शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

लाखो ठाणेकर पितात गुणवत्ता घसरलेले पाणी; महापालिकेच्या 'त्या' रिपोर्टमध्ये काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 18:53 IST

Thane News: ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालामुळे लाखो ठाणेकर अस्वच्छ पाणी पित असल्याचे समोर आले आहे.

Thane Update: ठाण्यातील तलाव, खाडी आणि विहिरीच्या पाण्याची गुणवत्ताही खालावल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेने सादर केलेल्या पर्यावरण अहवालात ३५ तलावांपैकी बहुतेक तलाव हे मध्यम प्रदूषित असल्याचे आढळले आहेत. खाडीच्या पाण्यात अमोनिकल नायट्रोजनची पातळी वाढल्याचे आढळून आले आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला ३५ तलाव शिल्लक आहेत. या तलावांच्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च केला जात आहे, दिवा येथील तलावात पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन हा मानांकनानुसार कमी आढळला. 

वाचा >>मेट्रो येणार; ऑक्सिजनचे कोठार उद्ध्वस्त होणार

नायट्रोजनयुक्त रसायने, खतांचा अतिरेक असलेले सांडपाणी, जनावरांचे मलमूत्र किंवा मैलशुद्धीकरण नसलेले सांडपाणी, तलावातील निर्माल्य यामुळे तलावाचे प्रदूषण वाढत असल्याचा निष्कर्ष पर्यावरण अहवालात काढण्यात आला आहे.

नाल्यातील पाण्याची गुणवत्ताही ढासळली

ठाणे शहरात असलेल्या नाल्यातील पाण्याची गुणवत्ता तपासण्यात आली असून, त्यात ऑक्सिजनची पातळी कमी आढळली आहे.

अमोनिकल नायट्रोजनचे प्रमाणही अधिक आहे. त्यातही हेच पाणी खाडीत जात असल्याने खाडीचे पाणीही दूषित होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

घनकचऱ्यामुळे दूषित

९३ विहिरींची गुणवत्ता महापालिकेने तपासली असता, गढूळपणा आढळला आहे. विहिरींचे पाणी घनकचऱ्यामुळे दूषित झाले आहे, तसेच कूपनलिकांचे पाणीही पिण्यास अयोग्य असल्याचे पर्यावरण अहवालात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाWaterपाणीwater pollutionजल प्रदूषणwater shortageपाणीकपात