शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
5
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
6
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
7
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
8
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
9
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
10
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
11
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
12
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
13
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
14
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
15
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
16
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
17
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
18
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
19
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
20
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 

Maratha Kranti Morcha मराठा आंदोलन समाजकंटकांनी पेटवले, ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 17:56 IST

Maratha Kranti Morcha ठाण्यात मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. सगळीकडे आंदोलन शांततेत सुरू असतानाच ठाण्यात आंदोलकांनी गाड्यांवर दगडफेक केली होती.

ठाणे- ठाण्यात मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. सगळीकडे आंदोलन शांततेत सुरू असतानाच ठाण्यात आंदोलकांनी गाड्यांवर दगडफेक केली होती. परंतु गाड्या फोडणारे हे आंदोलक नसून समाजकंटक असल्याची महत्त्वपूर्ण माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली आहे. आंदोलन पेटवण्या-या 20 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, पोलीस पूर्ण संरक्षण देत आहेत, असंही परमवीर सिंग म्हणाले आहेत.ठाण्यातील वागळे इस्टेट येथे सकाळी आंदोलकांनी टीएमटीच्या बसची तोडफोड केली होती. शिवाय तीनहात नाका परिसरात आंदोलकांनी घोषणाबाजी करत मुंबईकडे येणारी वाहतूक रोखून धरल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तर दुसरीकडे, माजीवाडा पुलावर आंदोलकांनी टायर जाळून निषेध नोंदवला होता. दरम्यान, मुंबई पोलिसांकडून मराठा आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. तसंच कोणतीही अडचण आल्यास किंवा अनुचित घटना घडल्यास 100 नंबर आणि ट्विटर अकाऊंटवर माहिती देण्याची सूचना पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आली होती.आंदोलनावेळी समाजकंटकांकडून काही अनुचित प्रकार घडवला जाऊ नये यासाठी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने संपूर्ण राज्यात घडणा-या हालचालींवर बारीक नजर ठेवली होती. विशेष शाखेकडून सर्व घटनांचा आढावा घेतला जात होता. मुंबई पोलिसांसह राज्य राखीव सुरक्षा बल, केंद्रीय सुरक्षा बल, शीघ्रकृती दल (क्यूआरटी), फोर्स वन, बॉम्ब शोधक व नाशक पथक, राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) शहरात तैनात होते. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाthaneठाणेMumbai Bandhमुंबई बंदMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद