शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
2
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
3
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
4
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; थोड्याच वेळात पत्रकार परिषद
5
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम
6
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
7
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
8
"आम्ही मुस्लिमांना घर देत नाही", अली गोनी अन् जास्मीनला मुंबईत घर शोधताना आल्या अडचणी
9
आता तरी एकता दाखवा; काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्याने एअर स्ट्राईकला म्हटले 'टुच्चेपणा'
10
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
11
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
12
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
13
Operation Sindoor : "जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
14
Operation Sindoor : "अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
15
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
16
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
17
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
18
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
19
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
20
Mumbai Rains: ढगांच्या गडगडाटासह कांदिवली, बोरिवली भागात मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ

कंत्राटी अधिकाऱ्यांकडे २९ जिल्ह्यांचे व्यवस्थापन; आपत्ती व्यवस्थापनाबाबत उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 01:21 IST

एखाद्या ठिकाणी पूर, इमारत कोसळणे किंवा इतर हानी झाल्यास मदतीसाठी राज्यातील २९ जिल्ह्यांत आपत्ती व्यवस्थापन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.

ठाणे : एखाद्या ठिकाणी पूर, इमारत कोसळणे किंवा इतर हानी झाल्यास मदतीसाठी राज्यातील २९ जिल्ह्यांत आपत्ती व्यवस्थापन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, या केंद्रात काम करणारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ही दोन्ही पदे केवळ तात्पुरत्या किंवा कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहेत. परंतु, प्रत्यक्षात पदनिर्मिती मात्र करण्यात आलेली नाही.राज्यात नैसर्गिक आपत्तीच्या दुर्घटना घडत आहेत. मात्र, याबाबत राज्य शासनामध्ये एवढी उदासीनता आहे की, राज्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्यासह प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या पदांची निर्मिती केली नसल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये माळीणसारखी दुर्घटना घडलेल्या पुणे आणि नाशिक जिल्ह्यांचा समावेश आहे. या पदांची निर्मिती करण्यात न आल्याने आपत्ती व्यवस्थापनही कोलमडले आहे. विविध नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी २००३ साली राष्ट्रीय विकास कार्यक्र म (यूएनडीपी) आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील बहुआपत्तीप्रवण ३६ जिल्ह्यांत व १० महानगरपालिकांमध्ये राबवण्यात आला. २००९ मध्येच राज्य शासनाने १४ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन कार्यक्र म (एमडीआरएम) राबवण्याचा निर्णय घेतला. जून २०१० पासून या कार्यक्रमाची (एमडीआरएम) अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली.महाराष्ट्रात सहा विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक व प्रत्येक जिल्ह्यात ३६ आपत्ती व्यवस्थापन अधिकारीपदे निर्माण केली असूनही अनेक जिल्ह्यांत या अधिकाºयांची कायमस्वरूपीस्वतंत्र पदनिर्मितीच न केल्यानेया प्राधिकरणाचा बोजवारा उडाला आहे.ही आहेत प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्रेनवी मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, नाशिक, अमरावती, नागपूर.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाºयांकडे जिल्हास्तरावरील आपत्तीविषयक कार्यक्र माचे नियोजन करण्याची जबाबदारी असते. परंतु, बहुतेक जिल्ह्यांत ही पदेच रिक्त आहेत. अशीच काहीशी परिस्थिती राज्यातील १० प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागांची आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र