शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

मीरा-भार्इंदर : पाणी टंचाई दूर करा अन्यथा बादली व अस्वच्छ कपडे आंदोलन छेडू; काँग्रेसचा पालिकेला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 21:37 IST

शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसने देखील मीरा-भार्इंदर पालिकेकडे पाणी टंचाई त्वरीत दूर करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ८ दिवसांचे अल्टीमेटम देण्यात आले असून

भार्इंदर :  शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसने देखील मीरा-भार्इंदर पालिकेकडे पाणी टंचाई त्वरीत दूर करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ८ दिवसांचे अल्टीमेटम देण्यात आले असून त्याची दखल न घेतल्यास पालिका मुख्यालयात अस्वच्छ कपड्यांसह बादली आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी प्रशासनाला दिला आहे. 

पालिकेने पाणीपुरवठा वाढताच नवीन नळजोडणी देण्यास सुरुवात केली. त्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करुन नवीन नळजोडण्या देणे आवश्यक होते. मात्र तसे न करता पालिकेतील भाजपा सत्ताधाऱ्यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाण्यासाठी कुणालाही वंचित न ठेवता सरसकट सर्वांनाच नवीन नळजोडणी देण्याचे आदेश पालिकेला दिले. यामुळे पाण्याचे नियोजन  कोलमडले. त्यातच अनधिकृत नळजोडण्यांना प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने पाणीपुरवठ्याच्या समस्येत भर पडली आहे. यामुळे ऐन पाणीकपातीच्या कालावधीत पुर्वीच्या अधिकृत नळजोडणीधारकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा वाढल्याचे कारण पुढे करीत प्रशासनाने अचानकपणे नागरीकांना वाढीव बिले वितरीत केली. यावर तत्कालिन महासभेत चर्चा झडताच आयुक्त बळीराम पवार यांनी वाढीव बिलांत दुरुस्ती करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाला दिले. तोपर्यंत नागरीकांनी पाण्याच्या बिलांचा भरणा केलेला नाही. परंतु, दुरुस्ती झालेली बिले अद्याप नागरीकांना वितरीत न करता वाढीव बिलांची रक्कम न भरणाऱ्या  नागरीकांचा पाणीपुरवठाच खंडीत करण्याच्या कारवाईसाठी पालिकेचे कर्मचारी परिसरात फिरत असल्याचा दावा सावंत यांनी केला आहे. वाढीव पाणीपुरवठ्यामुळे पुर्वीच्या सुमारे ६० ते ७० तासांचे अंतर वाढीव पाणीपुरवठ्यामुळे २५ तासांवर आले असताना ते कपातीमुळे पुन्हा ७० तासांवर गेले आहे. यामुळे प्रभाग ९, १६, १७, १९ व २२ मधील नयानगर, सृष्टी, शांतीनगर, गोविंद नगर, भारती पार्क, नुपूर, शीतल नगर, शांतीपार्कमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याचा दावा सांवत यांनी केला आहे. सुर्या धरणातून २०० एमएलडी पाणी शहरात आणण्याचे आश्वासन पालिकेतील भाजपा सत्ताधाऱ्यांनी मोठमोठ्या होर्डींगद्वारे नागरीकांना दिले असले तरी त्यांना शहराला लागू करण्यात आलेली पाणी कपात, राज्यात स्वपक्षाचे सरकार असताना देखील रद्द करता येत नसल्याचा टोला सत्ताधाऱ्यांना लगावला. येत्या ८ दिवसांत प्रशासनाने निर्माण झालेली पाणी टंचाई दूर करावी अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा सावंत यांनी दिला आहे. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकWaterपाणी