शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

मीरा-भाईंदर पालिकेच्या ‘परिवहन’चा बोजवारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 1:32 AM

केंद्र शासनाकडून फुकटात बस मिळूनदेखील त्याची देखभाल दुरुस्ती करण्यात नाकर्तेपणा दाखवणाऱ्या मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे ५८ पैकी जेमतेम २० बसच सध्या प्रवाशांच्या सेवेत कशाबशा सुरू आहेत.

मीरा रोड - केंद्र शासनाकडून फुकटात बस मिळूनदेखील त्याची देखभाल दुरुस्ती करण्यात नाकर्तेपणा दाखवणाऱ्या मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे ५८ पैकी जेमतेम २० बसच सध्या प्रवाशांच्या सेवेत कशाबशा सुरू आहेत. अनेक बसमार्ग बंद करण्यासह फेºया कमी करण्याची नामुश्की पालिकेवर ओढवली आहे.केंद्रातील काँग्रेस आघाडीच्या काळात मीरा-भार्इंदर महापालिकेला जेएनएनयूआरएम-२ मधून ९० बस मिळाल्या होत्या. काही वर्षे बस तशाच पडून राहिल्या. त्यानंतर, मोठा गाजवाजा करत २०१५ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाच बस सेवेत आणण्यात आल्या. त्यानंतर, टप्प्याटप्प्याने ४३ सर्वसाधारण बस, १० मिनीबस व पाच वातानुकूलित व्होल्वो बस अशा एकूण ५८ बस प्रवाशांच्या सेवेत आणण्यात आल्या. या नव्या कोºया ५८ बसचा तीन ते चार वर्षांतच खुळखुळा झाला आहे. महापालिकेने बसच्या देखभाल आणि दुरुस्तीबाबत नेहमीच हलगर्जीपणा केल्याने नव्या बस भंगार झाल्या आहेत. बसची नियमित दुरुस्ती, सर्व्हिसिंग, धुलाई आदी सर्वच बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले. टायर नसल्याने बस सातत्याने बंद पडून असतात. कधी इंधनाला पैसे नाही म्हणूनदेखील बस जागेवर उभ्या राहिल्या आहेत. त्यातच, बसच्या टायरखरेदीपासून अनेक बाबतीत गैरप्रकार झाल्याचे आरोप होत असताना त्याचीदेखील कसून चौकशी केली जात नाही. सध्या ५८ मधून जेमतेम २० बसच रस्त्यावर काढल्या जात आहेत. बाकीच्या ३८ बस टायर, ब्रेकडाउनसह विविध कारणांनी देखभाल-दुरुस्तीअभावी धूळखात पडलेल्या आहेत. सध्या सर्वसाधारण ४३ बसपैकी केवळ १५ बस सुरू आहेत. दहा मिनीबसपैकी दोन, तर वातानुकूलित पाच बसपैकी तीन बसच चालत आहेत.बसच नसल्याने मीरा रोड ते रामदेव पार्क मार्ग क्र. २१, मीरा रोड ते हाटकेश बसमार्ग क्र. २२ , बोरिवली बसमार्ग क्र. १४ आदी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असणारे मार्गच बंद करण्यात आले आहेत. वास्तविक रामदेव पार्क, हाटकेश भागात मोठी लोकवस्ती असून नागरिकांसह विद्यार्थ्यांचेही मीरा रोड स्थानक गाठण्यासाठी बस नसल्याने हाल होत आहेत. नाइलाजाने रिक्षासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.प्रवाशांची गर्दी असलेला बोरिवलीचा मार्गदेखील बंद केल्याने मोठी गैरसोयबोरिवलीचा गर्दीचा मार्गदेखील बस नसल्याने बंद केला आहे. मीरा रोड-ठाणे व भार्इंदर-ठाणे या मार्गांवर वातानुकूलित बस सुरू असून साधारण बस बंद केल्या आहेत. खानापूर्ती म्हणून बंद केलेल्या मार्गावर एखादी बस चालवली जाते.लोकप्रतिनिधी, अधिकारी स्वत:च्या वाहनांचे भत्ते नियमित घेतात. पालिकेकडून मिळालेली वाहने त्यांना सुविधायुक्त हवी असतात. परंतु, नागरिकांसाठी असलेल्या परिवहन उपक्रमाच्या बसची देखभाल करण्यात स्वारस्य दाखवले जात नाही.परिवहन उपक्र म चालवण्यास पालिकेने ठेकेदारास मंजुरी दिली असली, तरी बसची देखभाल करण्याची जबाबदारी पालिकेची आहे. त्यामुळे बसच्या दुरवस्थेला अधिकारी आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक