शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

एकाचा विरोध म्हणून ६ कोटी मराठ्यांना वेठीस धरू नका; मनोज जरांगेंनी थेट सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 14:05 IST

गुन्हे केल्यामुळे मराठा समाज घाबरणार नाही आणि खचणारही नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी ठाण्यातील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. 

ठाणे - आमच्या लेकरांच्या न्यायासाठी आम्ही लढतोय. तुम्ही ठरल्याप्रमाणे करायला तयार नाही. एक माणूस विरोध करतो म्हणून तुम्ही ६ कोटी मराठ्यांना वेठीस धरू शकत नाही.आपण कुणाचे नाव घेत नाही. लायकीही नाही. आधी विचार म्हणून विरोध होता. वैचारिक मतभेद असले पाहिजे. पण ज्यादिवशी ते कायद्याच्या घटनेच्या पदावर असताना जातीय तेढ निर्माण केला. तेव्हापासून त्या व्यक्तिलाही मराठ्यांचा विरोध आहे अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही तुम्हाला महत्त्व देत नाही. तुम्ही पातळी सोडून बोलला. तुम्ही मराठा आरक्षण देऊ नका बोलला त्यामुळे तुमचा विषय मराठ्यांच्या नजरेतून संपला. तुम्ही कितीही विरोध केला. कितीही कार्यक्रम घेतले तोच मराठ्यांचा फायदा होतोय. आमचे सगळे मराठे एकत्र झालेत. एका सभेने मराठा एकत्र झाले. इतका अनुभव असून काय फायदा, मी रानातला माणूस बरा. कुणाच्या हाताला लागत नाही. प्रशासकीय, शासकीय अनुभव, ३०-३२ वर्ष सत्ता भोगली त्या माणसाने अशी विधाने करावीत. म्हातारपणाला पचत नाही. पाणी टंचाई असली तरी जावे लागते. लोकांचे खाल्ल्यावर पचणार कसे? त्यांनी थोडे शांत राहावे नाहीतर कायम बाथरूममध्ये बसावे लागेल असा इशारा नाव न घेता भुजबळांना दिला. 

तसेच स्वत:च्या समाजाला बकरं म्हणून हिणवायचे, २-४ जण बाहेर निघाले. माणसं चालली उरका पटपट असं सभेत बोलायला लागली. सध्या मराठ्यांची त्सुनामी आलीय. आमच्यामध्ये कुणी येऊ नये. हा सर्वसामान्यांचा लढा असून तो यशस्वी होणार आहे. हा माझा किंवा तुमचा नव्हे तर अखंड महाराष्ट्रातील मराठा समाजाचा विजय होणार आहे. २४ डिसेंबरच्या आत मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करा. कारण आमच्या नोंदी सापडल्या, तुम्ही नाकारू शकत नाही. ओबीसीच्या एका नेत्यासमोर एकच पर्याय आहे.बाकींना ओढले जातंय.मराठा आता ओबीसी आरक्षणात आले, मग आता एकच जातीय भांडणे लावणे. परंतु मराठा-ओबीसी एकमेकांसोबत राहतायेत. इतकं प्रेम आणि मित्रत्व आहे. अडीअडचणीला एकमेकांसोबत उभे राहतात. नांगराला बैल लागले तरी एकमेकांना देतात. ही ग्रामीण भागात चर्चा आहे. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या असतील तर त्यांना प्रमाणपत्रे दिले पाहिजे आणि आपल्या नेत्यांनी गप्प राहिले पाहिजे अशी ओबीसी समाजातील भावना आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. 

दरम्यान, आमच्यावर अन्याय झालाय आणखी किती दिवस सहन करणार? आमच्या लेकरांचे करिअर उद्ध्वस्त केले. २० दिवस झाले मी एकही शब्द त्यांच्यावर बोललो नाही. पोलीस प्रशासन आमच्यावर गुन्हे दाखल करतायेत. कायदा सुव्यवस्था बिघडावी असं सरकारला वाटतंय का? हा प्रश्न माझा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे. तुम्हीच ठरवून त्यांना पुढे केलंय का? मराठा-ओबीसीत वाद नको म्हणून दिवस रात्र आम्ही लोकांच्या दारात जातोय. तुम्ही त्यांना पाठबळ देऊ लागलात. तुम्हाला जातीजातीत तेढ निर्माण करून सरकारलाच दंगली भडकावून आणायच्या आहेत असा अर्थ आहे का? लोकांना शांततेत राहा असं आम्ही सांगतोय. तुम्ही दंगलीची भाषा करताय. राजकीय स्वार्थापोटी राज्यात दंगली होऊ द्यायच्या नाहीत. ज्या लोकांनी कार्यक्रम घेतले त्यांच्यावरच गुन्हे नोंद करायला लागलेत. आम्ही थांबणार नाही. गुन्हे केल्यामुळे मराठा समाज घाबरणार नाही आणि खचणारही नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी ठाण्यातील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण