शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

Mansukh Hiren Murder Case: मनसुख प्रकरणात एटीएसची प्रतिष्ठा पणाला!

By जितेंद्र कालेकर | Updated: March 22, 2021 20:38 IST

मनसुख हिरेन कथित हत्या प्रकरणात राज्य दहशतवादविरोधी पथकाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळेच या प्रकरणाचा तपासही राष्टÑीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) जाऊ नये म्हणून हालचालींना वेग आला आहे.

ठळक मुद्दे एनआयएकडे खूनाचा तपास जाऊ नये म्हणून हालचालींना वेग

जितेंद्र कालेकर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मनसुख हिरेन कथित हत्या प्रकरणात राज्य दहशतवादविरोधी पथकाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळेच या प्रकरणाचा तपासही राष्टÑीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) जाऊ नये म्हणून हालचालींना वेग आला आहे. या खूनातील पाळेमुळे शोधून काढण्याचे आदेश एटीएसचे प्रमुख जयजित सिंग यांनी रविवारी एटीएसच्या पथकाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.याच पार्श्वभूमीवर या खूनाच्या कटातील दोन आरोपींना अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवदीप लांडे यांच्या पथकाने अटक केली. एकीकडे एनआयएने मुंबईतील अंटालिया इमारतीजवळ मिळालेल्या स्फोटकांच्या कारच्या गुन्हयात मुंबईच्या गुन्हे गुप्त वार्ता विभागाचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली. पाच कारही जप्त केल्या. पाच लाखांपेक्षा अधिक रोकडही जप्त केली. त्यापाठोपाठ या प्रकरणामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचीही राज्य सरकारला उचलबांगडी करावी लागली. त्यानंतर मनसुख यांच्या हत्येतही वाझे यांचा सहभाग होता किंवा कसे? याचाही तपास एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून सुरु झाला होता. त्याचा घटनाक्रमही एनआयएच्या अधिकाऱ्यांनी जाणून घेण्यास सुरुवात केली होती. इकडे एटीएसच्या अधिकाºयांकडे काहीच हाती लागत नसल्यामुळे स्फोटकांच्या तपासाबरोबरच हाही तपास एनआयएकडे जातो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तोपर्यंत एनआयए हा तपास घेत असल्याचे वृत्तही आले. अखेर राज्याचे एटीएस प्रमुख जयजित सिंग यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवदीप लांडे आणि उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्यात शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये या प्रकरणाचा कसून तपास करण्याचे आदेश देण्यात आले. गेली तीन दिवस हे अधिकारी ठाण्यात तळ ठोकून होते. अखेर या प्रकरणाचा काही अंशी छडा लावण्यात यश आले. त्यातील दोघांना रविवारी अटक करण्यात आली. आता हा तपास काही प्रमाणातच बाकी असल्यामुळे तो एटीएसकडेच ठेवण्यात यावा, त्याचवेळी एनआयएला यासंदर्भात लागणारे कोणतेही सहकार्य एटीएसकडून केले जाईल, असेही बोलले जाते. त्यामुळे संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या प्रकरणाचा आणखी सखोल आणि चांगल्या प्रकारे तपास करण्याचे आदेश जयजित सिंग यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘अति संवेदनशील मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात एटीएसच्या पथकाला यश आले आहे. एटीसच्या सर्व सहकाºयांना मनापासून सॅल्यूट आहे. आतापर्यंतच्या पोलीस सेवेच्या करियरमधील सर्वात अवघड केसपैकी ही एक केस आहे.’शिवदीप लांडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, एटीएस 

 

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAnti Terrorist Squadएटीएस