शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

यापुढे एमआयडीसीचे नवीन भूखंड केवळ उद्योजकांनाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 2:44 AM

एमआयडीसीतर्फे निवासी भागातील नोंदणीकृत रहिवासी संघटनांना काही वर्षांपूर्वी वृक्षलागवड तसेच बगिचांसाठी राखीव असलेले भूखंड विशिष्ट कालावधीसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आले होते.

डोंबिवली : एमआयडीसीतर्फे निवासी भागातील नोंदणीकृत रहिवासी संघटनांना काही वर्षांपूर्वी वृक्षलागवड तसेच बगिचांसाठी राखीव असलेले भूखंड विशिष्ट कालावधीसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. पण, लाखो रुपये खर्चून विकसित केलेल्या या भूखंडांवर संघटनांना पाणी सोडावे लागणार आहे. भूखंडांच्या भाडेकराराचा कालावधी संपल्यानंतर नूतनीकरण केले जाणार नाही, तसेच मंडळ आणि संस्थांना नवीन भूखंडवाटप करण्याचे धोरण नाही. यापुढे केवळ उद्योजकांनाच नवीन भूखंडवाटप करण्यात येणार असल्याचे एमआयडीसीने जाहीर केल्याने संबंधित संघटनांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.राज्य सरकारच्या नगर नियोजन कायद्यानुसार अंदाजे १० टक्के भूखंड वृक्षलागवड आणि बगिचा यासाठी मोकळे ठेवावे लागतात. त्यानुसार, एमआयडीसीने काही भूखंड मोकळी जागा (ओपन स्पेस) या नावाखाली ठेवले आहेत. एमआयडीसीमधील प्रदूषण रोखणे आणि बेकायदा बांधकामांपासून सरकारी भूखंडांचे संरक्षण करणे, हा यामागचा उद्देश आहे. त्यानुसार, काही वर्षांपूर्वी असे काही मोकळे भूखंड नोंदणीकृत संघटनांना देण्यात आले होते. पाच ते दहा वर्षे अशा ठरावीक कालावधीसाठी दिलेल्या या भूखंडांच्या कराराचा कालावधी संपताच ते पुन्हा ताब्यात घेण्याची प्रक्रिया एमआयडीसीने डिसेंबरपासून सुरू केली आहे. तसेच या कराराचे नूतनीकरण केले जाणार नाही, असेही स्पष्ट केले आहे. याप्रकरणी डोंबिवली वेल्फेअर असोसिएशन, सुदर्शननगर निवासी संघ आणि मिलापनगर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशन, नवचैतन्य रहिवासी सेवा संस्था यांना पत्र पाठवून कळवण्यात आले आहे. डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने एमआयडीसीकडे नवीन भूखंड मिळावा, अशी मागणी केली होती. त्यांनाही नकार देण्यात आला आहे. त्यांनाही पत्र पाठवून उद्योजकांची संघटना व उद्योजक यांना वृक्षारोपण, बागबगिचा, सुशोभीकरणासाठी जागेचे वाटप करता येते. मंडळ, संस्थेस भूखंडवाटप करण्याचे महामंडळाचे धोरण नसल्याचे एमआयडीसीने स्पष्ट केले आहे.लाखोंच्या खर्चावर पाणी : काही वर्षांपूर्वी भाडेतत्त्वावर मिळालेल्या भूखंडांवर लाखो रुपये खर्चून उद्याने साकारली गेली आहेत. उद्यानांबरोबरच जॉगिंग ट्रॅक, ओपन जिमची सुविधा याठिकाणी असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक येतात. मोकळ्या भूखंडांवर मातीचा भराव घालणे, सपाटीकरण करणे, कुंपण घालणे व त्यांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करणे आदी खर्च रहिवासी संघटनांनी केला आहे. भाडेकराराची मुदत वाढवून देण्याच्या रहिवासी संघटनांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून यापुढे भूखंडांच्या कराराचे नूतनीकरण करता येणार नाही, तसेच भूखंडांचे नव्याने वाटप करता येणार नाही, ही एमआयडीसीने घेतलेली भूमिका न पटणारी आहे, अशी प्रतिक्रिया डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी दिली.

टॅग्स :dombivaliडोंबिवली