शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मिरा भार्इंदर महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये २५ टक्के कपात करण्याच्या पालिकेच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 20:32 IST

आरोग्य, वैद्यकिय, उद्यान, आस्थापना, परिवहन आदी विभागातील कार्यरत सुमारे ३ हजार कंत्राटी कर्मचारयांच्या संख्येत तब्बल २५ टक्के इतकी कपात करण्याच्या हालचाली मिरा भार्इंदर महापालिकेच्या प्रशासनाने सुरु केल्या आहेत.

- धीरज परबमिरारोड -  मिरा भार्इंदर महापालिकेच्या स्थायी व अस्थायी आस्थापनेचा खर्च तब्बल ६० टक्के पर्यंत पोहचला असून, नियमा नुसार तो महसुली उत्पन्नाच्या ३५ टक्के मर्यादेत असायला हवा. परिणामी पालिकेच्या काटकसरी धोरणा खाली आता आरोग्य, वैद्यकिय, उद्यान, आस्थापना, परिवहन आदी विभागातील कार्यरत सुमारे ३ हजार कंत्राटी कर्मचारयांच्या संख्येत तब्बल २५ टक्के इतकी कपात करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरु केल्या आहेत.मीरा भाईंदर महापालिकेच्या आरोग्य, आस्थापना, वैद्यकिय, उद्यान, परिवहन आदी विभागां मध्ये कंत्राटी पध्दतीने सुमारे ३ हजार कर्मचारी घेतले आहेत. तर पालिकेच्या कायम सेवेतील सुमारे दिड हजार कर्मचारी आहेत. पालिकेच्या सेवेत कायम स्वरुपी कर्मचारयां पेक्षा कंत्राटी पध्दतीने काम करणारया कंत्राटी कर्मचारयांची संख्या जवळपास दुप्पट आहे.आरोग्य विभागात १३९९ कंत्राटी सफाई कर्मचारी आहेत. सदर सफाई कामगार हे ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट या ठेकेदाराच्या माध्यमातुन शहरातील दैनंदिन कचरा व गटार सफाईचे काम करतात.पालिकेने मुख्यालयासह विविध कार्यालयं, उद्यान, मैदान, स्मशान भुमी आदी ठिकाणी ७१२ सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. सदर सुरक्षा रक्षक पुरवण्याचे काम पालिकेने सैनिक सिक्युरीटी ला दिलेले आहे. परिवहन विभागात देखील सुमारे साडेतीनशे कर्मचारी ठेका पध्दतीने घेण्यात आलेले आहेत.उद्यान विभागात २७५ मजुर तरआस्थापना विभागात ८० संगणक चालक आहेत. शिवाय वैद्यकिय विभागात डांस निर्मुलनासाठी किटकनाशक फवारणी करणारे १८१ कर्मचारी कंत्राटी पध्दतीनेच घेण्यात आले आहेत.दुपटीने कंत्राटी कर्मचारी पालिका सेवेत कार्यरत असुन पालिकेचा आस्थापने वरचा खर्च देखील मोठा आहे. त्यामुळे पालिके वरील असणारा कर्जाचा डोंगर, उत्पन्नाचे कमी असलेले स्तोत्र, कामांवर होणारा वाढता खर्च आदींचा लेखा जोखा मांडत प्रशासनाने कंत्राटी कर्मचारयां मध्ये किमान २५ टक्के कपात करण्यात यावी असा पावित्रा घेतला आहे.या संदर्भात उपायुक्त मुख्यालय विजयकुमार म्हसाळ यांनी सर्व संबंधित विभाग प्रमुखांची बैठक बोलावली होती. बैठकीत कंत्राटी कर्मचारयांच्या कपाती बद्दल चर्चा करण्यात आली.त्या अनुषंगाने आरोग्य, आस्थापना, परिवहन, उद्यान, वैद्यकिय आरोग्य या विभागाच्या विभाग प्रमुखांना उपायुक्त मुख्यालय म्हसाळ यांनी पत्रक काढले आहे. स्थायी व अस्थायी कर्मचारयां वरील आस्थापनेचा खर्च ६० टक्के पर्यंत गेला आहे. त्यामुळे २०१५ ते २०१७ दरम्यानच्या कालावधीत कार्यरत कमरचारयांच्या संख्येचा आणि कामाचा अभ्यास करावा. इतकी कामगार वाढ का झाली ? आदी मुद्दे उपस्थित करत सदर विभागाच्या विभाग प्रमुखांना आपल्या स्तरावर २५ टक्के कंत्राटी कर्मचारी कपातीचा प्रस्ताव सादर करण्यास सांगीतले आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकEmployeeकर्मचारी