शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

मेट्रोंची कामे परवानगीच्या फेऱ्यात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 03:48 IST

कोणत्याही परवाग्या नसताना आणि जमीन ताब्यात नसतानाही ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया सुरू केल्याने मुंबईतील मेट्रो मार्गांसारखेच हे विस्तारीत मार्गही परवानग्यांच्या फेऱ्यात अडकण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

- नारायण जाधवठाणे : राज्य मंत्रिमंडळाने गेल्या मंगळवारी दहीसर ते मीरा-भार्इंदर मेट्रो ९ आणि मेट्रो-७ च्या अंधेरी ते विमानतळापर्यंतच्या विस्तारीत मार्गाच्या अंमलबजावणीस मान्यता दिल्यानंतर एमएमआरडीएने दोन दिवसांपूर्वी त्यांच्या स्थापत्य कामासाठी सल्लागाराचा शोध सुरू केल्यानंतर आता त्यांच्या मार्गिका आणि त्यावरील स्थानकांच्या बांधकामासाठी ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे जमीनीचे संपादन, पुनर्वसन आणि वने आणि पर्यावरण खात्याचे एनओसी अर्थात ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याआधीच ही प्रक्रिया एमएमआरडीएने सुरू केली आहेत. असलाच प्रकार मेट्रो-५च्या ठाणे-भिवंडीच्या विस्ताराच्या बाबतीत घडला आहे.हे प्रकल्प मार्च-२०२२ पर्यंत पूर्ण करण्यासाठी आता त्याच्या स्थापत्य कामांसाठी सल्लागारचा शोध सुरू केल्यानंतर आता त्यांच्या बांधकामासाठी ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, कोणत्याही परवाग्या नसताना आणि जमीन ताब्यात नसतानाही ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया सुरू केल्याने मुंबईतील मेट्रो मार्गांसारखेच हे विस्तारीत मार्गही परवानग्यांच्या फेऱ्यात अडकण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.यातील मेट्रो मार्ग ९ चा दहीसर ते भार्इंदर हा १०.४१ किलोमीटर संपूर्ण मार्ग आणि त्यावरील स्थानकेही उन्नत आहेत. तर अंधरी ते विमानळापर्यंतचा मेट्रो ७ चा विस्तारातील काही मार्ग आणि स्थानके भूमिगत आणि उन्नत अशा दोन्ही स्वरुपाची आहेत. दोन्ही मार्गांची एकूण लांबी १३.५८ किमी असून त्यासाठी सुमारे ६ हजार ६०७ कोटी रु पये खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही मार्गांमुळे प्रवासाच्या कालावधीमध्ये ३० ते ४० मिनिटांची बचत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.मतांवर डोळाविशेष म्हणजे यापूर्वी या मार्गांत बाधीत होणाºया बांधकामे, प्रकल्पग्रस्तांचा सामाजिक आणि आर्थिक सर्व्हे करण्यासाठी एनजीओंना नेमण्यात आले आहे. त्यांचा अहवालही अद्याप आलेला नाही.तरीही केवळ प्रसिद्धी आणि लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत मतांची बेगमी लुटण्यासाठी एमएमआरडीएने सत्ताधारी भाजपा-शिवसेनेच्या दबावाला बळी पडून ही प्रक्रिया सुरू केल्याने ती आतबट्ट्याची ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.बांधकामे होणार बाधितमुंबईतील अनेक मेट्रो आवाजाचे प्रदूषण,खोदकाम आणि वृक्षांच्या कत्तलीच्या मुद्यांवरून रखडली आहेत. न्यायालयानेही एमएमआरडीएचे यावरून कान टोचले आहेत. दहिसर-भार्इंदर आणि ठाणे-भिवंडी मेट्रोच्या मार्गात वृक्षांच्या कत्तलीसह खारफुटी,सीआरझेडसह अनेक बांधकामे बाधीत होणार आहेत.अनेक ठिकाणी जेथून मेट्रो मार्ग जाणार आहे,त्या जमिनीचे भूसंपादन होणे अद्यापही शिल्लक आहे.राज्य सरकारने केवळ मेट्रोच नव्हे तर रस्ते, पुलांची कामेही कायदा मोडून करण्याचे ठरविले आहे. सत्ताधाºयांसाठी सध्याचे वर्ष हे इलेक्शन वर्ष आहे. वने आणि पर्यावरणमंत्रालयाची परवानगी न घेताच कंत्राटे काढायची. उद्या कुणी कोर्टात गेल्यावर कंत्राटदार सांगेल माझा काय दोष आहे, एममएआरडीएने कंत्राट काढले म्हणून मी काम घेतले. त्यामुळे परवानग्यांच्या फेºयात उशीर झाल्याने मला नुकसान भरपाई द्या अशी मागणी तो करेल अन सरकारला ती द्यावी लागेल.- दयानंद स्टॅलिन,वनशक्ती, संघटना

टॅग्स :Metroमेट्रोthaneठाणे