शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

Mansukh Hiren Murder Case: मनसुख प्रकरणात एटीएसची प्रतिष्ठा पणाला!

By जितेंद्र कालेकर | Updated: March 22, 2021 20:38 IST

मनसुख हिरेन कथित हत्या प्रकरणात राज्य दहशतवादविरोधी पथकाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळेच या प्रकरणाचा तपासही राष्टÑीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) जाऊ नये म्हणून हालचालींना वेग आला आहे.

ठळक मुद्दे एनआयएकडे खूनाचा तपास जाऊ नये म्हणून हालचालींना वेग

जितेंद्र कालेकर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मनसुख हिरेन कथित हत्या प्रकरणात राज्य दहशतवादविरोधी पथकाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळेच या प्रकरणाचा तपासही राष्टÑीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) जाऊ नये म्हणून हालचालींना वेग आला आहे. या खूनातील पाळेमुळे शोधून काढण्याचे आदेश एटीएसचे प्रमुख जयजित सिंग यांनी रविवारी एटीएसच्या पथकाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.याच पार्श्वभूमीवर या खूनाच्या कटातील दोन आरोपींना अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवदीप लांडे यांच्या पथकाने अटक केली. एकीकडे एनआयएने मुंबईतील अंटालिया इमारतीजवळ मिळालेल्या स्फोटकांच्या कारच्या गुन्हयात मुंबईच्या गुन्हे गुप्त वार्ता विभागाचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली. पाच कारही जप्त केल्या. पाच लाखांपेक्षा अधिक रोकडही जप्त केली. त्यापाठोपाठ या प्रकरणामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचीही राज्य सरकारला उचलबांगडी करावी लागली. त्यानंतर मनसुख यांच्या हत्येतही वाझे यांचा सहभाग होता किंवा कसे? याचाही तपास एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून सुरु झाला होता. त्याचा घटनाक्रमही एनआयएच्या अधिकाऱ्यांनी जाणून घेण्यास सुरुवात केली होती. इकडे एटीएसच्या अधिकाºयांकडे काहीच हाती लागत नसल्यामुळे स्फोटकांच्या तपासाबरोबरच हाही तपास एनआयएकडे जातो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तोपर्यंत एनआयए हा तपास घेत असल्याचे वृत्तही आले. अखेर राज्याचे एटीएस प्रमुख जयजित सिंग यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवदीप लांडे आणि उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्यात शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये या प्रकरणाचा कसून तपास करण्याचे आदेश देण्यात आले. गेली तीन दिवस हे अधिकारी ठाण्यात तळ ठोकून होते. अखेर या प्रकरणाचा काही अंशी छडा लावण्यात यश आले. त्यातील दोघांना रविवारी अटक करण्यात आली. आता हा तपास काही प्रमाणातच बाकी असल्यामुळे तो एटीएसकडेच ठेवण्यात यावा, त्याचवेळी एनआयएला यासंदर्भात लागणारे कोणतेही सहकार्य एटीएसकडून केले जाईल, असेही बोलले जाते. त्यामुळे संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या प्रकरणाचा आणखी सखोल आणि चांगल्या प्रकारे तपास करण्याचे आदेश जयजित सिंग यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘अति संवेदनशील मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात एटीएसच्या पथकाला यश आले आहे. एटीसच्या सर्व सहकाºयांना मनापासून सॅल्यूट आहे. आतापर्यंतच्या पोलीस सेवेच्या करियरमधील सर्वात अवघड केसपैकी ही एक केस आहे.’शिवदीप लांडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, एटीएस 

 

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAnti Terrorist Squadएटीएस