शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

मातृदुग्धपेढी नवजात बालकांसाठी नवसंजीवनी, महानगरपालिकेच्या रूग्णालयाचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 00:02 IST

राज्यात सर्वप्रथम १९८९ साली मुंबईच्या सायन रुग्णालयात मातृदुग्ध पेढी सुरू झाली होती.

- पंकज रोडेकरठाणे : नवजात बाळासाठी आईचे दूध हे अमृतासारखे असते. मात्र, प्रसूतीदरम्यान किंवा प्रसूतीनंतर येणारे काही अडथळे अथवा मातेला दूध नसल्याने नवजात बाळांची आबाळ होऊ नये, त्यांना आईचे दूध मिळावे, यासाठी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे सुरू केलेली मातृदुग्ध पेढी ही नवजात बालकांना नवसंजीवनी देणारी ठरत आहे. दररोज या पेढीत जवळपास २ लीटर दूध उपलब्ध होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्यात सर्वप्रथम १९८९ साली मुंबईच्या सायन रुग्णालयात मातृदुग्ध पेढी सुरू झाली होती. त्यानंतर, ठाणे जिल्ह्यात ठामपा आणि रोटरी क्लब आॅफ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १ मे २०१२ रोजी या मातृदुग्ध पेढीची मुहूर्तमेढ रोवली गेली. शस्त्रक्रियेने प्रसूती झालेल्या मातांना सुरूवातीला बाळाला स्तनपान करण्यात अडचणी येतात. त्यावेळी मातेला आपल्या बाळाला दूध पाजता येत नसल्याने बालकाला गाईचे किंवा पावडरचे दूध दिले जाते. पण, अशा दूधामध्ये बाळाच्या विकासासाठी पोषक घटक नसतात. अशाप्रकारच्या अनेक कारणांमुळे आईच्या दूधापासून वंचित राहणाऱ्या बालकांसाठी या पेढीची निर्मिती केली गेली आहे. प्रसूती झालेल्या मातेमध्ये दररोज ४०० ते ७०० मी.ली दूधाची तयार होते. त्यातील जास्तीत जास्त ५०० मी.ली दूध बालकाला पुरेसे होते. साधारणत: १५० ते २०० मी.ली. दूध दररोज वाया जाते. हे दूध वाया जाऊ नये, यासाठी रुग्णालयामार्फत प्रसूती होणाºया मातांचे वाया जाणारे दूध संकलित करण्यासाठी जनजागृती केली जाते. ते दूध संकलित करताना मातेकडून तसेच ज्या बालकाला दिले जाणार आहे, त्या बालकाच्या नातेवाइकांकडून त्यासंदर्भात लेखी घेतले जाते. त्यानंतरच ते दूध बालकाला दिले जाते, अशी माहिती सूत्रांनी दिली.२०१२ साली ही पेढी सुरू झाली, तेव्हा दररोज २०० ते ३०० मीली दूध संकलित व्हायचे. आता १५०० ते १८०० मीली इतके संकलित होत असून कधी-कधी ते २ लीटरपर्यंतही जाते. दिवसाला साधारणत: १५ ते २० माता वाया जाणारे दूध मातृदूग्ध पेढीत संकलित करण्यासाठी पुढे येत आहेत. हे दूध संकलित केल्यावर त्याच्यावर प्रक्रिया करून निर्जंतूकीकरण केल्यानंतर ते दूध गरज असलेल्या नवजात बालकांना दिले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.नेत्रदान, देहदान आणि रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान आहे. मात्र, त्यातील देह आणि नेत्रदान मृत्यू झाल्यानंतर केले जाते. पण, त्या दानापेक्षा दुग्धदान हे मोठे दान आहे. हे दान करणाºया मातांची संख्या वाढल्याने दररोज जवळपास २ लीटर मातृदूध पेढीत जमा होत आहे.- डॉ. संध्या खडसे, अधिष्ठाता, कळवा रूग्णालय, ठामपा.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका