शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

मीरा-भाईंदर पालिकेच्या ‘परिवहन’चा बोजवारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 01:33 IST

केंद्र शासनाकडून फुकटात बस मिळूनदेखील त्याची देखभाल दुरुस्ती करण्यात नाकर्तेपणा दाखवणाऱ्या मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे ५८ पैकी जेमतेम २० बसच सध्या प्रवाशांच्या सेवेत कशाबशा सुरू आहेत.

मीरा रोड - केंद्र शासनाकडून फुकटात बस मिळूनदेखील त्याची देखभाल दुरुस्ती करण्यात नाकर्तेपणा दाखवणाऱ्या मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे ५८ पैकी जेमतेम २० बसच सध्या प्रवाशांच्या सेवेत कशाबशा सुरू आहेत. अनेक बसमार्ग बंद करण्यासह फेºया कमी करण्याची नामुश्की पालिकेवर ओढवली आहे.केंद्रातील काँग्रेस आघाडीच्या काळात मीरा-भार्इंदर महापालिकेला जेएनएनयूआरएम-२ मधून ९० बस मिळाल्या होत्या. काही वर्षे बस तशाच पडून राहिल्या. त्यानंतर, मोठा गाजवाजा करत २०१५ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाच बस सेवेत आणण्यात आल्या. त्यानंतर, टप्प्याटप्प्याने ४३ सर्वसाधारण बस, १० मिनीबस व पाच वातानुकूलित व्होल्वो बस अशा एकूण ५८ बस प्रवाशांच्या सेवेत आणण्यात आल्या. या नव्या कोºया ५८ बसचा तीन ते चार वर्षांतच खुळखुळा झाला आहे. महापालिकेने बसच्या देखभाल आणि दुरुस्तीबाबत नेहमीच हलगर्जीपणा केल्याने नव्या बस भंगार झाल्या आहेत. बसची नियमित दुरुस्ती, सर्व्हिसिंग, धुलाई आदी सर्वच बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले. टायर नसल्याने बस सातत्याने बंद पडून असतात. कधी इंधनाला पैसे नाही म्हणूनदेखील बस जागेवर उभ्या राहिल्या आहेत. त्यातच, बसच्या टायरखरेदीपासून अनेक बाबतीत गैरप्रकार झाल्याचे आरोप होत असताना त्याचीदेखील कसून चौकशी केली जात नाही. सध्या ५८ मधून जेमतेम २० बसच रस्त्यावर काढल्या जात आहेत. बाकीच्या ३८ बस टायर, ब्रेकडाउनसह विविध कारणांनी देखभाल-दुरुस्तीअभावी धूळखात पडलेल्या आहेत. सध्या सर्वसाधारण ४३ बसपैकी केवळ १५ बस सुरू आहेत. दहा मिनीबसपैकी दोन, तर वातानुकूलित पाच बसपैकी तीन बसच चालत आहेत.बसच नसल्याने मीरा रोड ते रामदेव पार्क मार्ग क्र. २१, मीरा रोड ते हाटकेश बसमार्ग क्र. २२ , बोरिवली बसमार्ग क्र. १४ आदी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असणारे मार्गच बंद करण्यात आले आहेत. वास्तविक रामदेव पार्क, हाटकेश भागात मोठी लोकवस्ती असून नागरिकांसह विद्यार्थ्यांचेही मीरा रोड स्थानक गाठण्यासाठी बस नसल्याने हाल होत आहेत. नाइलाजाने रिक्षासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.प्रवाशांची गर्दी असलेला बोरिवलीचा मार्गदेखील बंद केल्याने मोठी गैरसोयबोरिवलीचा गर्दीचा मार्गदेखील बस नसल्याने बंद केला आहे. मीरा रोड-ठाणे व भार्इंदर-ठाणे या मार्गांवर वातानुकूलित बस सुरू असून साधारण बस बंद केल्या आहेत. खानापूर्ती म्हणून बंद केलेल्या मार्गावर एखादी बस चालवली जाते.लोकप्रतिनिधी, अधिकारी स्वत:च्या वाहनांचे भत्ते नियमित घेतात. पालिकेकडून मिळालेली वाहने त्यांना सुविधायुक्त हवी असतात. परंतु, नागरिकांसाठी असलेल्या परिवहन उपक्रमाच्या बसची देखभाल करण्यात स्वारस्य दाखवले जात नाही.परिवहन उपक्र म चालवण्यास पालिकेने ठेकेदारास मंजुरी दिली असली, तरी बसची देखभाल करण्याची जबाबदारी पालिकेची आहे. त्यामुळे बसच्या दुरवस्थेला अधिकारी आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक