शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

उघड्यावर शौच करूनही मिरवले पारितोषिक; मीरा भाईंदर महापालिकेचे दिखाऊपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 00:20 IST

नाले व गटारे तुंबल्याने दुर्गंधी येते. सांडपाणी सर्रास खाडी, नदी, समुद्रात सोडून मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण केले जात आहे.

मीरा-भाईंदरमधील स्वच्छता सर्वेक्षण म्हणजे निव्वळ दिखाऊपणा आहे. मीरा-भाईंदर महापालिकेला केंद्र शासनाच्या स्वच्छता सर्वेक्षणात मिळणारे चढत्या क्रमांकाचे नामांकन सर्वसामान्य नागरिकांना आश्चर्याचा धक्का देणारे आहे. अशी कोणती गुरुकिल्ली पालिकेकडे आहे, हे तपासायची गरज व्यक्त होत आहे. सर्वेक्षणाच्या काळातील वरवर दाखवली जाणारी स्वच्छता व झाकून ठेवले जाणारे अस्वच्छतेचे साम्राज्य हे भयाण वास्तव आहे. सर्वेक्षण संपल्यानंतर एखाद्या व्यक्तीने केलेला मेकअप उतरवल्यानंतर त्याचे खरे ओंगळवाणे स्वरूप दिसते, तशी शहराची स्थिती असते.

मीरा-भाईंदर महापालिकेला २०१९ सालच्या स्वच्छता सर्वेक्षणात राष्ट्रीय पातळीवर २७ वा तर राज्य पातळीवर ३ रा क्रमांक प्राप्त झाला होता. त्या आधी २०१८ मध्ये देशात ४७ वा व राज्यात ७ वा तर २०१७ साली देशात १३० वा व राज्यात ९ वा क्रमांक प्राप्त झाला होता. खुल्यावर शौच बंद झाल्याबद्दल विशेष नामांकन मिळाले आहे. हे आकडे आणि प्रत्यक्षातली स्थिती पाहिली तर कोणीच विश्वास ठेवणार नाही. मुळात सर्वेक्षणातील निकष आणि स्वच्छतेपेक्षा अ‍ॅपमुळे महापालिकेला जास्त गुण मिळाले, असे समजते. कारण महापालिकेच्या स्थायी व अस्थायी स्वरुपाच्या सुमारे ३ हजार कर्मचाऱ्यांना अ‍ॅपसाठी सक्ती केली गेली. शिवाय नगरसेवक, राजकीय नेत्यांसह अन्य लोकांनी अ‍ॅप डाउनलोड करुन घेण्यास प्राधान्य दिले. प्रत्यक्षात किती सामान्य नागरिकांनी अ‍ॅप डाउनलोड केले आणि त्याद्वारे केलेल्या तक्रारींवर पालिकेने काय कार्यवाही केली, हे उघड झाले पाहिजे.

सर्वेक्षण असले की, शहरभर भिंती रंगवल्या जातात. सर्वत्र माहिती व जनजागृतीपर फलक लावले जातात. कुठे स्वच्छताफेºया तर कुठे बैठका घेतल्या जातात. साफसफाईची काळजी घेतली जाते. स्वच्छतागृहांची तर जणू दिवाळी असल्यागत सफाई, रंगरंगोटी केली जाते. पण हे सर्व वरवर दिसत असते तरी प्रत्यक्षात खुल्यावर सर्रास शौचाला लोकं बसतात. कचराकुंड्यामुक्त शहर झालेले नसून आजही शहरात जिकडे तिकडे कचराकुंड्या व कचºयाचे ढीग दिसून येतात. वास्तविक, प्रत्येक घर व आस्थापनेत जाऊन ओला व सुका कचरा वेगळा गोळा करण्याची गरज असताना तसे होत नाही.

नाले व गटारे तुंबल्याने दुर्गंधी येते. सांडपाणी सर्रास खाडी, नदी, समुद्रात सोडून मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण केले जात आहे. शहरात सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा तसेच बंदी असलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंची विक्री व वापर सुरु आहे. कचरा वा घातक प्रदूषणकारी वस्तू जाळल्या जात आहेत. त्यामुळे केंद्राचे पाहणीसाठी येणारे पथक काय पाहून जाते व त्यांना काय दाखवले जाते? हे गौडबंगाल आहे. सर्वेक्षणाच्या कामावरील खर्च हा स्वतंत्र चौकशीचा विषय आहे. केवळ दिखाव्यापुरते सर्वेक्षण करून नामांकन व क्रमांक दिले जात असतील तर हे सर्वेक्षण बेगडी व फसवेच म्हणावे लागेल.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक