शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

भोंगापतींमुळे हिंदू भाविकांचे सर्वात मोठे नुकसान झाले; जितेंद्र आव्हाडांची राज ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 15:56 IST

मीरा रोड : गेल्या काही दिवसांत भोंगा नावाने वातावरण खराब करण्याचा प्रयत्न झाला; पण महाराष्ट्राच्या जनतेने भोंग्याचा पोंगा करून ...

मीरा रोड : गेल्या काही दिवसांत भोंगा नावाने वातावरण खराब करण्याचा प्रयत्न झाला; पण महाराष्ट्राच्या जनतेने भोंग्याचा पोंगा करून टाकला. मराठीत उचापती म्हणतात तसेच हे भोंगापती, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता केली; परंतु या भोंगपतींमुळे सर्वात मोठे नुकसान हिंदू भाविकांचे झाल्याचे ते म्हणाले.

मीरा रोडच्या मेडतीया मैदानात रविवारी आयोजित पक्षाच्या मेळाव्यात आव्हाड बोलत होते. कोरोनाकाळात कोणी उपचार केले, कोणी रक्त दिले, कोणी सेवा केली माहिती नाही. कोरोनामुळे मृत्यू झाल्यावर प्रेताच्या जवळ जायला लोक घाबरायचे. त्यावेळी मृतदेह कोणी उचलले व अंत्यविधी कोणी केले, त्यांचे धर्म कोणते याचा विचार त्यावेळी कोणी केला नाही. केवळ माणुसकी दिसत होती; पण कोरोना गेला आणि नेत्यांना पुन्हा धर्म-जात आठवायला सुरुवात झाली, असे आव्हाड म्हणाले. यावेळी प्रदेश सचिव मोहन पाटील, माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम, जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे, साजिद पटेल, अनु पाटील आदी उपस्थित होते.

कर्ण्यावरून होणारी आरती झाली बंद

भोंगा या विषयामुळे सर्वात मोठी अडचण श्रद्धाळू हिंदूंची झाली. कारण शिर्डीची शेजारती- काकड आरती कर्ण्यावरून व्हायची बंद झाली. पंढरपूरची विठ्ठल-रखुमाईची, तुळजापूरची आरती तशीच बंद झाली. मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर उभे राहून कर्ण्यावरून ऐकू येणारी आरती भाविक करायचे. मुस्लिमांनी निर्णय घेत दीड मिनिटांची अजान भोंग्यावरून बंद केली, याकडे आव्हाड यांनी लक्ष वेधले. स्वतःच खणलेल्या खड्ड्यात माणूस कसा पडतो त्याचे उद्दाम उदाहरण भोंगापती आहे, असा टोला आव्हाड यांनी लगावला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसे