शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
3
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
4
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
5
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
6
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
7
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
8
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
9
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
10
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
11
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
12
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
13
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
14
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
15
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
16
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
17
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
18
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
19
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
20
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भोंगापतींमुळे हिंदू भाविकांचे सर्वात मोठे नुकसान झाले; जितेंद्र आव्हाडांची राज ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 15:56 IST

मीरा रोड : गेल्या काही दिवसांत भोंगा नावाने वातावरण खराब करण्याचा प्रयत्न झाला; पण महाराष्ट्राच्या जनतेने भोंग्याचा पोंगा करून ...

मीरा रोड : गेल्या काही दिवसांत भोंगा नावाने वातावरण खराब करण्याचा प्रयत्न झाला; पण महाराष्ट्राच्या जनतेने भोंग्याचा पोंगा करून टाकला. मराठीत उचापती म्हणतात तसेच हे भोंगापती, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता केली; परंतु या भोंगपतींमुळे सर्वात मोठे नुकसान हिंदू भाविकांचे झाल्याचे ते म्हणाले.

मीरा रोडच्या मेडतीया मैदानात रविवारी आयोजित पक्षाच्या मेळाव्यात आव्हाड बोलत होते. कोरोनाकाळात कोणी उपचार केले, कोणी रक्त दिले, कोणी सेवा केली माहिती नाही. कोरोनामुळे मृत्यू झाल्यावर प्रेताच्या जवळ जायला लोक घाबरायचे. त्यावेळी मृतदेह कोणी उचलले व अंत्यविधी कोणी केले, त्यांचे धर्म कोणते याचा विचार त्यावेळी कोणी केला नाही. केवळ माणुसकी दिसत होती; पण कोरोना गेला आणि नेत्यांना पुन्हा धर्म-जात आठवायला सुरुवात झाली, असे आव्हाड म्हणाले. यावेळी प्रदेश सचिव मोहन पाटील, माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम, जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे, साजिद पटेल, अनु पाटील आदी उपस्थित होते.

कर्ण्यावरून होणारी आरती झाली बंद

भोंगा या विषयामुळे सर्वात मोठी अडचण श्रद्धाळू हिंदूंची झाली. कारण शिर्डीची शेजारती- काकड आरती कर्ण्यावरून व्हायची बंद झाली. पंढरपूरची विठ्ठल-रखुमाईची, तुळजापूरची आरती तशीच बंद झाली. मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर उभे राहून कर्ण्यावरून ऐकू येणारी आरती भाविक करायचे. मुस्लिमांनी निर्णय घेत दीड मिनिटांची अजान भोंग्यावरून बंद केली, याकडे आव्हाड यांनी लक्ष वेधले. स्वतःच खणलेल्या खड्ड्यात माणूस कसा पडतो त्याचे उद्दाम उदाहरण भोंगापती आहे, असा टोला आव्हाड यांनी लगावला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसे