शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

झोपडपट्टी, धार्मिक स्थळांना टँकरनं होणारा मोफत पाणीपुरवठा बंद होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 18:01 IST

एका टँकरसाठी 500 रुपये मोजावे लागण्याची शक्यता

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिका आपल्या हद्दीतील आदिवासी पाड्यांसह झोपडपट्टी, धार्मिक स्थळांना लोकप्रतिनिधी व रहिवाशांच्या मागणीनुसार ३१ ऑक्टोबर २००१ रोजीच्या स्थायीत मंजूर झालेल्या ठरावाप्रमाणे टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करते. मात्र यासाठी या पाण्यासाठी पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. स्थायी समितीच्या बैठकीत तसा प्रस्ताव आणण्यात आला आहे.  पालिका हद्दीत सुमारे ४५ हजार झोपड्या, सुमारे ६ ते ७ आदिवासी पाडे असुन त्यात कित्येक कुटुंब वास्तव्य करत आहेत. पालिकेनं अनेक झोपडपट्ट्यांना ५ झोपड्यांमागे १ संयुक्त नळजोडणी देण्यास सुरुवात केली आहे. तर काही झोपडीधारक पुरेशा पुराव्याअभावी नवीन नळजोडणीपासून वंचित राहिले आहेत. बहुतांशी आदिवासी पाडेदेखील अद्याप नळजोडणीपासून वंचित आहेत. त्यांना मागणीनुसार सध्या टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला जातो. याखेरीज धार्मिक स्थळे व कार्यक्रमांच्या ठिकाणीसुद्धा लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार मोफत टँकरचे पाणी पुरविले जाते. यापोटी पालिकेला दरमहा सव्वा सहा लाखांचा खर्च सोसावा लागतो. तर ज्या इमारतींना कमी दाबानं अथवा नळजोडणी नसल्यानं पुरेसे पाणी मिळत नाही, अशा इमारतींना पालिकेकडून १ हजार रुपये शुल्क आकारून १० हजार लिटर पाणी टँकरद्वारे पुरविले जाते. 

पालिकेनं ३० एप्रिल २०१७  रोजी अतिरिक्त पाणीपुरवठा उपलब्ध झाल्यानं २०११ पासून बंद केलेली नवीन नळजोडणी पुन्हा सुरू केली. त्यामुळे अनेकांना नवीन नळजोडणी मिळाल्यानं टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे प्रमाण निम्म्यावर आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. यंदा शहराला पाणी कपात लागू झाल्याने लोकांना पाण्याची समस्या भेडसावू लागल्यानं पुन्हा टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याचं प्रमाण वाढल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच शहरात मोठ्याप्रमाणात झोपड्या बांधल्या जात असून पालिकेनं त्यांना ठोस पुराव्याअभावी नवीन नळजोडणी दिलेली नाही. मात्र काही भूमाफिया व लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीनं त्यांना टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा आजही केला जात आहे. या मोफत पाणीपुरवठ्यातून भूमाफिया त्या बेकायदेशीर झोपड्यांत राहणाऱ्यांकडून बक्कळ पैसे उकळतात. हा प्रकार यापुढे बंद होणार असून पालिकेकडून होणाऱ्या मोफत पाणीपुरवठ्याला सुद्धा वेसण घातली जाणार आहे. झोपडपट्टी, आदिवासी पाडे, धार्मिक स्थळांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी यापुढे प्रती टँकर ५०० रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. ही रक्कम सध्याच्या निवासी पाण्याच्या दरापेक्षा तब्बल १२.५० रुपयांनी कमी असल्यानं ती अदा करुन भूमाफिया मात्र त्या झोपडपट्टी धारकांकडून पूर्वीप्रमाणेच अथवा जास्त रक्कम वसूल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

टॅग्स :water transportजलवाहतूकwater scarcityपाणी टंचाईMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकmira roadमीरा रोडbhayandarभाइंदर