शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

भिवंडीसह मीरा-भाईंदरचा कचराप्रश्न लवकरच निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 00:59 IST

नगरविकासचे ८०.४२ कोटींचे अनुदान; घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मान्यता

-नारायण जाधवठाणे : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत राज्यातील सर्व शहरे हगणदारीमुक्त करून कचरा व्यवस्थापनांतर्गत स्वच्छ करण्याचा विडा महाराष्ट्र शासनाने उचलला आहे. यानुसार, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी आणि मीरा-भार्इंदर या दोन महापालिकांचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यास नगरविकास खात्याने बुधवारी प्रशासकीय मान्यता देऊन ८० कोटी ४२ लाख ४३ हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे.यात भिवंडी महापालिकेचा वाटा ३४ कोटी ७४ लाख ४३ हजार रुपये, तर मीरा-भार्इंदर महापालिकेचा वाटा ४५ कोटी ६८ लाख ३० हजार रुपये आहे.यातील भिवंडी महापालिकेला केंद्र शासनाकडून १२ कोटी १६ लाख पाच हजार, राज्य शासनाकडून आठ कोटी १० लाख ७० हजार रुपये मिळणार असून महापालिकेला १४ कोटी ४७ लाख ६८ हजारांचा भार चौदाव्या वित्त आयोगाकडून मिळणाऱ्या अनुदानातून उचलावा लागणार आहे.अशाच प्रकारे मीरा-भाईंदर महापालिकेलाही केंद्र शासनाकडून १५ कोटी ९८ लाख ९० हजार, राज्य शासनाकडून १० कोटी ६५ लाख ९३ हजार रुपये मिळणार असून महापालिकेला १९ कोटी तीन लाख ४६ हजारांचा भार चौदाव्या वित्त आयोगाकडून मिळणाºया अनुदानातून उचलावा लागणार आहे.फेबु्रवारीअखेरपर्यंत कचरा वर्गीकरणाचे बंधनघनकचरा अधिनियम २०१६ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांचे डीपीआर तयार करण्यात आले असून त्यानुसारच त्याची काटेकोर अंमलबजावणी करावयाची आहे. यात सर्वात महत्त्वाची अट म्हणजे शहरात निर्माण होणाºया दैनंदिन घनकचºयाचे निर्मितीच्या ठिकाणी जागेवरच १०० टक्के ओला व सुका असे विलगीकरण करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.यानुसार, भिवंडी आणि मीरा-भाईंदर या दोन्ही महापालिकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात निर्माण होणाºया दैनंदिन घनकचºयावर फेबु्रवारी २०१९ अखेरपर्यंत अशा प्रकारे ९० टक्के विलगीकरण क्रमप्राप्त आहे. ही अटच आता दोन्ही महापालिकांना मारक ठरणार आहे. कारण, येत्या महिनाभरातच त्यांना या अटीची पूर्तता करावयाचे शिवधनुष्य पेलायचे आहे.ते अतिशय कठीण दिसत आहे. कारण, यापूर्वी नवी मुंबईवगळता ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल, उल्हासनगर यासारख्या मोठ्या महापालिकाही त्यांच्या कार्यक्षेत्रात निर्माण होणाºया घनकचºयाचे ओला व सुका असे निर्मितीच्या ठिकाणी वर्गीकरण करण्यातसपशेल नापास झाल्या आहेत. तसेच काही प्रमाणात असे वर्गीकरण होत असले, तरी त्याची विल्हेवाट मात्र एकत्रित होत आहे.बायोमायनिंग अन् कम्पोस्टनिर्मितीची अटघनकचरा व्यवस्थापनेनुसार दोन्ही महापालिकांना कचºयावर बायोमायनिंग प्रक्रिया करण्यास मान्यता देण्यात आली असून त्यानुसार जुन्या साठवलेल्या कचºयाची ९० टक्के जागा पुनर्प्राप्त करावयाची आहे. याशिवाय, घनकचरा अधिनियमानुसार कचºयाची शास्त्रोक्त वाहतूक, विल्हेवाट लावून निर्माण होणाºया कम्पोस्टची शासनाने नेमून दिलेल्या प्रयोगशाळेतून तपासणी करून हरित महासिटी ब्रॅण्ड मिळवून त्याची विक्री करावयाची आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नbhayandarभाइंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकbhiwandiभिवंडी