शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

उत्तन समुद्रातील खुट्याची वाट दीपस्तंभाने उजळली; मच्छीमारांची अपघाताच्या धोक्यातून सुटका झाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 18:38 IST

Miraroad News : भाईंदर पश्चिमेस उत्तन लगतच्या अरबी समुद्रात मासेमारी करून मच्छीमार हे किनाऱ्याला येण्यासाठीच्या मार्गालाखुट्याची वाट म्हणतात.

मीरारोड - उत्तन समुद्रातील खुट्याची वाट आता दीपस्तंभाच्या प्रकाशाने उजळली आहे. समुद्रात उभारलेल्या या दीपस्तंभाचे लोकार्पण खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आले. दीपस्तंभ नसल्याने परतणाऱ्या मच्छीमारांना येथील खडकांवर बोट आदळून नुकसान सहन करावे लागत होते. भाईंदर पश्चिमेस उत्तन लगतच्या अरबी समुद्रात मासेमारी करून मच्छीमार हे किनाऱ्याला येण्यासाठीच्या मार्गालाखुट्याची वाट म्हणतात. वाटेने येताना आजूबाजूचे खडक काळजीपूर्वक बोट किनारी आणावी लागते. परंतु रात्रीच्या वेळी मात्र हे खडक समजत नसल्याने मच्छीमार बोटींना अपघात होऊन नुकसान होत असे. अनेक वर्षां पूर्वी येथे असणारा दीपस्तंभ हा कोसळल्याने मच्छीमारांना खूपच काळजीपूर्वक येथून रात्रीच्या वेळी वाट काढावी लागत असे.

स्थानिक मच्छीमारांचा खुट्याच्या वाटेतील हा जीवघेणा प्रवास पाहता राजन विचारे यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे जुलै २०१९ मध्ये दीपस्तंभासाठी मागणी केली. कामासाठी ५६ लाखांच्या खर्चाची मंजुरी मेरिटाईम बोर्डाला मिळवून दिली. परंतु भर समुद्रात या ठिकाणी काम करण्याकरिता तांत्रिक अडचणी होत्या तसेच मंजूर निधी कमी पडत असल्याने काम सुरु झाले नाही. विचारे यांनी पुन्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून आणखी १६ लाखांचा निधी मंजूर करून घेतला. एकूण ७२ लाखांचा निधी उपलब्ध झाल्यावर अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग यांच्याकडे बैठक बोलावून मेरीटाईम बोर्ड कडून हे काम लवकर पूर्ण करावे असा आग्रह धरला होता.

 

सदर कामाचे भूमिपूजन १५ मार्च २०२१ रोजी झाल्यावर दोन महिन्यात हे काम पूर्ण करण्यात आले. बुधवारी ह्या दीपस्तंभाचे लोकार्पण विचारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार गीता जैन, मच्छीमार नेते बर्नड डिमेलो, विरोधीपक्ष नेते प्रवीण पाटील, गटनेत्या नीलम ढवण, उपजिल्हा प्रमुख राजू भोईर, नगरसेवक एलियस बांड्या, हेलन जॉर्जी गोविंद, शर्मिला बगाजी, माजी नगरसेवक जॉर्जी गोविंद, उपशहर संघटक तेजस्वी पाटील, उप शहर प्रमुख केशीनाथ पाटील, अशोक मोरे सह मेरिटाइम बोर्डाचे अभियंता शेलार, अपर तहसीलदार नंदकुमार देशमुख आदी उपस्थित होते. 

अंधार होताच दीपस्तंभ उजळणार आहे. जेणे करून काळोखात खडकांपासून बोट वाचवून ती सुखरूप आणता येणार आहे. उत्तन परिसरात मच्छीमारांसाठी नवीन मच्छी मार्केट, बर्फ कारखाना, कोल्ड स्टोरेज उभारण्या बरोबरच मच्छिमारांना पालघर येथील मत्स्यव्यवसाय विभागाच्या कार्यालयात जावे लागत असल्याने त्यांची गैरसोय दूर व्हावी यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाचे कार्यालय उत्तन येथे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे राजन विचारे यांनी सांगितले. 

टॅग्स :mira roadमीरा रोड