शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

उत्तन समुद्रातील खुट्याची वाट दीपस्तंभाने उजळली; मच्छीमारांची अपघाताच्या धोक्यातून सुटका झाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 18:38 IST

Miraroad News : भाईंदर पश्चिमेस उत्तन लगतच्या अरबी समुद्रात मासेमारी करून मच्छीमार हे किनाऱ्याला येण्यासाठीच्या मार्गालाखुट्याची वाट म्हणतात.

मीरारोड - उत्तन समुद्रातील खुट्याची वाट आता दीपस्तंभाच्या प्रकाशाने उजळली आहे. समुद्रात उभारलेल्या या दीपस्तंभाचे लोकार्पण खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आले. दीपस्तंभ नसल्याने परतणाऱ्या मच्छीमारांना येथील खडकांवर बोट आदळून नुकसान सहन करावे लागत होते. भाईंदर पश्चिमेस उत्तन लगतच्या अरबी समुद्रात मासेमारी करून मच्छीमार हे किनाऱ्याला येण्यासाठीच्या मार्गालाखुट्याची वाट म्हणतात. वाटेने येताना आजूबाजूचे खडक काळजीपूर्वक बोट किनारी आणावी लागते. परंतु रात्रीच्या वेळी मात्र हे खडक समजत नसल्याने मच्छीमार बोटींना अपघात होऊन नुकसान होत असे. अनेक वर्षां पूर्वी येथे असणारा दीपस्तंभ हा कोसळल्याने मच्छीमारांना खूपच काळजीपूर्वक येथून रात्रीच्या वेळी वाट काढावी लागत असे.

स्थानिक मच्छीमारांचा खुट्याच्या वाटेतील हा जीवघेणा प्रवास पाहता राजन विचारे यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे जुलै २०१९ मध्ये दीपस्तंभासाठी मागणी केली. कामासाठी ५६ लाखांच्या खर्चाची मंजुरी मेरिटाईम बोर्डाला मिळवून दिली. परंतु भर समुद्रात या ठिकाणी काम करण्याकरिता तांत्रिक अडचणी होत्या तसेच मंजूर निधी कमी पडत असल्याने काम सुरु झाले नाही. विचारे यांनी पुन्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून आणखी १६ लाखांचा निधी मंजूर करून घेतला. एकूण ७२ लाखांचा निधी उपलब्ध झाल्यावर अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग यांच्याकडे बैठक बोलावून मेरीटाईम बोर्ड कडून हे काम लवकर पूर्ण करावे असा आग्रह धरला होता.

 

सदर कामाचे भूमिपूजन १५ मार्च २०२१ रोजी झाल्यावर दोन महिन्यात हे काम पूर्ण करण्यात आले. बुधवारी ह्या दीपस्तंभाचे लोकार्पण विचारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार गीता जैन, मच्छीमार नेते बर्नड डिमेलो, विरोधीपक्ष नेते प्रवीण पाटील, गटनेत्या नीलम ढवण, उपजिल्हा प्रमुख राजू भोईर, नगरसेवक एलियस बांड्या, हेलन जॉर्जी गोविंद, शर्मिला बगाजी, माजी नगरसेवक जॉर्जी गोविंद, उपशहर संघटक तेजस्वी पाटील, उप शहर प्रमुख केशीनाथ पाटील, अशोक मोरे सह मेरिटाइम बोर्डाचे अभियंता शेलार, अपर तहसीलदार नंदकुमार देशमुख आदी उपस्थित होते. 

अंधार होताच दीपस्तंभ उजळणार आहे. जेणे करून काळोखात खडकांपासून बोट वाचवून ती सुखरूप आणता येणार आहे. उत्तन परिसरात मच्छीमारांसाठी नवीन मच्छी मार्केट, बर्फ कारखाना, कोल्ड स्टोरेज उभारण्या बरोबरच मच्छिमारांना पालघर येथील मत्स्यव्यवसाय विभागाच्या कार्यालयात जावे लागत असल्याने त्यांची गैरसोय दूर व्हावी यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाचे कार्यालय उत्तन येथे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे राजन विचारे यांनी सांगितले. 

टॅग्स :mira roadमीरा रोड