शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदर : पाणी टंचाई दूर करा अन्यथा बादली व अस्वच्छ कपडे आंदोलन छेडू; काँग्रेसचा पालिकेला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 21:37 IST

शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसने देखील मीरा-भार्इंदर पालिकेकडे पाणी टंचाई त्वरीत दूर करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ८ दिवसांचे अल्टीमेटम देण्यात आले असून

भार्इंदर :  शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसने देखील मीरा-भार्इंदर पालिकेकडे पाणी टंचाई त्वरीत दूर करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ८ दिवसांचे अल्टीमेटम देण्यात आले असून त्याची दखल न घेतल्यास पालिका मुख्यालयात अस्वच्छ कपड्यांसह बादली आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी प्रशासनाला दिला आहे. 

पालिकेने पाणीपुरवठा वाढताच नवीन नळजोडणी देण्यास सुरुवात केली. त्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करुन नवीन नळजोडण्या देणे आवश्यक होते. मात्र तसे न करता पालिकेतील भाजपा सत्ताधाऱ्यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाण्यासाठी कुणालाही वंचित न ठेवता सरसकट सर्वांनाच नवीन नळजोडणी देण्याचे आदेश पालिकेला दिले. यामुळे पाण्याचे नियोजन  कोलमडले. त्यातच अनधिकृत नळजोडण्यांना प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने पाणीपुरवठ्याच्या समस्येत भर पडली आहे. यामुळे ऐन पाणीकपातीच्या कालावधीत पुर्वीच्या अधिकृत नळजोडणीधारकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा वाढल्याचे कारण पुढे करीत प्रशासनाने अचानकपणे नागरीकांना वाढीव बिले वितरीत केली. यावर तत्कालिन महासभेत चर्चा झडताच आयुक्त बळीराम पवार यांनी वाढीव बिलांत दुरुस्ती करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाला दिले. तोपर्यंत नागरीकांनी पाण्याच्या बिलांचा भरणा केलेला नाही. परंतु, दुरुस्ती झालेली बिले अद्याप नागरीकांना वितरीत न करता वाढीव बिलांची रक्कम न भरणाऱ्या  नागरीकांचा पाणीपुरवठाच खंडीत करण्याच्या कारवाईसाठी पालिकेचे कर्मचारी परिसरात फिरत असल्याचा दावा सावंत यांनी केला आहे. वाढीव पाणीपुरवठ्यामुळे पुर्वीच्या सुमारे ६० ते ७० तासांचे अंतर वाढीव पाणीपुरवठ्यामुळे २५ तासांवर आले असताना ते कपातीमुळे पुन्हा ७० तासांवर गेले आहे. यामुळे प्रभाग ९, १६, १७, १९ व २२ मधील नयानगर, सृष्टी, शांतीनगर, गोविंद नगर, भारती पार्क, नुपूर, शीतल नगर, शांतीपार्कमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याचा दावा सांवत यांनी केला आहे. सुर्या धरणातून २०० एमएलडी पाणी शहरात आणण्याचे आश्वासन पालिकेतील भाजपा सत्ताधाऱ्यांनी मोठमोठ्या होर्डींगद्वारे नागरीकांना दिले असले तरी त्यांना शहराला लागू करण्यात आलेली पाणी कपात, राज्यात स्वपक्षाचे सरकार असताना देखील रद्द करता येत नसल्याचा टोला सत्ताधाऱ्यांना लगावला. येत्या ८ दिवसांत प्रशासनाने निर्माण झालेली पाणी टंचाई दूर करावी अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा सावंत यांनी दिला आहे. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकWaterपाणी