शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

मेगाब्लॉक यशस्वी पण नियोजन फसले; रिक्षाचालकांनी प्रवाशांना लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 3:50 PM

केडीएमटीने व्यवस्था चांगली केली होती. मात्र, पत्रीपुलावरील वाहतूक कोंडीमुळे बसेस अडकल्या.

डोंबिवली: मेगाब्लॉग आधीच ठरलेला असूनही प्रशासन (आरटीओ आणि वाहतूक) यांच्याकडून योग्य ते नियोजन केलेले दिसत नव्हते. डोंबिवली स्टेशन परिसरात वाहतूक नियंत्रण कक्षापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रिक्षा थांब्यावर तसेच बाजीप्रभू चौक येथे रिक्षाचालकांकडून सर्रासपणे प्रवाश्यांची लूट चालू होती. डोंबिवली ते कल्याण 200-300 रुपये भाडे आकाराने चालू होते. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची मात्र याठिकाणी उपस्थिती नव्हती. एक प्रकारे रिक्षावाल्यांसाठी मोकळे मैदान ठेवले होते, अशी टीका प्रोटेस्ट अगेंस्ट ऑटोवाला या सोशल मीडियावरील ग्रुपमध्ये एका सदस्याने व्यक्त केली आहे.

केडीएमटीने व्यवस्था चांगली केली होती. मात्र, पत्रीपुलावरील वाहतूक कोंडीमुळे बसेस अडकल्या. त्यामुळे बाजीप्रभू चौकात प्रवाश्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे रिक्षावाल्यांचे आयतेच फावत होते.

प्रवाश्यांना प्रवासीबस सेवा कोठून चालू आहे याचे योग्य मार्गदर्शन करण्यासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नव्हती.  त्यामुळे प्रवासी म्हातारी माणसे, स्त्रिया संभ्रमात होते. त्यामुळे गोंधळात अजून भर पडून प्रवासी हताशपणे रिक्षा / बस शोधत फिरत होते. त्यामुळे रिक्षावाल्यांची अजूनच चंगळ झाली.

एकंदरीत व्यवस्थापन योग्य नव्हते. आरटीओ आणि वाहतूक विभाग यांनी लुटालूट करणाऱ्या रिक्षावरील कारवाई करण्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नव्हती. हे खूपच संतापकारक होते, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :localलोकलcentral railwayमध्य रेल्वे