शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

अखेर मीरा भाईंदर महापालिकेचे बेकायदा फेरीवाले आणि अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा न देण्याचे निर्देश 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 2:03 PM

Mira Bhayander Municipal Corporation : फेरीवाले आणि अनधिकृत बांधकामांना केल्या जाणाऱ्या बेकायदा वीज पुरवठा बाबत दिलेल्या बातम्यांनंतर अनधिकृत बांधकामे व फेरीवाले यांना वेसण घालण्यासाठी पालिकेने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 

मीरारोड - मीरा भाईंदर शहरातील मुख्य रस्ते, नाके वर्दळीच्या ठिकाणी अतिक्रमण करून बसलेल्या फेरीवाल्यांना तसेच शहरातील अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा करू नये असे आदेश महापालिकेने टाटा सारख्या अन्य वीज कंपन्यांना दिले आहेत. लोकमतने  फेरीवाले आणि अनधिकृत बांधकामांना केल्या जाणाऱ्या बेकायदा वीज पुरवठा बाबत दिलेल्या बातम्यांनंतर अनधिकृत बांधकामे व फेरीवाले यांना वेसण घालण्यासाठी पालिकेने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 

शहरातील अनधिकृत बांधकामे तसेच सरकारी व महापालिका जागेसह कांदळवन, पाणथळ, सीआरझेड, इको सेन्सेटिव्ह हद्दीतील अतिक्रमणे रोखण्यासाठी महापालिका व संबंधित नगरसेवक, राजकारणी व प्रशासन ठोस कारवाई करत नाहीत. उलट बेकायदा बांधकामांना कर आकारणी करून त्याला पाणी, वीज आदी पुरवठा केला जातो. जेणेकरून बेकायदा बांधकामे करणारे व त्यात संगनमत असणाऱ्यांचे चांगलेच फावते. परंतु त्यात घर घेणारा सामान्य मात्र कायमच्या टांगत्या तलवारी खाली राहतो. 

तशीच स्थिती फेरीवाल्यांच्या अतिक्रमण व मुजोरीची झालेली आहे. रेल्वे स्थानकापासूनच्या १५० मीटर परिसरात तसेच रुग्णालय,शैक्षणिक संकुल, धार्मिक स्थळांच्या १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे. शिवाय महापालिकेने पूर्वीच शहरातील मुख्य रस्ते व नाके हे ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहेत. तसे असताना शहरातील कानाकोपरा हा फेरीवाले, टपरीवाले, हातडीवाल्यानी बळकावला आहे. त्यात देखील मोठे अर्थकारण व संगनमत चालते.

अनधिकृत बांधकामांना तसेच बेकायदा फेरीवाल्यांना सर्रास नियमबाह्य वीज पुरवठा अदानी, टाटा आदी वीज कंपन्यां कडून केला जात असल्याचे आरोप आहेत. महसूल विभागाने तर सरकारी व कांदळवन क्षेत्रातल्या बांधकामांना वीज पुरवठा करू नये असे आदेश २०१७, २०२० सलात वीज कंपन्यांना लेखी दिले होते. विक्रम कुमार आयुक्त असताना त्यांनी देखील अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा बंद केला होता. शासनाने देखील त्यांची भूमिका योग्य ठरवत न्याय आणि विधी विभागाने वीज कायद्यातील कलम ४३ चा संदर्भ हा अतिक्रमित व अपप्रवेशी व्यक्तीसाठी नसल्याचे स्पष्ट केले होते. तरी देखील वीज कंपन्या ह्या त्यांची विजेची खपत व कमावण्यासाठी सर्रास बेकायदा बांधकामांना वीज पुरवठा करत आली आहे. फेरीवाले, टपरीवाले देखील बेकायदा वीज पुरवठा वापरत असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नाही . 

फेरीवाले व बेकायदा बांधकामांना वीज पुरवठा केला जात असल्याचे लोकमतने वृत्त दिले होते . फेरीवाला तर बेकायदा एका बल्ब साठी रोज ५० रुपये देत असल्याचे लोकमतने उघडकीस आणले होते. लोकमतच्या वृता नंतर अदानी इलेक्ट्रिकसीटी ने फेरीवाले, टपऱ्या आदींना होणाऱ्या वीज पुरवठ्यावर कारवाई सुरु केली आहे. तर दुसरीकडे महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी सदर बाब गांभीर्याने घेत त्यांच्या मान्यतेने उपायुक्त मारुती गायकवाड यांनी अदानी व टाटा ह्या वीज कंपन्यांना लेखी आदेश जारी करून फेरीवाले व अनधिकृत बांधकाम ना वीज पुरवठा करू नये असे बजावले आहे. 

उपायुक्तांनी पत्रात शहरातील रस्ते, पदपथ वर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्याना लगतचे दुकानदार आदी मासिक रक्कम घेऊन वीज पुरवठा करत आहेत तसेच पालिकेचा भोगवटा दाखला / वापर परवाना नसताना अनधिकृत बांधकामांना कोणत्याही प्रकारे कागदपत्रांची शहनिशा न करता वीज पुरवठा केला जात असल्याचे सुनावले आहे. अनधिकृत फेरीवाल्यांना आणि बेकायदा बांधकामांना वीज पुरवठा होणार नाही याची दक्षता घेण्याचे बजावले आहे.  

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक