शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मीरा-भाईंदरचे नगरसेवक देणार पूरग्रस्तांसाठी एका महिन्याचे मानधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 22:32 IST

पश्चिम महाराष्ट्र, कोकण आदी राज्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी मीरा-भाईंदर महापालिकेचे सर्व नगरसेवक आपले एक महिन्याचे मानधन देणार आहेत.

मीरा रोड - पश्चिम महाराष्ट्र, कोकण आदी राज्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी मीरा-भाईंदर महापालिकेचे सर्व नगरसेवक आपले एक महिन्याचे मानधन देणार आहेत. महापालिका आयुक्त देखील महिन्याचे वेतन देणार असून, वर्ग १ व २ चे अधिकारी १५ दिवसांचे तर वर्ग ३ - ४ चे कर्मचारी ५ दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देतील. या शिवाय महापालिका १ कोटी रुपये देणार आहे.आज बुधवारी झालेल्या महासभेत पूरग्रस्तांसाठी शिवसेना गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांनी सेनेचे सर्व २२ नगरसेवक महिन्याभराचे मानधन देणार असल्याचे सांगीतले. तसे लेखीपत्र महापालिकेस सेनेने दिले आहे. उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी देखील भाजपाचे सर्व ६१ नगरसेवक आपले एक महिन्याचे मानधन पूरग्रस्तांसाठी देणार असल्याचे जाहीर केले. काँग्रेसने आधीच त्यांचे नगरसेवक एका महिन्याचे मानधन देणार असल्याचे म्हटले होते.उपमहापौर वैती यांनी या वेळी महापालिकेने देखील पूरग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी सूचना आयुक्तांना केली. त्यावर आयुक्त बालाजी खतगावकर यांनी महासभेने तसा ठराव करावा व तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवेन असे सांगितले. यावेळी आयुक्तांनी आपण आपला महिन्याभराचा पगार पूरग्रस्तांसाठी देत असल्याचे सांगत महापालिकेतील वर्ग १ व २ चे अधिकारी आपले १५ दिवसांचे वेतन देणार आहेत, तर वर्ग ३ व ४ चे कर्मचारी आपले ५ दिवसांचे वेतन देणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. महासभेने एक सर्वपक्षीय समिती तयार करून शहरातील उद्योजक, दानशूर आदींना आवाहन करून निधी गोळा करावा आणि तो पूरग्रस्तांसाठी द्यावा, अशी सूचना देखील आयुक्तांनी केली.भाजपाच्या नगरसेविका दीपाली मोकाशी यांनी मात्र मदतीचे मार्केटिंग करू नका, असे सुनावत तेथे प्रत्यक्ष तिकडची परिस्थिती पहा म्हणजे तुम्हाला कळेल. डॉक्टरांचे पथक पाठवा. पूरग्रस्तांना माणुसकी म्हणुन मदत करा , कीती केली ती दाखवायची गरज नाही. मदतीचा केवळ ड्रामा चालला आहे, असा संताप व्यक्त केला.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरSatara Floodसातारा पूरSangli Floodसांगली पूरKolhapur Floodकोल्हापूर पूर