शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

मीरा-भाईंदर महापालिका ठेकेदाराच्या सर्वेक्षणात फेरीवाल्यांची संख्या तब्बल ७६७२

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 8:41 PM

मीरा-भाईंदरमध्ये फेरीवाल्यांचा आकडा तब्बल ७ हजार ६७२ इतकी असल्याचा महापालिकेने नेमलेल्या खासगी ठेकेदाराच्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आला आहे.

मीरा रोड - मीरा-भाईंदरमध्ये फेरीवाल्यांचा आकडा तब्बल ७ हजार ६७२ इतकी असल्याचा महापालिकेने नेमलेल्या खासगी ठेकेदाराच्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आला आहे. फेरीवाल्यांच्या कागदपत्रांची पडताळणी तसेच फेरीवाला समितीमध्ये मान्यतेनंतर यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे पालिका सूत्रांकडून सांगण्यात आले. तर दुसरीकडे फेरीवाला संघटनांनी सदर सर्वेक्षणाबद्दलच शंका उपस्थित केली असल्याने सदर सर्वेक्षण वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.मीरा-भाईंदरमधील फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणासाठी महापालिकेने मँगो इंटरप्रायझेस या ठेकेदारास कंत्राट दिले होते. प्रती फेरीवाल्याच्या सर्वेक्षणासाठी ११४ रुपये शुल्क पालिका ठेकेदारास अदा करणार आहे. मार्च २०१९ पासून ठेकेदाराने मोबाईल अ‍ॅपद्वारे सर्वेक्षण सुरू करून ते नोव्हेंबरमध्ये पूर्ण केले. फेरीवाल्यांकडून त्याचे आधार कार्ड व शिधावाटप पत्रिका पुरावा म्हणून घेण्यात आले आहे. आधार कार्डशी लिंक होत नसेल तर बायोमॅट्रिक यंत्राच्या सहाय्याने फेरीवाल्याच्या बोटांचे ठसे घेऊन आधारशी जोडण्यात आले आहे.फेरीवाल्याच्या बसण्याच्या जागेचे जिओ लोकेशन घेण्यात आले आहे. ७ हजार ६७२ फेरीवाल्यांची नोंदणी अ‍ॅपद्वारे करून त्याची माहिती थेट राज्य शासनाच्या पोर्टलला अपलोड केली गेली आहे, असे या सर्वेक्षणाशी संबंधित समन्वयकाकडून सांगण्यात आले. यातील सुमारे ३ हजार फेरीवाल्यांनी कागदपत्रे जमा केली आहेत. आधारशी लिंक व शासनाच्या पोर्टलवर माहिती अपलोड झाल्याने एकाच फेरीवाल्याची दोन वेगळ्या ठिकाणी नोंदणी होणार नसल्याचे सांगण्यात आले.सर्वेक्षणात आढळून आलेल्या फेरीवाल्यांची तसेच त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. त्यातील पात्र फेरीवाले ठरवले जाणार आहेत. परंतु सदर सर्वेक्षण करताना अनेक त्रुटी आणि गैरप्रकारांचे आरोप आझाद हॉकर्स युनियन आदी फेरीवाल्यांच्याच संघटनांनी केले होते. एखाद्या भागातील सर्वेक्षणाची माहिती आधीच दिली गेल्याने फेरीवाल्यांना बसवून नोंदणी करून घेतल्याच्या तक्रारी आहेत. तर न्यायालयाच्या आदेशानुसार १ मे २०१४ पर्यंतचे फेरीवाले पात्र असून, त्यांचा सक्षम पुरावा पडताळणी करून मगच त्यांना पात्र ठरवले गेले पाहिजे, असे युनियनचे जय सिंह यांनी सांगितले. पालिका, काही लोकप्रतिनधी, बाजार वसुली ठेकेदार आदी संबंधितांच्या संगनमताने या सर्वेक्षणात बोगस नोंदणीचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला.महत्त्वाचे म्हणजे सर्वेक्षण आहे म्हणून फेरीवाला बसला आहे का ? असा प्रश्न असून आठवडे बाजारात बसणा-या फेरीवाल्यांच्या नोंदी देखील केल्या गेल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटर तर शैक्षणिक संकुल, धार्मिक स्थळ, रुग्णालय पासून १०० मीटर अंतरापर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई केली असताना त्या मनाई क्षेत्रात बसणा-या फेरीवाल्यांची देखील नोंद केली गेली आहे.मीरा भाईंदरमध्ये फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर बनला असून, पालिकेने केलेली तात्पुरती मार्केट भलत्याच फेरीवाल्यांना बसवण्यासह अवास्तव शुल्क वसुलीमुळे वादग्रस्त ठरली आहे. त्यातच फेरीवाल्यांची संख्या वाढवण्यामागे बाजार वसुली करणा-या ठेकेदारांचे राजकीय लागेबांधे असल्याचे आरोप सतत होत आला आहे. त्यामुळे फेरीवाल्यांचे सर्वेक्षण आणि पडताळणी भविष्यात वादाचा विषय ठरण्याची शक्यता आहे. जुन्या फेरीवाल्यांना न्याय हक्क मिळाला पाहिजेच, पण इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या फेरीवाल्यांचे नियोजन कसे करणार हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.