शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कंत्राटी अधिकाऱ्यांकडे २९ जिल्ह्यांचे व्यवस्थापन; आपत्ती व्यवस्थापनाबाबत उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 01:21 IST

एखाद्या ठिकाणी पूर, इमारत कोसळणे किंवा इतर हानी झाल्यास मदतीसाठी राज्यातील २९ जिल्ह्यांत आपत्ती व्यवस्थापन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.

ठाणे : एखाद्या ठिकाणी पूर, इमारत कोसळणे किंवा इतर हानी झाल्यास मदतीसाठी राज्यातील २९ जिल्ह्यांत आपत्ती व्यवस्थापन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, या केंद्रात काम करणारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ही दोन्ही पदे केवळ तात्पुरत्या किंवा कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहेत. परंतु, प्रत्यक्षात पदनिर्मिती मात्र करण्यात आलेली नाही.राज्यात नैसर्गिक आपत्तीच्या दुर्घटना घडत आहेत. मात्र, याबाबत राज्य शासनामध्ये एवढी उदासीनता आहे की, राज्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्यासह प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या पदांची निर्मिती केली नसल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये माळीणसारखी दुर्घटना घडलेल्या पुणे आणि नाशिक जिल्ह्यांचा समावेश आहे. या पदांची निर्मिती करण्यात न आल्याने आपत्ती व्यवस्थापनही कोलमडले आहे. विविध नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी २००३ साली राष्ट्रीय विकास कार्यक्र म (यूएनडीपी) आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील बहुआपत्तीप्रवण ३६ जिल्ह्यांत व १० महानगरपालिकांमध्ये राबवण्यात आला. २००९ मध्येच राज्य शासनाने १४ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन कार्यक्र म (एमडीआरएम) राबवण्याचा निर्णय घेतला. जून २०१० पासून या कार्यक्रमाची (एमडीआरएम) अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली.महाराष्ट्रात सहा विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक व प्रत्येक जिल्ह्यात ३६ आपत्ती व्यवस्थापन अधिकारीपदे निर्माण केली असूनही अनेक जिल्ह्यांत या अधिकाºयांची कायमस्वरूपीस्वतंत्र पदनिर्मितीच न केल्यानेया प्राधिकरणाचा बोजवारा उडाला आहे.ही आहेत प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्रेनवी मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, नाशिक, अमरावती, नागपूर.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाºयांकडे जिल्हास्तरावरील आपत्तीविषयक कार्यक्र माचे नियोजन करण्याची जबाबदारी असते. परंतु, बहुतेक जिल्ह्यांत ही पदेच रिक्त आहेत. अशीच काहीशी परिस्थिती राज्यातील १० प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागांची आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र