वस्तीत स्मशानभुमी कशी काय होऊ शकते. त्यामुळे या स्मशानभुमीला आमचा विरोध हा राहणारच आहे. पक्षांतर्गत सुरु असलेला स्मशानभुमीचा खेळ थांबू द्या मग आम्ही आमची भुमिका स्पष्ट करुच.(मिलिंद पाटील - विरोधी पक्षनेते -ठामपा) 

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसे