शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

मीरा-भाईंदर महापालिका प्रभाग कार्यालयाबाहेरच कचऱ्याचे ढीग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 00:55 IST

स्वच्छता सर्वेक्षणाच्या वेळी शहर चकाचक ठेवण्याचा महापालिकेचा दिखावा काही नवीन नाही. मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भार्इंदर पूर्व येथील प्रभाग समिती कार्यालयाबाहेर मात्र, कच-याचे ढीग साचून त्याला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे.

 भार्इंदर : स्वच्छता सर्वेक्षणाच्या वेळी शहर चकाचक ठेवण्याचा महापालिकेचा दिखावा काही नवीन नाही. मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भार्इंदर पूर्व येथील प्रभाग समिती कार्यालयाबाहेर मात्र, कच-याचे ढीग साचून त्याला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. स्वच्छता सर्वेक्षणावेळी पालिका भिंतीवर रंगवलेल्या ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ या बोधवाक्यावरच लोक कचरा टाकताना दिसत आहेत. भर रस्त्यातील या कचºयामुळे पादचाऱ्यांसह मुले आणि स्थानिक रहिवासी मेटाकुटीला आले आहेत.पूर्वेच्या तलाव मार्गावर पालिकेचे प्रभाग समिती कार्यालय आहे. त्याच इमारतीत पालिकेची शाळा तसेच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका देखील चालवली जाते. शहर स्वच्छतेचे उपदेश लोकांना देणाºया पालिकेच्या या प्रभाग कार्यालयाबाहेरील रस्त्याला मात्र उकिरड्याचे स्वरूप आले आहे. या मार्गावर मोठ्या संख्येने बसणारे फेरीवाले आपला कचरा येथे तसाच टाकून जातात. तर परिसरातील काही लोक दिवसरात्र आपला कचरा आणून टाकत असतात.भररस्त्यात तेही पालिका शाळा - कार्यालयाबाहेर झालेल्या कचराकुंडीमुळे नेहमीच रस्त्यावर कचरा पसरतो. दुर्गंधीमुळे पादचारी तसेच रहिवासी त्रस्त आहेत. शाळा सध्या बंद असल्या तरी शाळेच्या वेळेत तर मुलांना नाक दाबून वाट काढावी लागते. शहर कचराकुंडीमुक्त झाल्याचे पालिका सांगते. स्वच्छता सर्वेक्षणात पुरस्कार मिळवल्याचा टेंभा पालिका मिरवते. पण रोज उघड्या डोळ्यांना दिसणारी बेकायदा कचराकुंडी आणि दुर्गंधाचे काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.परिसरातील तरुण कार्यकर्ता सुनील कदम यांनी डिसेंबरपासून ‘आपलं सरकार’ पोर्टलवर आतापर्यंत तब्बल सहा वेळा तक्रार केली आहे. यातील केवळ तीन तक्रारींचे उत्तर पालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक राजकुमार कांबळे यांनी कदम यांना दिले आहे. वास्तविक दुपारच्या वेळी कचºयाची गाडी कचरा घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले; परंतु कचरा टाकणे थांबले नसताना पालिका मात्र खोटे उत्तर देऊन हात झटकते आहे.स्वच्छतेच्या नावाखाली गैरप्रकार चालत असून ‘आपलं सरकार’ पोर्टलवर तक्रारी करूनही काहीच कारवाई होत नाही. कचरा टाकण्यास कायमचे बंद करण्याऐवजी पालिका केवळ दिशाभूल करत खोटी उत्तरे देत आहे. या प्रकरणी कचरा टाकणारे तसेच जबाबदारी असणाºया अधिकाºयांवर कारवाई केली पाहिजे. शहराची कचरपट्टी केली जात आहे.- सुनील कदम ( स्थानिक रहिवासी )आपलं शहर कचराकुंडीमुक्त शहर असून सदर ठिकाणी कचरा टाकणाºयांविरोधात कारवाई केली जाईल. रोज गोळा टाकला जाणारा कचरा बंद करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करू. स्वच्छता निरीक्षकास कारवाईचे निर्देश दिले आहेत.- डॉ. संभाजी पानपट्टे ( उपायुक्त, मुख्यालय )

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक