शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

लाखो ठाणेकर पितात गुणवत्ता घसरलेले पाणी; महापालिकेच्या 'त्या' रिपोर्टमध्ये काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 18:53 IST

Thane News: ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालामुळे लाखो ठाणेकर अस्वच्छ पाणी पित असल्याचे समोर आले आहे.

Thane Update: ठाण्यातील तलाव, खाडी आणि विहिरीच्या पाण्याची गुणवत्ताही खालावल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेने सादर केलेल्या पर्यावरण अहवालात ३५ तलावांपैकी बहुतेक तलाव हे मध्यम प्रदूषित असल्याचे आढळले आहेत. खाडीच्या पाण्यात अमोनिकल नायट्रोजनची पातळी वाढल्याचे आढळून आले आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला ३५ तलाव शिल्लक आहेत. या तलावांच्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च केला जात आहे, दिवा येथील तलावात पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन हा मानांकनानुसार कमी आढळला. 

वाचा >>मेट्रो येणार; ऑक्सिजनचे कोठार उद्ध्वस्त होणार

नायट्रोजनयुक्त रसायने, खतांचा अतिरेक असलेले सांडपाणी, जनावरांचे मलमूत्र किंवा मैलशुद्धीकरण नसलेले सांडपाणी, तलावातील निर्माल्य यामुळे तलावाचे प्रदूषण वाढत असल्याचा निष्कर्ष पर्यावरण अहवालात काढण्यात आला आहे.

नाल्यातील पाण्याची गुणवत्ताही ढासळली

ठाणे शहरात असलेल्या नाल्यातील पाण्याची गुणवत्ता तपासण्यात आली असून, त्यात ऑक्सिजनची पातळी कमी आढळली आहे.

अमोनिकल नायट्रोजनचे प्रमाणही अधिक आहे. त्यातही हेच पाणी खाडीत जात असल्याने खाडीचे पाणीही दूषित होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

घनकचऱ्यामुळे दूषित

९३ विहिरींची गुणवत्ता महापालिकेने तपासली असता, गढूळपणा आढळला आहे. विहिरींचे पाणी घनकचऱ्यामुळे दूषित झाले आहे, तसेच कूपनलिकांचे पाणीही पिण्यास अयोग्य असल्याचे पर्यावरण अहवालात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाWaterपाणीwater pollutionजल प्रदूषणwater shortageपाणीकपात