शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

भिवंडीसह मीरा-भाईंदरचा कचराप्रश्न लवकरच निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 00:59 IST

नगरविकासचे ८०.४२ कोटींचे अनुदान; घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मान्यता

-नारायण जाधवठाणे : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत राज्यातील सर्व शहरे हगणदारीमुक्त करून कचरा व्यवस्थापनांतर्गत स्वच्छ करण्याचा विडा महाराष्ट्र शासनाने उचलला आहे. यानुसार, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी आणि मीरा-भार्इंदर या दोन महापालिकांचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यास नगरविकास खात्याने बुधवारी प्रशासकीय मान्यता देऊन ८० कोटी ४२ लाख ४३ हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे.यात भिवंडी महापालिकेचा वाटा ३४ कोटी ७४ लाख ४३ हजार रुपये, तर मीरा-भार्इंदर महापालिकेचा वाटा ४५ कोटी ६८ लाख ३० हजार रुपये आहे.यातील भिवंडी महापालिकेला केंद्र शासनाकडून १२ कोटी १६ लाख पाच हजार, राज्य शासनाकडून आठ कोटी १० लाख ७० हजार रुपये मिळणार असून महापालिकेला १४ कोटी ४७ लाख ६८ हजारांचा भार चौदाव्या वित्त आयोगाकडून मिळणाऱ्या अनुदानातून उचलावा लागणार आहे.अशाच प्रकारे मीरा-भाईंदर महापालिकेलाही केंद्र शासनाकडून १५ कोटी ९८ लाख ९० हजार, राज्य शासनाकडून १० कोटी ६५ लाख ९३ हजार रुपये मिळणार असून महापालिकेला १९ कोटी तीन लाख ४६ हजारांचा भार चौदाव्या वित्त आयोगाकडून मिळणाºया अनुदानातून उचलावा लागणार आहे.फेबु्रवारीअखेरपर्यंत कचरा वर्गीकरणाचे बंधनघनकचरा अधिनियम २०१६ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांचे डीपीआर तयार करण्यात आले असून त्यानुसारच त्याची काटेकोर अंमलबजावणी करावयाची आहे. यात सर्वात महत्त्वाची अट म्हणजे शहरात निर्माण होणाºया दैनंदिन घनकचºयाचे निर्मितीच्या ठिकाणी जागेवरच १०० टक्के ओला व सुका असे विलगीकरण करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.यानुसार, भिवंडी आणि मीरा-भाईंदर या दोन्ही महापालिकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात निर्माण होणाºया दैनंदिन घनकचºयावर फेबु्रवारी २०१९ अखेरपर्यंत अशा प्रकारे ९० टक्के विलगीकरण क्रमप्राप्त आहे. ही अटच आता दोन्ही महापालिकांना मारक ठरणार आहे. कारण, येत्या महिनाभरातच त्यांना या अटीची पूर्तता करावयाचे शिवधनुष्य पेलायचे आहे.ते अतिशय कठीण दिसत आहे. कारण, यापूर्वी नवी मुंबईवगळता ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल, उल्हासनगर यासारख्या मोठ्या महापालिकाही त्यांच्या कार्यक्षेत्रात निर्माण होणाºया घनकचºयाचे ओला व सुका असे निर्मितीच्या ठिकाणी वर्गीकरण करण्यातसपशेल नापास झाल्या आहेत. तसेच काही प्रमाणात असे वर्गीकरण होत असले, तरी त्याची विल्हेवाट मात्र एकत्रित होत आहे.बायोमायनिंग अन् कम्पोस्टनिर्मितीची अटघनकचरा व्यवस्थापनेनुसार दोन्ही महापालिकांना कचºयावर बायोमायनिंग प्रक्रिया करण्यास मान्यता देण्यात आली असून त्यानुसार जुन्या साठवलेल्या कचºयाची ९० टक्के जागा पुनर्प्राप्त करावयाची आहे. याशिवाय, घनकचरा अधिनियमानुसार कचºयाची शास्त्रोक्त वाहतूक, विल्हेवाट लावून निर्माण होणाºया कम्पोस्टची शासनाने नेमून दिलेल्या प्रयोगशाळेतून तपासणी करून हरित महासिटी ब्रॅण्ड मिळवून त्याची विक्री करावयाची आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नbhayandarभाइंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकbhiwandiभिवंडी