शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मीरा-भार्इंदरमध्ये भाजपामुळे शिवसेना आली मेटाकुटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:52 IST

स्पष्ट बहुमत मिळाल्यापासून मीरा-भार्इंदर महापालिकेच्या माध्यमातून भाजपा नेतृत्त्वाकडून मनमानी आणि सुडाचे राजकारण सुरु आहे.

मीरा रोड : स्पष्ट बहुमत मिळाल्यापासून मीरा-भार्इंदर महापालिकेच्या माध्यमातून भाजपा नेतृत्त्वाकडून मनमानी आणि सुडाचे राजकारण सुरु आहे. आमदार प्रताप सरनाईकांसह शिवसेनेला सरसकट टार्गेट केले जात असून प्रशासनही त्यांना साथ देत असल्याने मेटाकुटीला आलेल्या शिवसेना नगरसेवकांनी अखेरचा पर्याय म्हणून पालकमंत्री एकनाथ श्ािंदे यांनाच साकडे घातले आहे. अधिवेशनानंतर ते पालिकेत येणार असल्याने नव्या वर्षात या दोन्ही पक्षातील संघर्षाला नवी धार मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.मीरा-भार्इंदर मध्ये २०१२ च्या पालिका निवडणुकीच्या जागावाटपात त्यावेळी नगरसेवक असलेल्या नरेंद्र मेहतांनी आमदार प्रताप सरनाईकांना धक्का दिला होता. सोयीने काही ठिकाणी युती टाळली होती आणि भाजपाच्या जास्त जागा निवडून आणल्या. त्यानंतर पालिकेत भाजपा-शिवसेना युती असली तरी मेहतांनी पालिकेच्या कारभारात झोकून देत शिवसेनेला कात्रीत पकडणे सुरुच ठेवले. अनेक मुद्द्यांवर शिवसेनेनेही भाजपाला साथ न देता जशास तसे वागण्याचा प्रयत्न केला. मग मेहतांनी शिवसेनेचे नगरसेवक तसेच पदाधिकारी फोडत सरनाईकांना शह दिला. भाजपामध्ये मेहतांच्या नेतृत्त्वाला त्रासलेल्यांना आपल्याकडे खेचून घेत सरनाईकांनी काटशह दिला.यंदाच्या महापालिका निवडणुकीच्या निकालात भाजपाने ६१ जागा जिंकून सर्वांनाच चकीत केले. आ. सरनाईकांना तर हा भाजपा नेतृत्त्वाचा जोरदार धक्काच होता. निवडणुकीनंतर शिवसेना नगरसेवक राजू भोईर आदींना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच भाजपात प्रवेश दिल्याचे भाजपाने जाहीर केले. पण भोईर यांनी त्याचा इन्कार केल्याने भाजपाची फजिती झाली.पालिकेतील विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेला मिळणे अपेक्षित असताना जाणूनबुजून महापौरांनी ते जाहीर न केल्याने शिवसेनेत संताप उसळला. त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. शिवसेनेच्या आंदोलनानंतर मेहता यांनी आणखीन आक्रमक भूमिका घेतली. पालिकेने नोटीस न देताच कमलेश, राजू व भावना भोईर या शिवसेना नगरसेवकांच्या कुटुंबीयांचे बांधकाम भुईसपाट केले. भोईर कुटुंबीयांनी आयोजित केलेली सर्कस बंद पाडण्यात आली.खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भूमिपूजन केलेले नाट्यगृह रद्द करण्याचा प्रस्ताव महासभेत आणून आ. सरनाईकांपासून थेट ठाकरे यांनाच धक्का देण्याची खेळी आमदार मेहतांनी महापौरांच्या आडून केली आहे. शिवाय नवघर गावामागे स्थानिकांचा विरोध असताना दफनभूमीचा प्रस्ताव आणून शिवसेना नगरसेवकांची तारांबळ उडवली आहे.महापालिका आयुक्तांसह प्रशासनही सत्ताधाºयांच्या तालावरच कारभार करत असून बदल्यांपासून जवळपास सर्वच कामकाज त्यांच्या मर्जीप्रमाणे चालवले जात आहे. अधिकारी व कर्मचारीही भाजपा नेतृत्त्वाच्या बंगल्यावर नियमित हजेरी लावत असल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे. आमदार सरनाईक हे भाजपा नेतृत्वासह प्रशासनास प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करीत असले तरी ते अपुरे पडत असल्याचे सध्याच्या घटनाक्रमावरून दिसते. महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्ष शहरात शिवसेनेचे आक्रमक नेतृत्त्व दिसत नाही. त्यामुळे सर्व भिस्त सरनाईकांवरच आहे. पण प्रशासनही दाद देत नसल्याने आणि भाजपा नेतृत्त्वाकडून एकापाठोपाठ एक दिल्या जाणाºया धक्क्यांमुळे शिवसेना मेटाकुटीला आली आहे. या अवस्थेमुळे शिवसैनिकांसह पदाधिकारी आणि नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे.सेनेतील गटबाजीचा मेहतांना फायदाप्रताप सरनाईकांचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे यांच्याशी जमत नाही, ही राजकीय चर्चा नवीन नाही.मीरा-भार्इंदरमध्येही शिवसेनेत सरनाईक यांचा एक गट आणि दुसरीकडे शिंदे-विचारे यांचा गट असल्याचे मानले जाते. जिल्ह्याचे नेते असले तरी आतापर्यंत ‘मातोश्री’चा वरदहस्त सरनाईक यांच्या पाठीशी असल्याने शिंदे यांनी मीरा-भार्इंदरमधील राजकारणात फारसे लक्ष घातलेले नाही.शिवसेनेतील या गटबाजीमुळे पालकमंत्री, खासदार आणि आमदार असूनही पालिकेत शिवसेनेला किंमत राहिली नाहीच, शिवाय भाजपा आणि आमदार मेहता वरचढ ठरत असल्याची भावना शिवसैनिकांसोबतच आता नगरसेवकांमध्येही वाढीस लागली आहे.शिंदे यांचा जनसंवादप्रताप सरनाईक यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाºया शिवसेना नगरसेवकांनी नुकतीच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मीरा- भार्इंदरमधील हाताबाहेर चाललेली परिस्थिती त्यांच्या कानावर टाकली.आमदार मेहता व भाजपाकडून चाललेले सुडाचे आणि मनमानी राजकारण मोडुन काढण्यासाठी तसेच पालिका प्रशासनावर शिवसेनेची जरब रहावी म्हणून मीरा-भार्इंदरमध्ये लक्ष घाला, असे साकडे या नगरसेवकांनी शिंदे यांना घातले आहे.पालिकेत पालकमंत्री म्हणून ‘जन संवाद’ कार्यक्रम सुरु करा, असा आग्रह नगरसेवकांनी त्यांच्याकडे धरला आहे. अधिवेशनानंतर लक्ष घालतो, असे आश्वासन शिंदे यांनी दिल्याचे त्या शिवसेना नगरसेवकांनी सांगितले.यामुळे नव्या वर्षात शिवसेना भाजपाला जशास तसे उत्तर देण्यास तयार होणार हे नक्की. पण यातून शिवसेनेतील गटबाजी चिघळणार की शिवसेनेला आधार मिळणार, हेही स्पष्ट होईल.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक