शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

मीरा-भार्इंदर : पाणी टंचाई दूर करा अन्यथा बादली व अस्वच्छ कपडे आंदोलन छेडू; काँग्रेसचा पालिकेला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 21:37 IST

शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसने देखील मीरा-भार्इंदर पालिकेकडे पाणी टंचाई त्वरीत दूर करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ८ दिवसांचे अल्टीमेटम देण्यात आले असून

भार्इंदर :  शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसने देखील मीरा-भार्इंदर पालिकेकडे पाणी टंचाई त्वरीत दूर करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ८ दिवसांचे अल्टीमेटम देण्यात आले असून त्याची दखल न घेतल्यास पालिका मुख्यालयात अस्वच्छ कपड्यांसह बादली आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी प्रशासनाला दिला आहे. 

पालिकेने पाणीपुरवठा वाढताच नवीन नळजोडणी देण्यास सुरुवात केली. त्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करुन नवीन नळजोडण्या देणे आवश्यक होते. मात्र तसे न करता पालिकेतील भाजपा सत्ताधाऱ्यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाण्यासाठी कुणालाही वंचित न ठेवता सरसकट सर्वांनाच नवीन नळजोडणी देण्याचे आदेश पालिकेला दिले. यामुळे पाण्याचे नियोजन  कोलमडले. त्यातच अनधिकृत नळजोडण्यांना प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने पाणीपुरवठ्याच्या समस्येत भर पडली आहे. यामुळे ऐन पाणीकपातीच्या कालावधीत पुर्वीच्या अधिकृत नळजोडणीधारकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा वाढल्याचे कारण पुढे करीत प्रशासनाने अचानकपणे नागरीकांना वाढीव बिले वितरीत केली. यावर तत्कालिन महासभेत चर्चा झडताच आयुक्त बळीराम पवार यांनी वाढीव बिलांत दुरुस्ती करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाला दिले. तोपर्यंत नागरीकांनी पाण्याच्या बिलांचा भरणा केलेला नाही. परंतु, दुरुस्ती झालेली बिले अद्याप नागरीकांना वितरीत न करता वाढीव बिलांची रक्कम न भरणाऱ्या  नागरीकांचा पाणीपुरवठाच खंडीत करण्याच्या कारवाईसाठी पालिकेचे कर्मचारी परिसरात फिरत असल्याचा दावा सावंत यांनी केला आहे. वाढीव पाणीपुरवठ्यामुळे पुर्वीच्या सुमारे ६० ते ७० तासांचे अंतर वाढीव पाणीपुरवठ्यामुळे २५ तासांवर आले असताना ते कपातीमुळे पुन्हा ७० तासांवर गेले आहे. यामुळे प्रभाग ९, १६, १७, १९ व २२ मधील नयानगर, सृष्टी, शांतीनगर, गोविंद नगर, भारती पार्क, नुपूर, शीतल नगर, शांतीपार्कमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याचा दावा सांवत यांनी केला आहे. सुर्या धरणातून २०० एमएलडी पाणी शहरात आणण्याचे आश्वासन पालिकेतील भाजपा सत्ताधाऱ्यांनी मोठमोठ्या होर्डींगद्वारे नागरीकांना दिले असले तरी त्यांना शहराला लागू करण्यात आलेली पाणी कपात, राज्यात स्वपक्षाचे सरकार असताना देखील रद्द करता येत नसल्याचा टोला सत्ताधाऱ्यांना लगावला. येत्या ८ दिवसांत प्रशासनाने निर्माण झालेली पाणी टंचाई दूर करावी अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा सावंत यांनी दिला आहे. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकWaterपाणी