शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

एमआयडीसीतील कंपन्यांमुळे डोंबिवलीत प्रदूषणाचा कहर, उग्र वासामुळे झोप उडाली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 12:45 AM

एमआयडीसीतील कंपन्यांतून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे शहरातील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. याविरोधात आंदालने, तक्रारी करूनही स्थिती ‘जैसे थे’ असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

डोंबिवली - एमआयडीसीतील कंपन्यांतून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे शहरातील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. याविरोधात आंदालने, तक्रारी करूनही स्थिती ‘जैसे थे’ असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तीन दिवसांपासून कंपन्यांतून सोडले जाणारे प्रदूषित पाणी आणि धुरामुळे रात्री येणाºया उग्र वासामुळे सोनारपाडा, स्टार कॉलनी, तुकारामनगर, आयरे, कोपर आणि ठाकुर्ली परिसरातील रहिवाशांची झोप उडाली आहे.घरोघरी घटस्थापनेची तयारी सुरू असताना कंपन्यांनी गुपचूप प्रदूषित पाणी सोडल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. शुक्रवारपासून रात्री ११ ते पहाटेपर्यंत उग्रवास हा वास येत आहे. यासंदर्भात एमआयडीसीकडे अद्याप कोणीही तक्रार केली नाही. तक्रार केल्यास त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्यामुळे नागरिकांनी दाद कोणाकडे मागायची असा मोठा प्रश्न पडतो.प्रदूषण महामंडळाचे दुर्लक्ष होत असल्याने कंपन्या राजरोस उघड्या नाल्यांमधून रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडतात. मध्यंतरी गोळवली भागामध्येही कल्याण-शीळ महामार्गावर निळ्या रंगाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. तसेच रस्ता रुंदीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यांमध्येही ते जमा झाले होते. टाटा लेनजवळ रस्त्यावर असलेल्या रसायनमिश्रित पाणी साठवण्याच्या टाक्याही ओव्हरफ्लो होऊ न नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. तेव्हा सोशल मीडियावर त्याचे व्हिडीओ, फोटो व्हायरल झाले होते. अशा अनेक घटना सातत्याने घडत असूनही प्रदूषण महामंडळ, एमआयडीसी विभाग या घटनांकडे कोणी तक्रार करत नसल्याचे कारण देत दुर्लक्ष करत आहे. पण, यामुळे डोंबिवली शहरात भोपाळ दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते, याचे गांभीर्यच अधिकाऱ्यांना नाही. सततच्या प्रदूषणामुळे अनेकांना श्वसन, डोळे चुरचुरणे, उलट्या, मळमळणे असा त्रास होत आहे.यासंदर्भात एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे म्हणाले की, उघड्या नाल्यांतून रासायनिक सांडपाणी वाहून नेऊ नये यासाठी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात अशी समस्या उद्भवणार नाही याची काळजी घेतली जात आहे.‘समस्या दूर करण्यासाठी समिती स्थापन करा’केंद्र सरकारने २००५ मध्ये मार्गदर्शक पुस्तिका काढली होती; मात्र त्यातील नियमावलीची कधी अंमलबजावणीच झालेली नाही. ज्या कंपन्या प्रदूषण करतात, त्या कंपनीमालकांवर फौजदारी गुन्हे दाखल हवेत, अशी मागणी एमआयडीसी परिसरातील रहिवासी प्रफुल देशमुख यांनी केली आहे.केमिकल कंपन्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे, तर अशा कंपन्यांनाना बंधने घालायला हवीत. डिस्प्ले बोर्ड लावून त्यातून प्रदूषणाची तीव्रता किती आहे याची दरदिवशी माहिती देणे आवश्यक आहे. प्रदूषण महामंडळाचे कार्यालय कल्याणमध्ये असल्याने काही घडल्यास डोंबिवली एमआयडीसीत अधिकारी येईपर्यंत होत्याचे नव्हते झालेले असते.कंपन्यांकडून केंद्र सरकारच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रदूषण मंडळाने तहसीलदार, स्थानिक पोलीस, एमआयडीसी अधिकारी यांचीएक समिती तयार करून त्याद्वारे समस्या मार्गीलावणे आवश्यक असल्याचे देशमुख म्हणाले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीpollutionप्रदूषण