शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

बालविज्ञान परिषदेत मराठवाडा, विदर्भातील सहभाग रोडावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 01:50 IST

ठाणे : मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी पडलेल्या दुष्काळामुळे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आयोजित राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत ...

ठाणे : मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी पडलेल्या दुष्काळामुळे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आयोजित राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत तेथील विद्यार्थ्यांनी अल्प सहभाग घेतला. दरवर्षी या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात प्रकल्प येत असतात. मात्र, यंदा दुष्काळाचा परिणाम त्यांच्या सहभागी संख्येवर झाल्याची माहिती राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे यांनी दिली. ही परिषद भुवनेश्वर येथे २७ ते ३१ डिसेंबर दरम्यान होणार आहे. परिषदेचे हे २६ वे वर्ष आहे.या परिषदेसाठी शहरी आणि ग्रामीण मुलांचा सहभाग समप्रमाणात असतो. परंतू यंदा बीड, परभणी, नागपूर, हिंगोली, वाशिंद, चंद्रपूर, गोंदीया येथून खाजगी आणि जिल्हा परिषद शाळांचे प्रकल्प अल्प प्रमाणात आले, असे दिघे म्हणाले. मुलींची, विशेषत: ग्रामीण भागांतील मुलींचा सहभाग वाढत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. एकीकडे इंग्रजी माध्यमांचा सहभाग वाढत असला तरी दुसरीकडे मराठी शाळांचा सहभाग कमी असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मुली विज्ञान आणि मुले तंत्रज्ञान विषयांकडे वळत असल्याचे यंदाच्या प्रकल्पांतून जाणवले. स्वच्छ, हरित आणि आरोग्य संपन्न देशासाठी: विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण कल्पना हा या वर्षीच्या परिषदेचा मुख्य विषय आहे.राष्ट्रीय परिषदेसाठी राज्याचा ३० बाल वैज्ञानिकांचा चमू, नुकत्याच ज्ञान प्रबोधिनी, हरारी, उस्मानाबाद येथे संपन्न झालेल्या राज्य परिषदेत निवडला गेला. या तीस जणाच्या चमूत २० मुली आणि १० मुले असून शहरी भागातील २१ आणि ग्रामीण भागातील ९ शाळांचा समावेश आहे. इंग्रजी माध्यमाची २१ विद्यार्थी असून ९ विद्यार्थी मराठी माध्यमाचे आहेत. जिल्हावारी, ठाणे जिल्ह्याने आघाडी घेतली असून, ठाणे शहरातील ७ प्रकल्पांची निवड राष्ट्रीय पातळीवर निवड झालेली आहे. त्या मागोमाग मुंबई पूर्व उपनगर ५, पुणे ५, मुंबई पश्चिम उपनगर ३, रायगड ३, रत्नागिरी २, उस्मानाबाद २, कोल्हापूर १, अमरावती १, वर्धा १ यांची निवड झाली आहे. जानेवारी महिन्यात होणाऱ्या इंडियन सायन्स काँग्रेससाठी लहान गटात ठाण्यातील श्रीमती सुलोचना सिंघानिया स्कूल तर मोठ्या गटातून लोधिवली, खालापूर येथील रिलायन्स फाऊंडेशन या शाळांची निवड झाली आहे.>हे आहेत सहभागी प्रकल्पमंगळवारी पत्रकारांसोबत झालेल्या वार्तालापात निवड झालेल्या शाळांनी आपले प्रकल्प सादर केले. यात पनवेल येथील रिलायन्स फाऊंडेशनच्या हिमानी जोशी आणि केतकी लबडे या विद्याथीर्नींनी ‘स्त्रीयांच्या मासीकपाळीमध्ये वापरण्यात येणाºया सॅनिटरी नॅपकिनमुळे होणाºया घनकचºयाचे व्यवस्थापन आणि त्याला पर्यावरणपुरक पर्याय’ हा प्रकल्प हाताळला आहे. सिंघानिया शाळेच्या दीप देसाई आणि कार्तिक वारियर यांनी ‘निसर्ग संवर्धन आणि कचरा व्यवस्थापन याचे सुयोग्य मिश्रण’, याच शाळेच्या अक्षी टकले आणि इशान खडसे यांनी ‘सॅनिटरी नॅपकिनचे विघटन करण्यासाठी पर्याय शोधणे’, ए. के. जोशीच्या अवनी साठे आणि रमा राईलकर यांनी ‘नापीक जमीन सुपीक बनविण्यासाठी नैसर्गीक स्त्रोतांचा वापर’, घोडबंदर रोड येथील सरस्वती विद्यालयाच्या केतकी पवार आणि पुर्वा सावंत यांनी फुलांच्या कचºयाचे विघटन आणि पुनर्वापर, डॉ. बेडेकर विद्या मंदिराच्या प्रज्ञा मोरे आणि नाविन्य मेटकरी यांनी प्लास्टिकला पर्याय दिला आहे. श्रीरंग विद्यालय इंग्रजी माध्यमाने ‘प्लास्टिक बंदी आणि उपाय’ तर लोकपुरम पब्लिक स्कूलच्या अभिनव गणेश आणि तन्मय कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी ‘ओलावा संवेदना आणि सिंचन रोबोट’ हा विषय हाताळला आहे.